शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

अभियंत्यांची झाडाझडती

By admin | Updated: June 10, 2016 02:42 IST

महापालिका आयुक्त तुकाराम मुंंढे यांनी बुधवारी अभियांत्रिकी विभागाची सलग आठ तास मॅरेथॉन बैठक घेतली.

नामदेव मोरे,

नवी मुंबई- महापालिका आयुक्त तुकाराम मुंंढे यांनी बुधवारी अभियांत्रिकी विभागाची सलग आठ तास मॅरेथॉन बैठक घेतली. शहरातील रखडलेल्या विकास कामांविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. यापुढे कोणत्याही कामाला विनाकारण मुदतवाढ दिली जाणार नाही. कामे वेळेत व दर्जेदारच झाली पाहिजेत असे स्पष्ट आदेश देवून निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमधील एकाही मोठ्या प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण झालेले नाही. प्रत्येक ठेकेदाराला वारंवार मुदतवाढ दिली जाते. धीम्यागतीने कामे होत असल्याने वाढीव खर्चाचा भार तिजोरीवर पडू लागला आहे. ऐरोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, नेरूळ, बेलापूर, ऐरोलीमधील रूग्णालये, वाशीतील तरणतलाव, पामबीच रोडवरील सुशोभीकरण, एमआयडीसीतील काँक्रीटीकरणाची कामे अत्यंत धीम्या गतीने सुरू आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच प्रत्येक काम वेळेतच झाले पाहिजे असे स्पष्ट आदेश दिले होते. बुधवारी अभियांत्रिकी विभागाची विशेष बैठक आयोजित केली होती. सकाळी दहा वाजता सुरू झालेली बैठक सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू होती. यामध्ये सर्व प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. काम कधी सुरू झाले, सद्यस्थिती काय आहे. कामे वेळेत का पूर्ण झाली नाहीत. वारंवार मुदतवाढ का देण्यात येत आहे अशी प्रश्नांची सरबत्ती अधिकाऱ्यांना केली. जनतेच्या पैशाचा योग्य वापर झाला पाहिजे. कामे रखडल्याने कामांच्या किमती वाढत असल्याबद्दलही तीव्र नाराजी व्यक्त केली. निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना तत्काळ कारणेदाखवा नोटीस बजावली आहे. आयुक्तांनी अत्यंत कडक शब्दात अधिकाऱ्यांना धारेवर धरले. आयुक्तांनी बरोबर चुकांवर बोट ठेवल्याने उत्तर देताना अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली.आयुक्तांनी अभियांत्रिकी विभागाला फैलावर घेवून यापुढे कोणत्याही स्थितीमध्ये कामामध्ये दिरंगाई चालणार नाही. दिलेल्या मुदतीमध्येच कामे पूर्ण झाली पाहिजेत. मुदतवाढ द्यायची असेल तर त्यासाठी सक्षम कारण असले पाहिजे. ठेकेदार निष्काळजीपणा करत असेल तर त्यांना काळ्या यादीत टाकले जाईल. कामांसाठी सद्यस्थितीतील डीसीआरचा अवलंब करण्यात यावा. टेंडर देताना त्यांची प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी व्यवस्थित पाहून घेणे. प्रत्येक कार्यकारी अभियंत्यांनी त्यांच्या विभागातच बसले पाहिजे. शहर अभियंत्यांनी प्रत्येक आठवड्याला आढावा बैठक घेण्यात यावी असे स्पष्ट केले. आयुक्त स्वत: प्रत्येक महिन्याला कामाचा आढावा घेणार आहेत. आयुक्तांनी घेतलेल्या भूमिकेमुळे प्रशासनाचे व ठेकेदारांचेही धाबे दणाणले आहे. अधिकाऱ्यांनी तत्काळ सर्व ठेकेदारांना कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यापुढे विकासकामे करताना कामाची खरोखर गरज आहे का याची पाहणी करणे. जिथे काम करायचे तेथील छायाचित्र घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. >पहिल्यांदा आठ तास बैठकमहापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सकाळी दहा वाजता अभियांत्रिकी विभागाची बैठक सुरू केली. सायंकाळी सहापर्यंत सर्व विभागातील अभियंते व त्यांच्याकडील सुरू असलेली कामे, रखडलेली कामे यांचा तपशीलवार आढावा घेतला. रखडलेल्या कामांविषयी तीव्र नाराजी व्यक्त करून ती वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले. >८३ कोटींचा खर्च १७० कोटींवर तीन रूग्णालयांचे काम २००९ मध्ये सुरू केले. यासाठी ८३ कोटींचा ठेका देण्यात आला होता. परंतु काम रखडल्याने २०१५ पर्यंत या कामासाठी १७० कोटींचा खर्च केला. वैद्यकीय साहित्य, फर्निचर व इतर कामांसाठी केलेला खर्च विचारात घेतल्यानंतर हा खर्च २०० कोटी रूपयांपेक्षा जास्त झाला असून या जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई कोण व कधी करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.