शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

वळवाच्या पावसाने भातपेरण्या पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2017 01:08 IST

भोर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील भाटघर धरणभागात मागील आठवड्यात झालेल्या वळवाच्या पावसामुळे भाताच्या पेरण्या झाल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कभोर : भोर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील भाटघर धरणभागात मागील आठवड्यात झालेल्या वळवाच्या पावसामुळे भाताच्या पेरण्या झाल्या आहेत. तर मागील दोन दिवसांत झालेल्या वळवाच्या पावसाने नीरा देवघर धरण भागातील हिर्डोशी खोऱ्यात भाताच्या पेरण्या सुरु झाल्या आहे. अजून दमदार पावसाची गरज असल्याने काही ठिकाणच्या पेरण्या रखडल्या आहेत. भोर शहरातील खते व बियाणांच्या दुकानात बी खरेदीसाठी शेतकऱ्यांनी एक गर्दी केली आहे.तालुक्याच्या पश्चिम भागात दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात वळवाचे दोन-तीन दमदार पाऊस झाल्यावर रोहिणी नक्षत्रावर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात धूळवाफेवर भाताच्या बियांची पेरणी केली जाते. मात्र या वेळी एप्रिल आणि मे महिन्यात वळवाचे पाऊस न झाल्याने भाताच्या पेरण्या १५ दिवस पुढे गेल्या आहेत. तर भोरपासून सुमारे ५५ किलोमीटरवर असलेल्या चांदवणे, बोपे, कुंबळे, खुलशी, गृहिणी, भुतोंडे, डेरे, मळे, कुरुंजी, कांबरे खुर्द-बुद्रुक या भागांत मागील आठवड्यात दमदार पाऊस झाल्याने भाताच्या बियांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यात प्रामुख्याने इंद्रायणी बियांची ९० टक्के पेरणी केल्याचे भुतोंडे येथील शेतकरी भगवान कंक यांनी सांगितले.नीरा देवघर भागात वळवाचा एकही पाऊस झाला नाही. त्यामुळे भाताच्या धूळवाफेवरील पेरण्या रखडल्या होत्या. मात्र एक जूनला झालेल्या पावसामुळे हिर्डोशी परिसरात काही ठिकाणी शेतकरी पेरणी करण्यात आली आहे. तर याच भागातील काही ठिकाणच्या पेरणीची तयारी शेतकरी करीत आहेत. वीसगाव व आंबवडे खोऱ्यात खाचरांची नांगरणी, कुळवणी ही पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात दमदार पाऊस झाल्यावर भाताच्या पेरण्या जोरात सुरु होतील, असा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत.भोर तालुक्यात खरिपाची १५५ गावे असून पिकाखालील क्षेत्र २० हजार हेक्टर आहे. खरीप हंगामात बाजरी, ज्वारी, तूर, उडीद भुईमूग, सोयाबीन, वरई, नाचणी ही पिके घेत असली तरी भात हे प्रमुख पीक असून सुमारे ७५०० हेक्टरवर भाताची लागवड केली जाते. त्यामुळे भाताचे बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी दुकानात एकच गर्दी करीत आहेत. यात प्रामुख्याने इंद्रायणी, रत्नागिरी बासमती, सोनम, कोळंबा तामसाळ इंडम, पार्वती, कर्जत १८४ आंबेमोहोर या जातींच्या बियाणांचा समावेश असून तालुक्यात खाण्यास चविष्ठ आणि सुवासिक वास यामुळे इंद्रायणीच्या बियाला सर्वाधिक मागणी आहे. >फलक लावावाऔषधे, खते व बी-बियाणांच्या दुकानासमोरील भागात बियाणे व खतांची किंमत दर्शवणारा फलक लावावा; अन्यथा दुकानदारांचे परवाने रद्द करू, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने संबंधित दुकानदारांना दिल्या होत्या. मात्र कोणत्याच दुकानासमोर खते, बियाणे व औषधांची किंमत दाखवणारे फलक लावलेले नाहीत. त्यांच्यावर कधी कारवाई होणार?