शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

घोडबंदर येथील १५० घरांवर वनविभागाची टाच

By admin | Updated: November 17, 2016 17:40 IST

घोडबंदर येथील वनविभागाच्या जागेवर १९९५ पुर्वी वसलेल्या सुमारे १५० घरांवर विभागाने यंदा टाच आणली आहे.

राजू काळेभाईंदर, दि. 17  - घोडबंदर येथील वनविभागाच्या जागेवर १९९५ पुर्वी वसलेल्या सुमारे १५० घरांवर विभागाने यंदा टाच आणली आहे. ही घरे वाचविण्यासाठी स्थानिक नगरसेविका दक्षता ठाकुर व समाजसेवक राजेंद्र ठाकुर यांच्या माध्यमातुन वनअधिकाऱ्यांकडे धावाधाव सुरु केली आहे. बाधितांनी वनविभागाकडे नियमानुसार सुमारे ७ हजारांची रक्कम न भरल्यानेच त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा बाधितांनी केला आहे.

ही घरे हटविण्यासाठी वनविभागाने १५ नोव्हेंबरला आपल्या हद्दीतील जागेचे सर्व्हेक्षण केले होते. त्यानंतर हि घरे हटविण्यासाठी स्थानिकांना १९ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तशी नोटीस तेथे लावण्यात आल्याने बाधितांनी त्याला विरोध केला आहे. या जागेवर १९९५ पुर्वीची सुमारे २५० घरे नियमित करण्यात आली होती. त्यावेळी वनविभागाने उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार लाभार्थ्यांना कायदेशीर सुमारे ७ हजार रुपयांची रक्कम भरण्यास सांगितले होते. त्यातील सुमारे १०० घरांकडुन ती रक्कम वनविभागाकडे जमा करण्यात आली. उर्वरीत घरांनी ती रक्कम न भरल्याने रक्कम त्वरीत जमा करण्यासाठी वनविभागाकडुन अनेकदा मुदतवाढ देण्यात आली. परंतु, ती रक्कम जमा न झाल्याने अखेर १५ नोव्हेंबरला विभागाने पुन्हा हद्दीतील जागेचा सर्व्हे केला. त्यावेळी सुमारे १५० घरे बेकायदेशीर असल्याचा दावा करुन ती तेथुन हटविण्यासाठी नोटीस बजावली आहे. त्यासाठी १९९५ मधील उच्च न्यायालयाचा आधार घेण्यात आला आहे.

दरम्यान ज्यांनी रक्कम अदा केली अशा ९० जणांचे वनविभागाने अंधेरीच्या चकाला परिसरात पुर्नवसन केले. तत्पुर्वी राज्य सरकारच्या आदेशाने १९९५ पर्यंतची बांधकामे नियमित करण्याच्या अनुषंगाने १९७० ते १९८९ मध्ये विभागाने सर्व्हे केला होता. त्यावेळी सर्वांचे पुर्नवसन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे निश्चिंत झालेल्यांना यंदा ती रक्कम न भरलेल्यामुळे हद्दपार करण्याचा डाव साधला जात असल्याचा आरोप बाधितांकडुन करण्यात येऊ लागला आहे. विभागाच्या या निर्णयाने बाधितांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. त्यातच १५ नोव्हेंबरला करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात वनविभागाच्या हद्दीबाहेरील जागाही विभागाच्या हद्दीमध्ये दर्शविण्यात आल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.

या जागेवर वसलेली घरे नियमानुसार असतानाही केवळ न्यायालयाच्या आदेशाची दिशाभुल करुन वनविभाग चुकीच्या सर्व्हेक्षणातुन लोकांना विस्थापित करीत असल्याचा आरोप राजेंद्र ठाकूर यांनी केला आहे. कायदेशीर असुनही घरे पाडली जाणार, या भितीने स्थानिकांनी नगरसेविका दक्षता ठाकूर यांच्या माध्यमातुन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वनसंरक्षक अन्वर अहमद यांची बुधवारी भेट घेतली. त्यावेळी बाधितांनी संबंधित जागा गावठाणात येत असल्याने १५ नोव्हेंबरला करण्यात आलेले सर्व्हेक्षण चुकीचे असल्याचा दावा केला आहे. या जागेची मोजणी वनविभागाने भुमीअभिलेखा विभागासोबत संयुक्तपणे करावी. तसेच न्यायालयाच्या आदेशात १९९५ पुर्वीच्या बांधकामांना नियमित करण्यात आले असताना विभागाकडुन होणाय््राा कारवाईला त्वरीत स्थगिती द्यावी, अशी मागणी केली. यावर वनसंरक्षकांनी न्यायालयाचा आदेश पाहुनच कार्यवाही निश्चित केली जाईल, असे आश्वासन बाधितांना दिल्याचे राजेंद्र यांनी सांगितले. याबाबत वनसंरक्षकांना दुरध्वनीद्वारे संपर्क साधला ते मिटींगसाठी बाहेर गेल्याचे सांगण्यात आले.