शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारण निर्णायक टप्प्यावर

By admin | Updated: October 10, 2014 05:23 IST

लोकसभा निवडणुकीत पूत्र माजी खासदार नीलेश राणे यांचा झालेल्या पराभवामुळे खचलेल्या माजी उद्योगमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे

लोकसभा निवडणुकीत पूत्र माजी खासदार नीलेश राणे यांचा झालेल्या पराभवामुळे खचलेल्या माजी उद्योगमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्यासमोर विधानसभा निवडणुकीचे मोठे आव्हान उभे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विधानसभेच्या तीन मतदारसंघापैकी दोन ठिकाणी स्वत: राणे आणि त्यांचे दुसरे पूत्र नीतेश राणे नशीब आजमावत असल्याने राणेंसाठी ही लढाई अस्तिवाची बनली आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्गातील राजकारण खऱ्या अर्थाने निर्णायक टप्प्यावर असून या निवडणुकीतच आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट होणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याचा इतिहास पाहता गेल्या २५ वर्षात नारायण राणे यांनी जिल्ह्याचे राजकारण सतत आपल्याभोवती फिरणारे ठेवले आहे. १९९0 पासून सन २00५ पर्यंत म्हणजे शिवसेनेत असताना आणि त्यानंतर गेली दहा वर्षे काँग्रेसमध्ये असताना सिंधुदुर्ग जिल्हा आणि नारायण राणे याबाबत समीकरणच जुळलेले आढळून आले आहे. या समीकरणाला मात्र एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीने पहिल्यांदा छेद दिला आहे. मोदी लाटेवर स्वार होवून माजी खासदार नीलेश राणे यांचा दारूण पराभव करत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या रूपाने शिवसेनेला पुन्हा वैभव मिळाले आहे. नीलेशच्या पराभवामुळे राणे व्यथितही झाले होते. आता विधानसभा निवडणुकीत नारायण राणे पुन्हा नव्याने दमाने उतरले आहेत. त्यामुळे यावेळची लढाई फार निर्णायक होणार आहे. त्यातच त्यांच्याकडे काँग्रेसच्या प्रचारसमितीप्रमुख पदाची जबाबदारी असल्याने त्यांच्यासाठी राज्यभरात प्रचाराचे आणखीन एक आव्हान आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभेचे तीन मतदारसंघ आहेत. यात गतनिवडणुकीत कणकवली मतदारसंघात भाजपाचे प्रमोद जठार, कुडाळमधून काँग्रेसचे नारायण राणे आणि सावंतवाडीमधून राष्ट्रवादीचे दीपक केसरकर निवडून आले होते. आता विधानसभेच्या आखाड्यात हे विद्यमान तिन्ही आमदार पुन्हा एकदा नशिब अजमावत आहेत. मात्र, दीपक केसरकर मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून आमदार झाले होते. आता ते शिवसेनेकडून रिंगणात आहेत.कणकवली मतदारसंघाचा विचार करता या मतदारसंघात कणकवली, देवगड आणि वैभववाडी या तीन तालुक्यांचा समावेश आहे. येथे भाजपातर्फे प्रमोद जठार यांच्यासमोर काँग्रेसच्यावतीने नारायण राणे यांचे सुपूत्र नीतेश राणे युवानेतृत्व म्हणून पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात आहेत. तर राष्ट्रवादीतर्फे अतुल रावराणे आणि शिवसेनेतर्फे सिद्धीविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष सुभाष मयेकर आखाड्यात उतरले आहेत. काँग्रेसचे बंडखोर आणि अपक्ष म्हणून आमदार विजय सावंत यांनी ही लढाई प्रतिष्ठेची केली असल्याने या मतदारसंघातील निवडणूक चुरशीची होणार आहे. याठिकाणी जठार यांना पुन्हा संधी मिळते की नीतेश राणे पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कुडाळ-मालवणमध्ये लढत ही नारायण राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्यात समोरासमोर होत आहे. मात्र, या ठिकाणी माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते पुष्पसेन सावंत यांनी उडी घेतल्याने आणि भाजपानेही विष्णू मोंडकर यांच्या रूपाने उमेदवार उभा केल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतविभागणी होणार आहे. त्या मतविभागणीचा फायदा कोणाला होणार यावर बहुतांशी गणिते अवलंबून असणार आहेत. लोकसभा निवडणुकीत २१ हजारांचे मताधिक्य येथे शिवसेनेला मिळाले होते. परंतु यावेळी नारायण राणे सातव्यांदा येथे रिंगणात असल्याने येथे कोण बाजी मारणार याबाबत तर्क करणे अवघड बनले आहे. सावंतवाडीमध्ये वेंगुर्ले, सावंतवाडी व दोडामार्ग या तीन तालुक्यांचा समावेश होतो. याठिकाणची लढाई मात्र स्थानिक आमदार आणि राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले दीपक केसरकर यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून केसरकर यांचे समर्थक असलेले दोडामार्गचे नेते सुरेश दळवी, भाजपाकडून नारायण राणेंचे एकेकाळचे विश्वासू शिलेदार राजन तेली व जिल्ह्यातील एकमेव जागा लढणाऱ्या मनसेकडून परशुराम उपरकर हे रिंगणात असल्याने खऱ्या अर्थाने केसरकर यांच्यासमोर तगडे आव्हान उभे आहे. तीन माजी आमदारांमध्ये ही लढत होत आहे. त्यामुळे सावंतवाडीतील लढत केसरकरांचे अस्तित्व पणाला लावणारी ठरली आहे.