शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी सापडले नाहीत ही खंत

By admin | Updated: September 27, 2015 05:46 IST

देशातील एक सर्वोत्कृष्ट पोलीस दल असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलाचा प्रमुुख म्हणून दीर्घकाळ काम करताना पोलिसांचे प्रलंंबित प्रश्न मार्गी लागल्याचे समाधान मला आहे.

जमीर काझी, मुंबईदेशातील एक सर्वोत्कृष्ट पोलीस दल असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलाचा प्रमुुख म्हणून दीर्घकाळ काम करताना पोलिसांचे प्रलंंबित प्रश्न मार्गी लागल्याचे समाधान मला आहे. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांचा शोध लावू शकलो नाही यांची खंत वाटते, असे राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.राज्य पोलीस दलाचे गेल्या ३८ महिन्यांपासून नेतृत्व करीत असलेले दयाल येत्या बुधवारी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त त्यांची भेट घेतली असता आपल्या कारर्किदीचा आढावा घेताना ‘सनातन संस्थेवरील बंदीचा प्रस्ताव शासनाकडून का प्रलंबित राहिला हे मी सांगू शकत नाही. परंतु कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येमागे ही संस्था असल्याचे सबळ पुरावे मिळाल्यानंतरच त्यांच्यावर बंदी घालण्याचा प्रस्ताव पुन्हा आणला जाऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्याशी केलेली बातचित -कॉ. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित समीर गायकवाडबाबत पोलिसांवर आरोप होत आहेत, नेमकी काय परिस्थिती आहे?या प्रकरणाचा तपास सुरु असल्याने मी अधिक बोलू शकणार नाही, मात्र पोलिसांचा तपास योग्य पद्धतीने सुरु असून महत्वपूर्ण धागेदोरे हाताशी लागले आहेत. लवकर हत्येचा पूर्ण कट उघडकीस येईल, याची मला खात्री आहे.पोलीस महासंचालक म्हणून इतका कार्यकाळ लाभलेले तुम्ही के. सी. मेर्ढेकर यांच्यानंतरचे दुसरे अधिकारी आहात, त्याबाबत काय वाटते?महासंचालक म्हणून इतकी वर्षे काम पाहाता आले हे भाग्यच होते. यात माझ्याबरोबरच दोन लाख १५ हजार पोलिसांचाही वाटा आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच काम करता आले. काही योजना राबविता आल्या याचे समाधान वाटते.पोलीस महासंचालक म्हणून घेतलेले महत्वपूर्ण निर्णय कोणते?बंदोबस्तानिमित्त पोलिसांच्या हक्काच्या साप्ताहिक सुटीवर गदा येते आणि त्याबदल्यात कॉन्स्टेबलना अवघे ३५ तर फौजदारांना ९० रुपये दिले जात होते. त्यात वाढ करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. आता सुटीच्या दिवशी काम केल्यास त्यांना एक दिवसाचा पगार मिळतो. त्याचप्रमाणे शिपाई ते सहाय्यक फौजदारांना पूर्वी दरवर्षी गणवेष दिला जात असे. मात्र ते कधीच वेळेवर मिळत नव्हते. शिवाय कापड देखील चांगल्या प्रतीचे नसायचे. त्यामुळे आता दरवर्षी ५ हजार १७३ रुपये थेट त्यांच्या बॅँक खात्यात जमा होतात.पोलिसांच्या आठ तास ड्युटीचे नियोजन का होत नाही ?पोलिस भरती होत असली तरी त्यांच्यावर विविध कामांची जबाबदारीही वाढविली जाते. त्यामुळे पोलिसांना आठ नव्हे तर, १२ - १३ तास काम करावे लागते. त्याशिवाय घरातून येण्याजाण्याच्या प्रवासासाठी २ तास लागतात. त्यामुळे आठ तासांच्या ड्युटीसाठी अतिरिक्त कामे, व्हीआयपींसाठीचे अतिरिक्त मनुष्यबळ कमी करणे यासारख्या पर्यायांचा विचार करावा लागणार आहे.