शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

खरेच हा समाज सुसंस्कृत आहे का - मुणगेकर

By admin | Updated: October 15, 2016 03:31 IST

बलात्काराचे गांभीर्य जातीवर ठरविले जाणार असेल आणि ज्या जातीच्या मुलीवर बलात्कार होईल त्यांच्याकडून मोर्चा काढला जात असेल तर हा समाज

पुणे : बलात्काराचे गांभीर्य जातीवर ठरविले जाणार असेल आणि ज्या जातीच्या मुलीवर बलात्कार होईल त्यांच्याकडून मोर्चा काढला जात असेल तर हा समाज खरेच सुसंस्कृत आहे का, असा परखड सवाल माजी खासदार व नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी शुक्रवारी येथे केला.नागपूर येथील मारवाडी फाऊंडेशनतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी व्यासपीठावर उपस्थित होते. महिला कोणत्याही जातीची असो तिच्याकडे वाकड्या नजरेने पाहू नये. बलात्कार हा मानवी समाजाचा कलंक आहे, वेदना जर जातीवर अवलंबून ठरत असतील तर तो समाज संवेदनशील नाही. मराठा मुली जिजाऊंच्या मुली आहेत तर मग इतरांच्या मुली कोण? पाटणमध्ये (सातारा) झालेल्या मसापच्या साहित्य संमेलनातून कसबे आणि संमेलनाध्यक्ष प्रज्ञा दया पवार यांना हाकलून देण्यात आले; ही कुठली लोकशाही आहे? महाराष्ट्रात लोकांनी काही बोलायचे की नाही? शिवाजी महाराजांवर कुणाला काही बोलायचे असेल तर त्याने बोलायचे की नाही? असे सवालही त्यांनी केले. डॉ. आंबेडकरांच्या विचारांना घेऊन काम करणाऱ्या डॉ. कसबे यांनी जातीसोबतच वर्गसंघर्षाची बाजू देखील मांडली. मानवी समाजाच्या अज्ञानातून धर्माची उत्पत्ती झाली आहे, अशी धर्मचिकित्सादेखील केली असे सांगून प्रामाणिक विचार स्वातंत्र्यावर जेव्हा गदा येते तेव्हा फॅसिझम सुरू होतो, त्याआधीच आपण थांबायला हवे, असेही मुणगेकर यांनी सांगितले. डॉ. कसबे म्हणाले, ‘‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून गांधीजींना चुकीच्या पद्धतीने समोर आणले जात आहे. गांधीजींनी भारतीय स्वातंत्र्याची चळवळ जनचळवळ केली आणि फॅसिझमला रोखले. कारण फॅसिझम आला असता तर सामंतशाही टिकली असती. ब्राम्हणांचे श्रेष्ठत्व गेले म्हणूनच युती करून गांधींना बदनाम करण्याचे षडयंत्र आखले जात आहे.’’डॉ. कसबे यांनी साहित्यातून समाजाची शस्त्रक्रिया केली आहे, अशा शब्दात सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांचा गौरव केला. (प्रतिनिधी)