शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले ‘मालेगाव’

By admin | Updated: February 5, 2017 01:17 IST

औरंगाबाद, साक्री, सुरत, नाशिक, धुळे, गाळणे या तत्कालीन स्थळांच्या मध्यवर्ती असलेला, गिरिणा (गिरिपर्णा) व मोक्षगंगा (मोसम) यांच्या संगमापासून एक मैल अंतरावर वसलेला,

- गौरव भंदिर्गेऔरंगाबाद, साक्री, सुरत, नाशिक, धुळे, गाळणे या तत्कालीन स्थळांच्या मध्यवर्ती असलेला, गिरिणा (गिरिपर्णा) व मोक्षगंगा (मोसम) यांच्या संगमापासून एक मैल अंतरावर वसलेला, तत्कालीन काळात खान्देशाची किल्ली म्हणून ओळखला जाणारा असा सरदार नारोशंकर राजेबहाद्दर निर्मित किल्ले मालेगाव.इतिहास : मालेगावचा हा भुईकोट पेशव्यांचे सरदार नारोशंकर यांनी १७४० मध्ये बांधला. काहींच्या मते हा किल्ला १७६० मध्ये बांधला गेला असावा. नारोशंकरांना मोगल बादशहाने ‘राव बहाद्दूर’ ही पदवी दिली होती. इ. स. १७३० मध्ये नारोशंकर मल्हारराव होळकर यांच्या फौजेत होते. त्या वेळी पेशव्यांच्या वतीने ओरछा व झांसी येथे काम केले, परंतु नानासाहेब पेशव्यांनी त्यांना महाराष्ट्रात बोलावून घेतले. नारोशंकरांना दिल्लीच्या बादशहाकडून १७५७ साली इनाम म्हणून मिळालेल्या आठ गावांपैकी मालेगावात वाडा बांधण्यासाठी पेशव्यांकडे परवानगी मागितली व वाडा न बांधता भव्य भुईकोट किला बांधला.हे पेशव्यांना आवडले नाही. म्हणून त्यांनी आपला एक खास दूत पाठवून किल्ला त्याच्या हवाली करावा अशी सूचना केली. पेशव्यांचा वकील किल्ल्याची वास्तुशांती होती त्याच दिवशी पोहोचला. नारोशंकर दुसऱ्या दिवशीच आपल्या कुटुंब कबिल्यासह किल्ल्यात राहायला जाणार होते. पण पेशव्यांचे पत्र मिळताच नारोशंकरांनी किल्ला दूताच्या हवाली केला व दूतासोबत एक पत्र पेशव्यांना पाठवले व त्यांची क्षमा मागून फक्त एक धार्मिक विधी करण्याची परवानगी पेशव्यांकडे मागितली. हे पत्र पाहताच पेशव्यांचा राग शांत झाला व त्यांनी नारोशंकरांना वास्तुशांती करून किल्ल्यात राहण्याची परवानगी दिली.१८१८ मध्ये इंग्रजांच्या वतीने किल्ला घेण्यासाठी १३०० सैनिक व २५० बंदुकधारी घेऊन लेफ्टनंट मॅकडोवेल किल्ल्यावर चालून आला. तेव्हा किल्ल्यात अरबांची शिबंदी होती. इंग्रजांनी बरेच प्रयत्न करून काही उपयोग झाला नाही. या युद्धात इंग्रजांचे ३५ लोक ठार तर १७५ जण जखमी झाले. शेवटी दारूगोळ्याच्या कोठाराला आग लागल्यामुळे नाइलाजाने आतील अरबांनी १३ जून १८१८ रोजी हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात दिला.- : गडावर जाण्याच्या वाटा :-नाशिक जिल्ह्यातील मालेगाव (माहुलीग्राम) ला पोहोचावे. तेथून रिक्षाने किल्ल्यासमोर यावे. मोसम पुलाच्या काठावर हा किल्ला असल्याने शोधण्यास काहीच अडचण येत नाही.गडदर्शनया किल्ल्याला तीन कोट होते. आतील कोट अतिशय मजबूत असून आजही नवीन कोटासारखा दिसतो. त्याच्या भोवताली खंदक व आत पुन्हा परकोट होता. त्यात घोड्यांची पागा होती, त्याची उंची १० फूट होती. आपण हा भग्न तट पाहून शेजारच्या चार अजस्र तोफा पाहाव्यात.किल्ल्याच्या मध्यभागी काकणी महाविद्यालय भरते. त्यामुळे परवानगी घेऊन किल्ल्यात प्रवेश मिळतो. सुरुवातीला शाळेबाहेरून किल्ल्याच्या बाहेरील तट व इमारत यामधील प्रशस्त वाटेने फेरी मारून घ्यावी. या किल्ल्याच्या रक्षणासाठी नारोशंकरांनी बाराही महिने वाहत असलेल्या गिरणा व मोसम नदीच्या संगमावर भिंत बांधली. ते पाणी अडवून किल्ल्याच्या खंदकात येईल अशी व्यवस्था केली होती. सध्या खंदक पूर्ण बुजला आहे.हे सर्व पाहून प्रवेशद्वारात यावे. शाळेच्या कार्यालयाबाहेरील भिंतीवर नारोशंकरांचे तैलचित्र आहे. शाळेच्या प्रशासनाने जो भाग शाळेच्या वापरात आहे तोच भाग खुला ठेवला आहे, उर्वरित भाग कुलूपबंद आहे. किल्ला आतून बघण्यासाठी विनंती केल्यावर आपणास कुलूप उघडून दिले जाते. येथे रंगमहाल असून डोळ्यांचे पारणे फेडणारे दोन भव्य दरवाजे दिसतात. भिंतीच्या आत बांधलेले भुयारी दगडी जिने, गडाच्या उत्तर बाजूचा भक्कम दरवाजा, पूर्व बाजूच्या दरवाजावर असणारी गच्ची व राजस्थानी किल्ल्यांची प्रतिकृती दाखवणाऱ्या नक्षीदार भव्य छत्र्या पाहायला मिळतात.