शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेल"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
4
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
5
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
6
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
7
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
8
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
9
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
10
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
11
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
12
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
13
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
14
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
15
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
16
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
17
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
18
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
19
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
20
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'

शेतकऱ्यांची ओंजळ रिकामीच!

By admin | Updated: March 29, 2016 01:48 IST

वरुणराजाच्या अवकृपेमुळे दुष्काळ मराठवाड्याची पाठ सोडत नसल्याने शेतीतून हाती काही उत्पन्न मिळणे तर दूरच, शेतीवर केलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे. उ

- दत्ता थोरे, विशास सोनटक्के, प्रताप नलावडे ; लातूर, उस्मानाबाद, बीड

वरुणराजाच्या अवकृपेमुळे दुष्काळ मराठवाड्याची पाठ सोडत नसल्याने शेतीतून हाती काही उत्पन्न मिळणे तर दूरच, शेतीवर केलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे. उस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्यांमध्ये कृषीउत्पादनात कमालीची घट झाली आहे. गत पाच वर्षांपासून उस्मानाबाद जिल्हा तीव्र दुष्काळाचा सामना करीत आहे. शेतमालाचे घसरलेले दर, बियाणे, खते, मजुरी तसेच मालवाहतुकीच्या खर्चात झालेली भरमसाठ वाढ आणि त्यातच पिकांच्या उत्पादनात घट आली आहे. याच कारणामुळे मागील वर्षी दीडशेपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंद झाली आहे. रबीचा जिल्हा म्हणून उस्मानाबादची ओळख आहे.मात्र रब्बी हंगामातील पीक उत्पादकतेत पाच वर्षांत सुमारे ५५ टक्क्यांहून अधिकची घट झाल्याचे कृषी विभागाची आकडेवारी सांगते.खरीप हंगामात जिल्ह्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा घेतला जातो. २०१४ मध्ये १ लाख ९२ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला. हीच परिस्थिती २०१५मध्येही कायम होती. तांदळाच्या उत्पादनात ७०, बाजरी ६१, मका ५९, मुग ५० तर उडीद ४६ तर सोयाबीन व ज्वारीच्या उत्पादनात तब्बल ६६ टक्क्यांनी घट झाली. लातूर जिल्ह्याला दुष्काळी फटका गेल्या तीन वर्षांचा. ज्या शेतात एकरी १५ ते २० क्विंटल धान्य निघायचे तिथे सध्या एकरात दोन क्विंटलही धान्य शेतकऱ्यांच्या पदरी पडत नाही. दोन वर्षांपूर्वी ३१ लाख ९१ हजार ३२९ क्विंटल धान्याची जिथे आवक झाली होती; त्या लातूर कृषीउत्पन्न बाजार समितीत यंदा १९ लाख ५५ हजार ८१० क्ंिटलचीच आवक झाली. या काळात जवळपास ४० टक्क्यांनी घट नोंदवली गेल्याचे बाजार समितीचे अध्यक्ष रतीलाल शहा यांनी सांगितले. लातूरमध्ये खरिपाचे एकूण क्षेत्र ५ लाख ५६ हजार हेक्टर. त्यात यंदा घट होऊन पेराच चार लाख ९० हजार हेक्टरवर झाला. दीड लाख हेक्टरवर दुबार पेरणी करावी लागली; पण तीही वाया गेली. लातूरची बाजारपेठ ही सोयाबीन आणि हरभरा केंद्री असते. २०१३-१४ साली १६ लाख लाख ८६ हजार ९९९ क्विंटल सोयाबीन आले होते. तर २०१५-१६ साली बाजार समितीत फक्त नऊ लाख ५० हजार ६३८ क्विंटल सोयाबीन आले. यातील अर्धे सोयाबीन कर्नाटक तर अर्धे जिल्ह्यातून उत्पादित झालेले आहे. यंदा जिल्ह्यातील ९४७ म्हणजे सर्वच्या सर्व गावांची आणेवारी ही ५० टक्क्यांच्या आत आहे.बीड जिल्ह्यात यावर्षी सरासरी निम्माही पाऊस झाला नाही. परिणामी कृषीउत्पादनात सरासरी तिपटीने घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणितच कोलमडले आहे. त्याच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर यंदा आणखी वाढला आहे. जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, ज्वारी आणि बाजरीचे प्रामुख्याने उत्पादन घेतले जाते. यावर्षी चार लाख २० हजार हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. मागील तुलनेत कापसाची लागवड वाढली असली तरी शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागलेले नाही. जानेवारीत बाजारामध्ये ज्वारीची आवक १२०० क्विंटल, गावरान बाजरी १९३ क्विंटल, हायब्रीड ज्वारी १२११, गहू ५१ क्विंटल तर तूरीची तीन हजार क्विंटल इतकी आवक झाली होती. गत तीन वर्षांच्या तुलनेत ही सर्व आवक तिपटीने घटली आहे. बालाघाटच्या डोंगररांगात सीताफळाचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होते. या फळालाही दुष्काळाचा फटका बसला आहे.च्जिल्ह्यातून डेअरीसाठी अडीच लाख लिटर दूध दररोज जात होते. आता यात एक लाख लिटर दूधाची घट झाली असून दररोजचे दूध संकलन दीड लाखावर आले आहे.