शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

स्ट्रक्चरल आॅडिटबाबतच संभ्रमावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2016 03:41 IST

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सगळ्यात तातडीने अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सगळ्यात तातडीने अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. अशा इमारतींत सुमारे ४० ते ४५ हजार नागरिक राहत असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याचा नेमका आकडा प्रशासनाकडे नाही. धोकादायक इमारतींत राहणारे भाडेकरू किंवा मालकही आॅडिट करू शकतात. पण, एकूणच स्ट्रक्चरल आॅडिटच्या पारदर्शकतेबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. स्ट्रक्चरल आॅडिट करण्याकडे भाडेकरूंचा फारसा कल दिसून येत नाही. अहवालात इमारत धोकादायक म्हणून जाहीर झाल्यास मालक हुसकावून लावेल, घरावरील हक्क संपुष्टात येईल, अशी भावना भाडेकरूंमध्ये असते. ज्या वेळेस भाडेकरू स्ट्रक्चरल आॅडिट करतात, तेव्हा इमारत दुरुस्त करता येते, असा शेरा येतो. पण, मालकाकडून स्ट्रक्चरल आॅडिट झाल्यास धोकादायक असल्याचे अहवालात नमूद केले जाते. यातून मालक, महापालिका अधिकारी व स्ट्रक्चरल आॅडिटर यांच्यात साटेलोटे असल्याचा संशय भाडेकरू व्यक्त करतात. कारण, एकाच धोकादायक इमारतीचे दोन वेगवेगळे अहवाल येतात. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिका आयुक्तांनी थर्ड पार्टी आॅडिट करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. थर्ड पार्टीच्या अहवालानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. दोन वेगवेगळ्या स्ट्रक्चरल अहवालांची तीन ते चार प्रकरणे आली असल्याचे आयुक्तांनी स्वत:हून मान्य केले आहे. ठाकुर्लीतील धोकादायक इमारत दुर्घटनेनंतर महापालिकेने ४२ अतिधोकादायक इमारती पाडण्याचा कृती आराखडा तयार केला. त्यापैकी केवळ दोनच इमारती पाडण्याचे काम महापालिकेने केल्याचे समोर आले आहे. भाडेकरू, मालक आणि बिल्डर यांचे हक्क अबाधित राहून धोकादायक इमारतींचा विकास केला जाईल, असे सांगण्यात आले होेते. ते प्रत्यक्षात आलेले नाही. ।मातृकृपाला कोणता न्याय : २८ जुलै २०१५ रोजी ठाकुर्लीतील मातृकृपा इमारत पडून ११ जणांचा मृत्यू झाला. इमारतीचा अर्धा भाग कोसळला. त्यानंतर, महापालिकेने उर्वरित भाग पाडण्याची कारवाई केली. एखादी धोकादायक इमारत नैसर्गिकरीत्या पडली, तर भाडेकरूंचा हक्क संपुष्टात येतो. पण, धोकादायक इमारत महापालिका किंवा मालकाने पाडल्यास धोकादायक इमारतीत राहणाऱ्या भाडेकरूंचा हक्क अबाधित राहतो. मातृकृपा इमारतीचा अर्धा भाग नैसर्गिकरीत्या पडला, तर अर्धा भाग नंतर महापालिकेने पाडला. त्यामुळे मातृकृपाच्या भाडेकरूंना नेमका कुठला न्याय लावला जाणार, हे घटनेला वर्ष उलटून गेले तरी अद्याप स्पष्ट झालेले नाही. >एक लाखाचीच मदत मिळाली : मातृकृपा इमारतीत राहणाऱ्या रवींद्र रेडीज या तरुणाची आई सुलोचना मृत्युमुखी पडली. त्याचा एक भाऊ पानपट्टी चालवतो. रवींद्र हा रिअल इस्टेटची कामे करतो. परिस्थिती बेताचीच असल्याने रवींद्र व दीपक हे दोघेही भाऊ त्यांच्या मित्राच्या घरी राहतात. मालकाने कुठलाही लाभ दिलेला नाही. सरकारकडून बऱ्याच उशिरा एक लाखाचा धनादेश मृतांच्या कुटुंबीयांना मिळाला. त्यातून घर घेता आले नाही की, पर्यायी जागा. दिलेली मदत तुटपुंजी होती. किमान, पाच लाख रुपयांची मदत मिळणे अपेक्षित होते.>जुन्यांना काढून नवे भाडेकरू दत्तकृपा इमारतीत राहणाऱ्या भाडेकरूंना मालकाने नोटीस बजावून डिपॉझिट देण्याचे स्पष्ट केले. त्यामुळे अनेकांनी इमारत रिकामी केली आहे. दोन भाडेकरूंची पर्यायी व्यवस्था अद्याप झालेली नसल्याने त्यांनी इमारतीतील घर अद्याप सोडलेले नाही. मात्र, रिक्त झालेल्या घरांमध्ये मालकाने दोन नवे भाडेकरू ठेवले आहेत. त्यांच्याकडून मालक तीन ते चार हजार रुपये भाडे घेतो, असा आरोप जुन्या भाडेकरूंनी केला आहे. याबाबत, मालक रमेश जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. दत्तकृपा इमारतीत भाडेकरू म्हणून राहत असलेले वकील व्ही.एम. बेंद्रे यांनी इमारतीत राहणाऱ्या नऊ भाडेकरूंच्या हक्कासाठी लढा देण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी महापालिकेस एक निवेदन दिले आहे. प्रसंगी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागण्याची तयारी सुरू केली आहे. महापालिकेने धोकादायक व अतिधोकादायक इमारती जाहीर केल्या आहेत. त्यांनी ही प्रक्रिया प्रथम स्थगित करावी. त्यांचे पुनर्परीक्षण करावे. भाडेकरू राहत असलेली इमारत धोकादायक ठरवून ती पाडली, तर त्या भाडेकरूला तो वापरात असलेल्या जागेच्या बदल्यात तेवढीच जागा नव्या बांधकाम झालेल्या इमारतीत द्यावी, असा जीआर सरकारने नुकताच काढला आहे. या जीआरच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा केला जाणार आहे. त्यासाठी कोणतेही मानधन न घेता हे काम करण्याची तयारी बेंद्रे यांनी दर्शवली आहे. अन्य भाडेकरूही त्यांच्याकडे आले तर त्यांची एक संघटना तयार करून हक्कासाठी कायदेशीर लढा दिला जाईल, असे बेंद्रे यांनी स्पष्ट केले आहे. महापालिकेने एखादी इमारत धोकादायक ठरवण्यासाठी काय निकष वापरले, याचीही विचारणा बेंद्रे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे..