शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

दापोलीच्या ‘मृणाल’ने केली लाखो मधमाशांशी गट्टी

By admin | Updated: October 2, 2014 22:42 IST

मधमाशा माणसासाठी हानिकारक नाहीत-चावत नाहीत,अंधश्रद्धेतून त्यांना जाळून टाकतो

शिवाजी गोरे - दापोली--मधमाशी हा पर्यावरणातील परागकणांची देवाणघेवाण करणारा महत्त्वाचा घटक आहे. परंतु वाढत्या जंगलतोडीमुळे कधीकाळी जंगलातील झाडावर दिसणारे मधाचे पोळे आता शहरातील काँक्रीटच्या इमारतीवर दिसू लागले आहे. मात्र, गैरसमजामुळे केमिकलचा वापर करुन तर कधी त्यांना जाळण्यात येऊ लागल्याने त्यांची घटती संख्या पर्यावरणाच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनली आहे. मृणाल खानविलकर यांनी त्यांचे संवर्धन करण्याचा ध्यास घेतला असून, गेल्या ७ वर्षात ५० लाख मधमाशांना जीवदान देण्याचे कार्य त्यांनी केले आहे.मिलिंद खानविलकर व मृणाल खानविलकर हे सुशिक्षित दाम्पत्य पर्यावरणाच्या रक्षणासाठी गेली ७ वर्षे मधमाशी मित्र म्हणून काम करत आहे. मधमाशांच्या पोळ्यावर केमिकलचा स्प्रे मारुन त्यांना हटवले जाते. त्यामुळे दिवसेंदिवस त्यांची संख्या घटू लागली आहे तर दुसरीकडे वाढत्या जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊन मधमाशांचे जंगलातील अधिवास नष्ट होऊ लागल्याने एकेकाळी नैसर्गिकरित्या झाडावर पोळ तयार करुन ठराविक कालावधीनंतर दुसरीकडे उडून जाणाऱ्या मधमाशांचे जीवन धोक्यात आले आहे. वस्तीस्थान धोक्यात येऊ लागल्याने मधमाशा आता मिळेल त्या ठिकाणी पोळं तयार करू लागल्या आहेत.जंगलातील मधमाशा शहरातील आता काँक्रीटच्या इमारतीला बसून आपले मधाचे पोळ तयार करु लागल्या आहेत. परंतु इमारतीला मधमाशांचे पोळ अशुभ मानले जाऊ लागल्याने इमारतीतील लोक मधमाशी घालवण्यासाठी त्यांच्यावर केमिकलचा स्प्रे मारुन, तर कधी त्यांना जाळून त्यांचे अस्तित्व नष्ट करत आहेत. निसर्गाच्या चक्रातील महत्त्वाचा घटक नष्ट होऊ नये, यासाठी माशा वाचवण्यासाठी समाजात जनजागृतीचे काम मृणाल खानविलकर यांनी सुरु ठेवले आहे. मधमाशा या शेतकऱ्याच्या मित्र आहेत. त्या वाचल्या पाहिजेत. यासाठी इमारतीवर बसलेले मधाचे पोळे कसल्याही केमिकलचा किंवा जाळाचा वापर न करता त्यांना जीवदान देण्याचे काम त्या करीत आहेत. कुठेही मधमाशीचे पोळ दिसल्यास केवळ एक फोन करा. विनामोबदला इमारतीचे पोळ काढून लोकांमध्ये असलेला गैरसमज दूर करुन नैसर्गिकरित्या त्यांची सुटका करण्याचे काम त्या करत आहेत.मधमाशांपासून मध मिळते. हा मध बऱ्याच रोगावर औषध म्हणून वापरला जातो. मध हे केवळ मधमाशाच बनवू शकतात. मधाचे फायदे आयुर्वेदात आपण दैनंदिन जीवनात पाहतो. परंतु त्याचप्रमाणे निसर्गात मधमाशांचे महत्वसुद्धा फार मोठे आहे. त्यासाठी मधमाशा वाचवण्याबरोबरच नैसर्गिक मधही मिळणे गरजेचे आहे. मधमाशांच्या पोळापासून मिळणारा मध गरजूंना देऊन लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना चांगला मध देण्याबरोबरच त्यांचा जीव वाचवण्यात त्याना आनंद मिळतो. मधमाशा वाचवण्याची ही मोहीम गेली काही वर्षे राबवत असून या मोहीमेबाबत जागृतीही करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.मधमाशा माणसासाठी हानिकारक नाहीत. त्या कधी कुणालाही चावत नाहीत. परंतु आपण त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतो. अनेक वेळा अंधश्रद्धेतून त्यांना जाळून टाकतो. त्यामुळे त्यांचे जीवनमान धोक्यात आले आहे. निसर्गाच्या रक्षणासाठी मधमाशा जगल्या पाहिजेत.- मृणाल मिलिंद खानविलकर