शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

दापोलीच्या ‘मृणाल’ने केली लाखो मधमाशांशी गट्टी

By admin | Updated: October 2, 2014 22:42 IST

मधमाशा माणसासाठी हानिकारक नाहीत-चावत नाहीत,अंधश्रद्धेतून त्यांना जाळून टाकतो

शिवाजी गोरे - दापोली--मधमाशी हा पर्यावरणातील परागकणांची देवाणघेवाण करणारा महत्त्वाचा घटक आहे. परंतु वाढत्या जंगलतोडीमुळे कधीकाळी जंगलातील झाडावर दिसणारे मधाचे पोळे आता शहरातील काँक्रीटच्या इमारतीवर दिसू लागले आहे. मात्र, गैरसमजामुळे केमिकलचा वापर करुन तर कधी त्यांना जाळण्यात येऊ लागल्याने त्यांची घटती संख्या पर्यावरणाच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनली आहे. मृणाल खानविलकर यांनी त्यांचे संवर्धन करण्याचा ध्यास घेतला असून, गेल्या ७ वर्षात ५० लाख मधमाशांना जीवदान देण्याचे कार्य त्यांनी केले आहे.मिलिंद खानविलकर व मृणाल खानविलकर हे सुशिक्षित दाम्पत्य पर्यावरणाच्या रक्षणासाठी गेली ७ वर्षे मधमाशी मित्र म्हणून काम करत आहे. मधमाशांच्या पोळ्यावर केमिकलचा स्प्रे मारुन त्यांना हटवले जाते. त्यामुळे दिवसेंदिवस त्यांची संख्या घटू लागली आहे तर दुसरीकडे वाढत्या जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊन मधमाशांचे जंगलातील अधिवास नष्ट होऊ लागल्याने एकेकाळी नैसर्गिकरित्या झाडावर पोळ तयार करुन ठराविक कालावधीनंतर दुसरीकडे उडून जाणाऱ्या मधमाशांचे जीवन धोक्यात आले आहे. वस्तीस्थान धोक्यात येऊ लागल्याने मधमाशा आता मिळेल त्या ठिकाणी पोळं तयार करू लागल्या आहेत.जंगलातील मधमाशा शहरातील आता काँक्रीटच्या इमारतीला बसून आपले मधाचे पोळ तयार करु लागल्या आहेत. परंतु इमारतीला मधमाशांचे पोळ अशुभ मानले जाऊ लागल्याने इमारतीतील लोक मधमाशी घालवण्यासाठी त्यांच्यावर केमिकलचा स्प्रे मारुन, तर कधी त्यांना जाळून त्यांचे अस्तित्व नष्ट करत आहेत. निसर्गाच्या चक्रातील महत्त्वाचा घटक नष्ट होऊ नये, यासाठी माशा वाचवण्यासाठी समाजात जनजागृतीचे काम मृणाल खानविलकर यांनी सुरु ठेवले आहे. मधमाशा या शेतकऱ्याच्या मित्र आहेत. त्या वाचल्या पाहिजेत. यासाठी इमारतीवर बसलेले मधाचे पोळे कसल्याही केमिकलचा किंवा जाळाचा वापर न करता त्यांना जीवदान देण्याचे काम त्या करीत आहेत. कुठेही मधमाशीचे पोळ दिसल्यास केवळ एक फोन करा. विनामोबदला इमारतीचे पोळ काढून लोकांमध्ये असलेला गैरसमज दूर करुन नैसर्गिकरित्या त्यांची सुटका करण्याचे काम त्या करत आहेत.मधमाशांपासून मध मिळते. हा मध बऱ्याच रोगावर औषध म्हणून वापरला जातो. मध हे केवळ मधमाशाच बनवू शकतात. मधाचे फायदे आयुर्वेदात आपण दैनंदिन जीवनात पाहतो. परंतु त्याचप्रमाणे निसर्गात मधमाशांचे महत्वसुद्धा फार मोठे आहे. त्यासाठी मधमाशा वाचवण्याबरोबरच नैसर्गिक मधही मिळणे गरजेचे आहे. मधमाशांच्या पोळापासून मिळणारा मध गरजूंना देऊन लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना चांगला मध देण्याबरोबरच त्यांचा जीव वाचवण्यात त्याना आनंद मिळतो. मधमाशा वाचवण्याची ही मोहीम गेली काही वर्षे राबवत असून या मोहीमेबाबत जागृतीही करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.मधमाशा माणसासाठी हानिकारक नाहीत. त्या कधी कुणालाही चावत नाहीत. परंतु आपण त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतो. अनेक वेळा अंधश्रद्धेतून त्यांना जाळून टाकतो. त्यामुळे त्यांचे जीवनमान धोक्यात आले आहे. निसर्गाच्या रक्षणासाठी मधमाशा जगल्या पाहिजेत.- मृणाल मिलिंद खानविलकर