शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

घोडबंदर येथील १५० घरांवर वनविभागाची टाच

By admin | Updated: November 17, 2016 17:40 IST

घोडबंदर येथील वनविभागाच्या जागेवर १९९५ पुर्वी वसलेल्या सुमारे १५० घरांवर विभागाने यंदा टाच आणली आहे.

राजू काळेभाईंदर, दि. 17  - घोडबंदर येथील वनविभागाच्या जागेवर १९९५ पुर्वी वसलेल्या सुमारे १५० घरांवर विभागाने यंदा टाच आणली आहे. ही घरे वाचविण्यासाठी स्थानिक नगरसेविका दक्षता ठाकुर व समाजसेवक राजेंद्र ठाकुर यांच्या माध्यमातुन वनअधिकाऱ्यांकडे धावाधाव सुरु केली आहे. बाधितांनी वनविभागाकडे नियमानुसार सुमारे ७ हजारांची रक्कम न भरल्यानेच त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा बाधितांनी केला आहे.

ही घरे हटविण्यासाठी वनविभागाने १५ नोव्हेंबरला आपल्या हद्दीतील जागेचे सर्व्हेक्षण केले होते. त्यानंतर हि घरे हटविण्यासाठी स्थानिकांना १९ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तशी नोटीस तेथे लावण्यात आल्याने बाधितांनी त्याला विरोध केला आहे. या जागेवर १९९५ पुर्वीची सुमारे २५० घरे नियमित करण्यात आली होती. त्यावेळी वनविभागाने उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार लाभार्थ्यांना कायदेशीर सुमारे ७ हजार रुपयांची रक्कम भरण्यास सांगितले होते. त्यातील सुमारे १०० घरांकडुन ती रक्कम वनविभागाकडे जमा करण्यात आली. उर्वरीत घरांनी ती रक्कम न भरल्याने रक्कम त्वरीत जमा करण्यासाठी वनविभागाकडुन अनेकदा मुदतवाढ देण्यात आली. परंतु, ती रक्कम जमा न झाल्याने अखेर १५ नोव्हेंबरला विभागाने पुन्हा हद्दीतील जागेचा सर्व्हे केला. त्यावेळी सुमारे १५० घरे बेकायदेशीर असल्याचा दावा करुन ती तेथुन हटविण्यासाठी नोटीस बजावली आहे. त्यासाठी १९९५ मधील उच्च न्यायालयाचा आधार घेण्यात आला आहे.

दरम्यान ज्यांनी रक्कम अदा केली अशा ९० जणांचे वनविभागाने अंधेरीच्या चकाला परिसरात पुर्नवसन केले. तत्पुर्वी राज्य सरकारच्या आदेशाने १९९५ पर्यंतची बांधकामे नियमित करण्याच्या अनुषंगाने १९७० ते १९८९ मध्ये विभागाने सर्व्हे केला होता. त्यावेळी सर्वांचे पुर्नवसन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे निश्चिंत झालेल्यांना यंदा ती रक्कम न भरलेल्यामुळे हद्दपार करण्याचा डाव साधला जात असल्याचा आरोप बाधितांकडुन करण्यात येऊ लागला आहे. विभागाच्या या निर्णयाने बाधितांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. त्यातच १५ नोव्हेंबरला करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात वनविभागाच्या हद्दीबाहेरील जागाही विभागाच्या हद्दीमध्ये दर्शविण्यात आल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.

या जागेवर वसलेली घरे नियमानुसार असतानाही केवळ न्यायालयाच्या आदेशाची दिशाभुल करुन वनविभाग चुकीच्या सर्व्हेक्षणातुन लोकांना विस्थापित करीत असल्याचा आरोप राजेंद्र ठाकूर यांनी केला आहे. कायदेशीर असुनही घरे पाडली जाणार, या भितीने स्थानिकांनी नगरसेविका दक्षता ठाकूर यांच्या माध्यमातुन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वनसंरक्षक अन्वर अहमद यांची बुधवारी भेट घेतली. त्यावेळी बाधितांनी संबंधित जागा गावठाणात येत असल्याने १५ नोव्हेंबरला करण्यात आलेले सर्व्हेक्षण चुकीचे असल्याचा दावा केला आहे. या जागेची मोजणी वनविभागाने भुमीअभिलेखा विभागासोबत संयुक्तपणे करावी. तसेच न्यायालयाच्या आदेशात १९९५ पुर्वीच्या बांधकामांना नियमित करण्यात आले असताना विभागाकडुन होणाय््राा कारवाईला त्वरीत स्थगिती द्यावी, अशी मागणी केली. यावर वनसंरक्षकांनी न्यायालयाचा आदेश पाहुनच कार्यवाही निश्चित केली जाईल, असे आश्वासन बाधितांना दिल्याचे राजेंद्र यांनी सांगितले. याबाबत वनसंरक्षकांना दुरध्वनीद्वारे संपर्क साधला ते मिटींगसाठी बाहेर गेल्याचे सांगण्यात आले.