शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्टीकरण आणा!

By admin | Updated: June 25, 2016 03:30 IST

दहीहंडीमध्ये लावण्यात येणाऱ्या मानवी मनोऱ्यांबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाकडूनच स्पष्टीकरण घेऊन या, असे निर्देश उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारला दिले.

मुंबई : दहीहंडीमध्ये लावण्यात येणाऱ्या मानवी मनोऱ्यांबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाकडूनच स्पष्टीकरण घेऊन या, असे निर्देश उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारला दिले.दहीहंडीसाठी २० फुटांपर्यंतच मानवी मनोरे रचण्याचा निर्बंध उच्च न्यायालयाने घालूनही २०१५ मध्ये अनेक आयोजकांनी या आदेशाचे उल्लंघन केले. त्याविरुद्ध मूळ याचिकाकर्त्या स्वाती पाटील यांनी उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाच्या या आदेशाला सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली. त्यानंतर याचिका निकाली काढली. सर्वोच्च न्यायालयाने आदेशात उच्च न्यायालयाने मानवी मनोऱ्यांवर घातलेल्या निर्बंधासंबंधी काहीही उल्लेख न केल्याने उच्च न्यायालयाचा आदेश लागू होत नाही, असे सरकारचे म्हणणे आहे. तर न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयाने काहीही उल्लेख न केल्याने आधीचा आदेश लागू होतो, असे म्हटले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत उच्च न्यायालय आणि राज्य सरकारचे वेगळे मत असल्याने खंडपीठाने सरकारला या आदेशाबाबत स्पष्टीकरण घेण्यासाठी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले.दरम्यान, स्वाती पाटील यांनी आदेशाचे पालन न करण्यात आल्याबद्दल मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, धर्मादाय आयुक्त, पोलीस महासंचालक, महापालिका आयुक्त आणि महापालिका सचिव तसेच भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर अवमानाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही याचिकेद्वारे केली आहे.त्यावर खंडपीठाने मुख्य सचिव, धर्मदाय आयुक्त, पोलीस महासंचालक, महापालिका आयुक्त आणि महापालिका सचिव यांनी कशाप्रकारे उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले नाही, हे याचिकाकर्त्याने स्पष्ट न केल्याने यांच्याविरुद्ध कारवाई करण्यास नकार दिला. मात्र आशिष शेलार यांना सध्यातरी दिलासा देण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष गणेश पांडे यांनी दहीहंडी आयोजित करण्यापूर्वी शेलार यांच्याकडे अर्ज केला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात येत आहे, हे माहिती असून सुद्धा शेलार यांनी पांडे यांना थांबवले नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने शेलार यांना यापुढे अशाप्रकारचे बेकायदेशीर कार्यक्रमांमध्ये सहभागी न होण्याची हमी देण्यास सांगितले. मात्र तशी हमी शेलार यांच्या वकिलांनी शुक्रवारच्या सुनावणीत न दिल्याने खंडपीठाने त्यांना दिलासा दिला नाही. तर गणेश पांडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी २९ जुलै रोजी ठेवली आहे.