शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
5
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
6
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
7
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
8
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
9
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
10
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
11
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
12
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
13
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
14
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
15
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
16
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
17
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
18
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
19
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
20
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?

शेतकरी उत्पन्न आयोग गठित करून उत्पन्नाची हमी द्या!

By admin | Updated: September 15, 2016 02:03 IST

किसान एकता; अकोल्यातील राष्ट्रीय अधिवेशनात निर्णयाची शर्मा यांनी दिली माहिती.

अकोला, दि. १४ - देशभरातील शेतकरी त्यांचे विविध प्रश्न व समस्या घेऊन राज्य स्तरावरील संघटनांच्या माध्यमातून संबंधित शासनाच्या विरोधात आवाज उठवत असतात. या सर्व संघटनांना एकत्र करून शेतकर्‍यांचा आवाज व ताकद बुलंद करण्याच्या दृष्टीनेच किसान एकता हा मंच तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून देशभरातील शेतकर्‍यांच्या ६0 संघटना एकत्र आल्या आहेत. या संघटनांचे चौथे राष्ट्रीय अधिवेशन अकोल्यात पार पडले असून, यामध्ये स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीसह तेलबिया, डाळी यांच्यावरील आयात कर वाढविण्याची मागणी करतानाच सरकारी कर्मचार्‍यांना वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार दरमहा वेतन दिले जाते. त्यामुळे शेतकर्‍यांसाठीसुद्धा शेतकरी उत्पन्न आयोग गठित करून त्याुनसार शेतकर्‍यांना शेतमजूर व मासेमारी करणार्‍या मजुरांना दरमहा उत्पन्नाची हमी देण्यात यावी, अशी मागणी करण्याचा ठराव घेण्यात आला आहे, अशी माहिती किसान एकताच्यावतीने ज्येष्ठ पत्रकार व शेती प्रश्नाचे अभ्यासक देवेंद्र शर्मा यांनी दिली. जिल्हा पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शेतकरी नेते विजय जावंधीया, प्रकाश पोहरे, भारतीय किसान युनियनचे सरचिटणीस ओंकारसिंग, दक्षिण भारतीय ऊस उत्पादक महासंघ तामिळनाडूचे अध्यक्ष राजकुमार, मध्य प्रदेशचे केदार सिरोही, केरळचे ङ्म्रीधर, माजी आमदार वसंतराव गोडे आदी उपस्थित होते. शर्मा यांनी किसान एकताच्या निर्मितीचा आढावा घेत चंदीगड, शिमला या अधिवशेनानंतर अकोल्यात झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनाचा वृत्तांत दिला. देशभरात शेतकर्‍यांच्या प्रश्नावर लढणार्‍या ६५ संघटना व पक्ष असून, या सर्वांना एका व्यासपीठावर आणण्याचे प्रयत्न यशस्वी झाले असून, यावेळी तब्बल ६0 संघटनांच्या प्रतिनिधींनी अधिवेशनात भाग घेतला आहे. ही ताकद येणार्‍या काळात शेतकर्‍यांचा आवाज राष्ट्रीय स्तरावर बुलंद करेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. या अधिवेशनात स्वामीनाथन आयोगाने केलेल्या उत्पादन खर्चाव्यतिरिक्त ५0 टक्के नफा शेतकर्‍यांना मिळावा व सरकारने दिलेल्या शब्दाला जागावे, अशी मागणी केली आहे. जमीन अधिग्रहण कायदा हा शेतकर्‍यांच्या मुळावर आला असून, या कायद्यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नाचे साधन असलेली जमीन हिरावण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे या कायद्याची अंमलबजावणी थांबविण्याचीही मागणी त्यांनी केली.मोहरीमध्ये जीएम तंत्रज्ञानाला मान्यता नको!केंद्र सरकार मोहरीच्या वाणामध्ये जीएम तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न करीत आहे. या प्रस्तावाला मान्यता देण्यात येऊ नये, तसेच देशात दर्जेदार तेलबियांचे उत्पादन होऊन शेतकर्‍यांचा उत्पादन खर्च भरून निघेल, अशी व्यवस्था निर्माण केली तर पिवळी क्रांती होऊन देश पुन्हा एकदा खाद्यतेलामध्ये स्वयंपूर्ण होईल, अशी मागणी करण्यात आली.