शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
3
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
4
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
5
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
6
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
7
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
9
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
10
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
11
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
12
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
13
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
14
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
15
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
16
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
17
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
18
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
19
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
20
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी

सक्तीनंतर व्यावसायिकांची परवान्यासाठी गर्दी

By admin | Updated: August 1, 2016 02:45 IST

महापालिकेने सक्ती केल्यानंतर शहरातील दुकानदार, उद्योजक यांनी व्यवसाय परवाने घेण्यास सुरवात केली आहे.

सूर्यकांत वाघमारे,

नवी मुंबई- महापालिकेने सक्ती केल्यानंतर शहरातील दुकानदार, उद्योजक यांनी व्यवसाय परवाने घेण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे अग्निशमन दलासह इतर ना हरकत परवाने मिळवण्यासाठी त्यांची लगबग सुरू आहे. परंतु या प्रक्रियेत अधिकृत गाळ्यांमधील व्यावसायिक भरडले जात आहेत. व्यवसाय करण्यासाठी महापालिकेचा व्यवसाय परवाना आवश्यक असतानाही उद्योजक व्यावसायिकांकडून आजतागायत त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. पालिका अधिकाऱ्यांनी देखील ही बाब गांभीर्याने घेतली नव्हती. त्यामुळे लहान - मोठ्या दुकानांसह अनेक उद्योग, कारखाने देखील पालिकेच्या व्यवसाय परवान्याविनाच सुरू होते. यामुळे संबंधित व्यावसायिकाची आर्थिक भरभराट सुरू होती. मात्र प्रशासनाला त्यांच्यापासून कसलाही कर मिळत नव्हता. तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेताच व्यवसाय परवान्याला सक्ती केली आहे. शिवाय व्यवसाय व साठा परवाना तातडीने मिळावा याकरिता ना हरकत दाखला देण्याची प्रक्रिया देखील जलद केली आहे. त्यामुळे आजवर पालिकेच्या परवानगीविनाच व्यवसाय करणाऱ्यांनी परवाना घेण्याची लगबग चालवली आहे.अग्निशमन दलाकडून ना हरकत दाखला देण्यासाठी त्यांच्याकडून विविध प्रकारच्या कागदपत्रांची मागणी केली जात आहे. त्यामध्ये व्यावसायिक गाळा असलेल्या इमारतीच्या सीसी, ओसी पत्रांचाही समावेश आहे. या कागदपत्रांची जमवाजमव करताना व्यावसायीकांची दमछाक होत आहे. दुसरीकडे मात्र बैठ्या चाळी, रो हाऊस तसेच गावठाणातील गरजेपोटी इमारतींमधील गाळ्यांना सहज परवाने मिळत आहेत. यावरून ना हरकत दाखल्याच्या आडून परवाना प्रक्रियेत सावळागोंधळ सुरू असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली याठिकाणी सिडकोच्या बैठ्या चाळी तसेच रो हाऊस आहेत. सद्यस्थिती त्याठिकाणच्या चाळीमध्ये घरांच्या जागी चार मजली इमारती उभ्या आहेत. तर रो हाऊसच्या ठिकाणी तळमजल्यावर पार्किंगऐवजी व्यावसायिक गाळे बांधण्यात आलेले आहेत. त्याठिकाणी नियमाचे उल्लंघन झालेले असल्यामुळे अशा बांधकामांना ओसी मिळालेली नाही. यामुळे अशा ठिकाणचे व्यावसायिक गाळे अनधिकृत असतानाही परवाना प्रक्रियेत त्यांच्या सोयीचे धोरण अवलंबले जात असल्याचा काही व्यावसायिकांचा आरोप आहे.>गावठाणामध्ये गरजेपोटी उभारलेल्या बहुतांश इमारतींमध्ये तळमजल्यावर व्यावसायिक गाळे आहेत. त्यापैकी बहुतांश इमारतींना पालिकेची सीसी, ओसी देखील नसल्यामुळे या इमारती अनधिकृत समजल्या जात आहेत. यामुळे त्याठिकाणच्या गाळ्यामधील व्यापाऱ्यांना देखील व्यवसाय परवाना मिळणार का, असा प्रश्न अनेकांना उद्भवला आहे.