अमरावती : सध्या समाजात धार्मिक दुफळी करण्याचे काम राज्य सरकार करीत आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती गंभीर आहे व याची सर्व सूत्रे नागपूरवरून हलविली जात असल्याचा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी आयोजित पत्रपरिषदेत केला. अधिकारी काम करीत नाहीत, ही नेहमीचीच ओरड आहे. मात्र, सरकार अधिकाऱ्यांवर अविश्वास दाखवित आहे. मंत्रिमंडळ बैठकीचा दिवस वगळता एकही मंत्री मुंबईला थांबत नाही. त्यांना त्यांचे मतदारसंघ असुरक्षित वाटतात. यामुळे राज्याचा विकास ठप्प झाला असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. व्यापारी कर देत नाही, म्हणून शासनाने एलबीटी बंद केला. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर सात हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे. हे पैसे शेतकऱ्यांना दिले असते, तर शेतकरी सावरले गेले असते. शेतकऱ्यांना उघडे टाकू नका, असे चव्हाण यांनी सांगितले. पत्रपरिषदेला महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा चारुलता टोकस व अन्य मान्यवर उपस्थित होते. राज्याचे तुकडे करू नकामहाराष्ट्र समृद्ध आहे. याचे तुकडे करू नका, लहान राज्य केल्याने विकास कसा साधणार हे पटवून द्यावे, राज्याच्या एकूण उत्पन्नापैकी ७५ टक्के हिस्सा ४ महानगरातून मिळतो. यासाठी विदर्भ कमी पडतो, असे चव्हाण यांनी सांगितले.
धार्मिक दुफळीला शासनाचे खतपाणी
By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST