शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

महावितरणच्या सदोष बिलांमुळे ग्राहकांना भुर्दंड आणि मन:स्ताप

By admin | Updated: June 10, 2016 03:26 IST

येथील महावितरणकडून दिल्या जाणाऱ्या वीजबिलांमध्ये सध्या प्रचंड गोंधळ झाला आहे.

सुनील घरत,

वसई/पारोळ- येथील महावितरणकडून दिल्या जाणाऱ्या वीजबिलांमध्ये सध्या प्रचंड गोंधळ झाला आहे. बिले अव्वाच्या सव्वा देणे, त्यावर मीटरचा फोटो नसणे असला तरी त्यावर तो कधी घेतला त्या तारखेचा उल्लेख नसणे हे प्रकार नेहमीचेच झाले असून, त्याविरुद्ध कोणत्याही क्षणी जनप्रक्षोभ होण्याची शक्यता आहे. वीज बिलविषयक कायद्याची माहिती जनतेला पुरेशी नाही याचा गैरफायदा महावितरण घेते आहे. सध्या सुरु असलेल्या वाढीव बिलाच्या संदर्भात सुद्धा या नियमावलीचे उल्लंघन हाच मुद्दा आहे. मुळात वीज देयक हे ३० दिवसांचे असते आणि वीज बिलावर तशी नोंद असते. परंतु प्रत्यक्षात काही वेळा मीटर रीडिंग हे ३५ ते ४० दिवसांनी घेतले जाते तर पुढील महिन्यात २० ते २५ दिवसात, त्यामुळे ग्राहकांच्या वीज देयकात मोठी तफावत येत असते. साधारणत: उन्हाळ्यामुळे वीज वापर वाढलेला असतो त्यात ३८ ते ४० दिवसांनी रीडिंग घेऊन ते ३० दिवसाच्या स्लॅब मध्ये बसवल्यामुळे वरच्या स्लॅबचे दर आकारले जातात, या दोन्हीचा परिणाम म्हणून वीज बिलामध्ये ५० ते ७० टक्के वाढ झाली आहे. या आधी बिलावर फोटो रीडिंग मध्ये फोटो घेतल्याची तारीख येत होती आणि त्यामुळे ग्राहकांना दोन देयक मधील रीडिंग चे दिवस मोजता येत होते. परिणामी काही ग्राहक अधिकाऱ्याना जाब विचारत होते, म्हणून जून २०१४ पासून वीज देयकावर रीडिंग फोटो वरची तारीख देणे बंद करण्यात आले जेणेकरून ग्राहकांना दोन देयकामधील रीडिंग चा फरक कळू नये. या विषयी मा. उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार वसईत भाजपचे पदाधिकारी व महावितरणचे मुख्य अभियंता तसेच इतर अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीमध्ये हा मुद्दा प्रामुख्याने चर्चिला गेला होता व वीज मीटरमध्ये नियमितता व वीज देयकात पारदर्शकता आणण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते, त्यानंतर सुद्धा सातत्याने पाठपुरावा करून आणि आश्वासन देऊन सुद्धा अधिकारी यामध्ये सुधारणा करण्यास तसेच फोटोमध्ये तारीख टाकण्यास टाळाटाळ करीत आहेत. नियमानुसार जर मीटर रीडिंग घेण्यास उशीर झाला तर ३० दिवसा प्रमाणे त्याचे मोजमाप होऊन ग्राहकांना स्लॅबचा फायदा द्यायला हवा, परंतु ठेका पद्धतीने होणाऱ्या मीटर रीडिंग आणि बिल वाटण्याच्या पद्धतीमध्ये सुधारण्या करण्याऐवजी ठेकेदाराला पाठीशी घालून ग्राहकांना लाखो रुपयाचा भुर्दंड सोसायला महावितरण भाग पाडते आहे. ठेकेदारांना पाठीशी घालणे व कामचुकारपणामुळे महावितरणच्या या ग्राहकांना प्रचंड आर्थिक भुर्दंड व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामध्ये त्वरीत सुधारणा करावी अन्यथा मोठया लोक क्षोभाला सामोरे जावे लागेल.>काय आहेत मागण्या ?मीटर रीडिंग ३० दिवसांनीच व्हावे, देयकावरील मीटर रीडिंगच्या फोटोवर तो घेतल्याचा दिनांक यावा, वीज देयक तयार झाल्यापासून ३ दिवसामध्ये ग्राहकांना मिळावे. आता ज्यांना वाढीव देयक गेले आहे त्या सर्वांची देयके दुरुस्त करून परत पाठवावीत. अशी मागणी भाजपाचे तालुका उपाध्यक्ष व वसई तालुका वीजवितरण समितीचे सदस्य मनोज पाटील यांनी महावितरणकडे केली आहे.