शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
4
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
5
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
6
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
7
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
8
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
9
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
10
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
11
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
14
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
15
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
16
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
17
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
18
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
19
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
20
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी सापडले नाहीत ही खंत

By admin | Updated: September 27, 2015 05:46 IST

देशातील एक सर्वोत्कृष्ट पोलीस दल असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलाचा प्रमुुख म्हणून दीर्घकाळ काम करताना पोलिसांचे प्रलंंबित प्रश्न मार्गी लागल्याचे समाधान मला आहे.

जमीर काझी, मुंबईदेशातील एक सर्वोत्कृष्ट पोलीस दल असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलाचा प्रमुुख म्हणून दीर्घकाळ काम करताना पोलिसांचे प्रलंंबित प्रश्न मार्गी लागल्याचे समाधान मला आहे. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांचा शोध लावू शकलो नाही यांची खंत वाटते, असे राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.राज्य पोलीस दलाचे गेल्या ३८ महिन्यांपासून नेतृत्व करीत असलेले दयाल येत्या बुधवारी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त त्यांची भेट घेतली असता आपल्या कारर्किदीचा आढावा घेताना ‘सनातन संस्थेवरील बंदीचा प्रस्ताव शासनाकडून का प्रलंबित राहिला हे मी सांगू शकत नाही. परंतु कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येमागे ही संस्था असल्याचे सबळ पुरावे मिळाल्यानंतरच त्यांच्यावर बंदी घालण्याचा प्रस्ताव पुन्हा आणला जाऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्याशी केलेली बातचित -कॉ. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित समीर गायकवाडबाबत पोलिसांवर आरोप होत आहेत, नेमकी काय परिस्थिती आहे?या प्रकरणाचा तपास सुरु असल्याने मी अधिक बोलू शकणार नाही, मात्र पोलिसांचा तपास योग्य पद्धतीने सुरु असून महत्वपूर्ण धागेदोरे हाताशी लागले आहेत. लवकर हत्येचा पूर्ण कट उघडकीस येईल, याची मला खात्री आहे.पोलीस महासंचालक म्हणून इतका कार्यकाळ लाभलेले तुम्ही के. सी. मेर्ढेकर यांच्यानंतरचे दुसरे अधिकारी आहात, त्याबाबत काय वाटते?महासंचालक म्हणून इतकी वर्षे काम पाहाता आले हे भाग्यच होते. यात माझ्याबरोबरच दोन लाख १५ हजार पोलिसांचाही वाटा आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच काम करता आले. काही योजना राबविता आल्या याचे समाधान वाटते.पोलीस महासंचालक म्हणून घेतलेले महत्वपूर्ण निर्णय कोणते?बंदोबस्तानिमित्त पोलिसांच्या हक्काच्या साप्ताहिक सुटीवर गदा येते आणि त्याबदल्यात कॉन्स्टेबलना अवघे ३५ तर फौजदारांना ९० रुपये दिले जात होते. त्यात वाढ करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. आता सुटीच्या दिवशी काम केल्यास त्यांना एक दिवसाचा पगार मिळतो. त्याचप्रमाणे शिपाई ते सहाय्यक फौजदारांना पूर्वी दरवर्षी गणवेष दिला जात असे. मात्र ते कधीच वेळेवर मिळत नव्हते. शिवाय कापड देखील चांगल्या प्रतीचे नसायचे. त्यामुळे आता दरवर्षी ५ हजार १७३ रुपये थेट त्यांच्या बॅँक खात्यात जमा होतात.पोलिसांच्या आठ तास ड्युटीचे नियोजन का होत नाही ?पोलिस भरती होत असली तरी त्यांच्यावर विविध कामांची जबाबदारीही वाढविली जाते. त्यामुळे पोलिसांना आठ नव्हे तर, १२ - १३ तास काम करावे लागते. त्याशिवाय घरातून येण्याजाण्याच्या प्रवासासाठी २ तास लागतात. त्यामुळे आठ तासांच्या ड्युटीसाठी अतिरिक्त कामे, व्हीआयपींसाठीचे अतिरिक्त मनुष्यबळ कमी करणे यासारख्या पर्यायांचा विचार करावा लागणार आहे.