शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

जलसंधारणामुळे पाणीसाठे बनले दमदार

By admin | Updated: June 5, 2017 01:14 IST

खेड तालुक्यातील सांडभोरवाडी, तिन्हेवाडी गावाला भौगोलिक देणगीतून मोठे वनक्षेत्र लाभले आहे

राजगुरुनगर : खेड तालुक्यातील सांडभोरवाडी, तिन्हेवाडी गावाला भौगोलिक देणगीतून मोठे वनक्षेत्र लाभले आहे. त्यात जलसंधारणाच्या कामाबरोबरच वृक्षलागवडही मोठ्या प्रमाणात झाली आहे. डोंगरकुशीत वनतळी, माती बंधारे, सिमेंट बंधारे त्याचबरोबर समतल चर झाल्याने माती, जमिनीची झीज थांबून मुरलेल्या पाण्यामुळे परिसरातील पाणीसाठे दमदार बनले आहेत.काही वर्षांपूर्वी टंचाईग्रस्त असलेल्या या गावात आता उन्हाळी बागायती पिके होऊ लागली आहेत. अन्नधान्याने समृद्धी वाढत असताना पूरक व्यवसायांनादेखील संधी मिळत आहे. दूध व्यवसाय, बी-बियाणे, खते विक्रीच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या संधी गावात उपलब्ध होऊ लागल्या आहेत.गावाच्या उत्तर बाजूने डोंगररांगा आहेत. यामध्ये २१२ हेक्टर वन क्षेत्र आहे. ८२ एकर गायरान आहे. या क्षेत्रात सन २०११ पासून वन विभाग आणि गावातील वनसंरक्षण समितीच्या माध्यमातून विविध प्रजातीची फळे देणारी आणि इमारतीसाठी लाकडाचा उपयोग होणारी ९२ हजार ६०० झाडे लावण्यात आली आहेत. यातील ९५ टक्के झाडे जिवंत आणि चांगल्या स्थितीत आहेत. तसा वन विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाचा अहवाल समितीकडे प्राप्त आहे. महाराष्ट्र शासनाने गतवर्षी २ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केले. त्यात सहभाग घेताना सांडभोरवाडीने एकाच दिवशी ५२ हजार झाडांची लागवड करून विक्रम केला. गावातील महिला, मुलांचा त्यात उल्लेखनीय सहभाग होता.राजगुरुनगर विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी एम. जे. सणस, समितीचे निवृत्त सचिव बाळासाहेब निकम, सचिव आर. गोकुळे या सर्वांचे सहकार्य त्यांना लाभत आहे. या सर्व कामांची दखल घेऊन शासनाने सांडभोरवाडी वन संरक्षण समितीला पुरस्कार देऊन गौरविले आहे. राज्याचे वन, वित्त आणि नियोजनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या हस्ते पुण्यातील विधान भवन येथे २९ मे २०१७ रोजी या वन समितीला राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार समारंभ पूर्वक देण्यात आला. सांडभोरवाडी वन संरक्षण समितीच्या कामाची प्रेरणा इतर गावांनी घेण्यासारखी आहे.या शाळांमधील विद्यार्थीसुद्धा वन विभागाच्या उपक्रमात नेहमीच सहभागी होतात. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गावात वृक्षलागवड आणि संवर्धनाचे उपक्रम साजरे होतात. जनजागृतीतही विद्यार्थी अग्रभागी आहेत. घराभोवतीच्या रिकाम्या जागेत, शेताच्या बांधावर वृक्षलागवड होत आहे. त्याचे संवर्धन करताना विद्यार्थ्यांकडून पालकांकडे आग्रह धरला जातो. स्वयंपाक करण्यासाठी जळाऊ लाकडाची तोड थांबावी म्हणून गरज असेल अशा प्रत्येकाला वन विभागाच्या माध्यमातून वनसमितीने अनुदान तत्त्वावर कायमस्वरूपी गॅसजोड दिले आहेत. आता शंभर टक्के गॅस झाल्याने धूर आणि प्रदूषणमुक्त गाव झाले आहे.वन समितीच्या अध्यक्षा कविता पाचारणे या साडेचार वर्षांपूर्वी सांडभोरवाडीच्या सरपंच झाल्या. त्यानंतर सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन अवघ्या काही महिन्यांतच गावात ‘वनचेतना’ गृहाची उभारणी केली. या केंद्रात वन समितीच्या बैठका पार पडतात. एकत्र आल्याने वनसंवर्धनाचे धोरण आखले जाते. वन समितीच्या माध्यमातून जलसंधारण आणि वृक्षलागवडीची नियोजनबद्ध कामे केल्याने अप्रत्यक्षपणे गावात प्रत्येकाला वन क्षेत्राचा लाभ मिळत आहे.