शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

स्ट्रक्चरल आॅडिटबाबतच संभ्रमावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2016 03:41 IST

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सगळ्यात तातडीने अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सगळ्यात तातडीने अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. अशा इमारतींत सुमारे ४० ते ४५ हजार नागरिक राहत असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याचा नेमका आकडा प्रशासनाकडे नाही. धोकादायक इमारतींत राहणारे भाडेकरू किंवा मालकही आॅडिट करू शकतात. पण, एकूणच स्ट्रक्चरल आॅडिटच्या पारदर्शकतेबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. स्ट्रक्चरल आॅडिट करण्याकडे भाडेकरूंचा फारसा कल दिसून येत नाही. अहवालात इमारत धोकादायक म्हणून जाहीर झाल्यास मालक हुसकावून लावेल, घरावरील हक्क संपुष्टात येईल, अशी भावना भाडेकरूंमध्ये असते. ज्या वेळेस भाडेकरू स्ट्रक्चरल आॅडिट करतात, तेव्हा इमारत दुरुस्त करता येते, असा शेरा येतो. पण, मालकाकडून स्ट्रक्चरल आॅडिट झाल्यास धोकादायक असल्याचे अहवालात नमूद केले जाते. यातून मालक, महापालिका अधिकारी व स्ट्रक्चरल आॅडिटर यांच्यात साटेलोटे असल्याचा संशय भाडेकरू व्यक्त करतात. कारण, एकाच धोकादायक इमारतीचे दोन वेगवेगळे अहवाल येतात. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिका आयुक्तांनी थर्ड पार्टी आॅडिट करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. थर्ड पार्टीच्या अहवालानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. दोन वेगवेगळ्या स्ट्रक्चरल अहवालांची तीन ते चार प्रकरणे आली असल्याचे आयुक्तांनी स्वत:हून मान्य केले आहे. ठाकुर्लीतील धोकादायक इमारत दुर्घटनेनंतर महापालिकेने ४२ अतिधोकादायक इमारती पाडण्याचा कृती आराखडा तयार केला. त्यापैकी केवळ दोनच इमारती पाडण्याचे काम महापालिकेने केल्याचे समोर आले आहे. भाडेकरू, मालक आणि बिल्डर यांचे हक्क अबाधित राहून धोकादायक इमारतींचा विकास केला जाईल, असे सांगण्यात आले होेते. ते प्रत्यक्षात आलेले नाही. ।मातृकृपाला कोणता न्याय : २८ जुलै २०१५ रोजी ठाकुर्लीतील मातृकृपा इमारत पडून ११ जणांचा मृत्यू झाला. इमारतीचा अर्धा भाग कोसळला. त्यानंतर, महापालिकेने उर्वरित भाग पाडण्याची कारवाई केली. एखादी धोकादायक इमारत नैसर्गिकरीत्या पडली, तर भाडेकरूंचा हक्क संपुष्टात येतो. पण, धोकादायक इमारत महापालिका किंवा मालकाने पाडल्यास धोकादायक इमारतीत राहणाऱ्या भाडेकरूंचा हक्क अबाधित राहतो. मातृकृपा इमारतीचा अर्धा भाग नैसर्गिकरीत्या पडला, तर अर्धा भाग नंतर महापालिकेने पाडला. त्यामुळे मातृकृपाच्या भाडेकरूंना नेमका कुठला न्याय लावला जाणार, हे घटनेला वर्ष उलटून गेले तरी अद्याप स्पष्ट झालेले नाही. >एक लाखाचीच मदत मिळाली : मातृकृपा इमारतीत राहणाऱ्या रवींद्र रेडीज या तरुणाची आई सुलोचना मृत्युमुखी पडली. त्याचा एक भाऊ पानपट्टी चालवतो. रवींद्र हा रिअल इस्टेटची कामे करतो. परिस्थिती बेताचीच असल्याने रवींद्र व दीपक हे दोघेही भाऊ त्यांच्या मित्राच्या घरी राहतात. मालकाने कुठलाही लाभ दिलेला नाही. सरकारकडून बऱ्याच उशिरा एक लाखाचा धनादेश मृतांच्या कुटुंबीयांना मिळाला. त्यातून घर घेता आले नाही की, पर्यायी जागा. दिलेली मदत तुटपुंजी होती. किमान, पाच लाख रुपयांची मदत मिळणे अपेक्षित होते.>जुन्यांना काढून नवे भाडेकरू दत्तकृपा इमारतीत राहणाऱ्या भाडेकरूंना मालकाने नोटीस बजावून डिपॉझिट देण्याचे स्पष्ट केले. त्यामुळे अनेकांनी इमारत रिकामी केली आहे. दोन भाडेकरूंची पर्यायी व्यवस्था अद्याप झालेली नसल्याने त्यांनी इमारतीतील घर अद्याप सोडलेले नाही. मात्र, रिक्त झालेल्या घरांमध्ये मालकाने दोन नवे भाडेकरू ठेवले आहेत. त्यांच्याकडून मालक तीन ते चार हजार रुपये भाडे घेतो, असा आरोप जुन्या भाडेकरूंनी केला आहे. याबाबत, मालक रमेश जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. दत्तकृपा इमारतीत भाडेकरू म्हणून राहत असलेले वकील व्ही.एम. बेंद्रे यांनी इमारतीत राहणाऱ्या नऊ भाडेकरूंच्या हक्कासाठी लढा देण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी महापालिकेस एक निवेदन दिले आहे. प्रसंगी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागण्याची तयारी सुरू केली आहे. महापालिकेने धोकादायक व अतिधोकादायक इमारती जाहीर केल्या आहेत. त्यांनी ही प्रक्रिया प्रथम स्थगित करावी. त्यांचे पुनर्परीक्षण करावे. भाडेकरू राहत असलेली इमारत धोकादायक ठरवून ती पाडली, तर त्या भाडेकरूला तो वापरात असलेल्या जागेच्या बदल्यात तेवढीच जागा नव्या बांधकाम झालेल्या इमारतीत द्यावी, असा जीआर सरकारने नुकताच काढला आहे. या जीआरच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा केला जाणार आहे. त्यासाठी कोणतेही मानधन न घेता हे काम करण्याची तयारी बेंद्रे यांनी दर्शवली आहे. अन्य भाडेकरूही त्यांच्याकडे आले तर त्यांची एक संघटना तयार करून हक्कासाठी कायदेशीर लढा दिला जाईल, असे बेंद्रे यांनी स्पष्ट केले आहे. महापालिकेने एखादी इमारत धोकादायक ठरवण्यासाठी काय निकष वापरले, याचीही विचारणा बेंद्रे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे..