शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

तुटलेल्या मनांची अस्तित्वाची लढत

By admin | Updated: October 2, 2014 00:11 IST

निवडणूक पंचरंगी, लढत मात्र तिरंगी; स्पर्धेत नसूनही काँग्रेसची मते निर्णायक

संकेत गोयथळे -- गुहागर--मतदार संघात पंचरंगी निवडणूक होणार हे निश्चित झाले आहे. यामध्ये प्रमुख लढत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना या तिघांमध्ये होणार असल्याने आघाडी व युती तुटलेले हे पक्ष अस्तित्वाच्या लढाईप्रमाणे एकमेकाविरोधात प्रचारात उतरले आहेत. यामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला किती मते पडतात, यावर राजकीय गणित बिघडू शकते.तात्या नातू यांच्यापासून गुहागर मतदार संघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जायचा. विनय नातू यांनी सलग चार टर्म आमदारकी भुषविली. मतदार संघाच्या फेररचनेत खेड मतदार संघ गायब होऊन मोठा भाग गुहागर मतदार संघात आला. अस्तित्वहिन झालेल्या तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी हा मतदार संघ मागितला. यातूनच विनय नातू यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविल्याने सेना - भाजपच्या मतांच्या विभाजन होऊन राष्ट्रवादीचे भास्कर जाधव निवडून आले.यानंतरचे राजकीय गणितच बदलून गेले. यापूर्वी वर्षानुवर्षे भाजपचा आमदार असल्याने शिवसेनेला नगण्य समजले जायचे. रामदास कदम यांनी विनय नातूंपेक्षा १० हजार मते अधिक घेऊन येथे भाजपापेक्षा शिवसेनेचे प्राबल्य असल्याचे दाखवून दिले. यावेळीही शिवसेना हा मतदार संघ सहजासहजी सोडण्यास तयार नव्हती. अखेर युतीच तुटल्याने सर्वांनाच आपला मार्ग मोकळा झाला आहे व कोण किती बलाढ्य हे दाखविण्यासाठी अस्तित्वाची लढाई सुरु झाली आहे.युती तुटल्याने विद्यमान आमदार भास्कर जाधव यांचे प्रथम दर्शनी पारडे जड झाल्याचे दिसत आहे. कारण गतवेळी युती विभाजनामुळेच भास्कर जाधव विजयी झाले. यानंतर पराभूत झालेले रामदास कदम व विनय नातूही पहिली काही वर्षे मतदार संघात फिरकले नाहीत तर दुसऱ्या बाजूने भास्कर जाधव यांनी नगरविकास राज्यमंत्रीपद राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व कामगार मंत्री अशी पदे भूषविताना विकास कामांच्या माध्यमातून सातत्याने मतदार संघाशी संपर्क ठेवला होता. विरोधकांच्या ताब्यातील गुहागर पंचायत समिती व गुहागर नगरपंचायत ताब्यात घेऊन चढता आलेख कायम ठेवला आहे. लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांना या मतदार संघातून अडीच हजाराचे मताधिक्य देऊन युती असतानाही आपाणच आघाडीवर असल्याचे सिद्ध केले आहे. काँग्रेस यावेळी बरोबर नसल्याने काही प्रमाणात ही मते कमी होणार आहेत. नीलेश राणे यांनी जाधवांविरोधात उघडपणे दंड थोपटले आहेत. काँग्रेसकडून राणे समर्थक संदीप सावंत हे उमेदवार आहेत. चिपळूण वगळता संदीप सावंत गुहागर व खेड मतदार संघाशी फारसा संपर्क नाही. काँग्रेसचेही या पट्ट्यात फार मोठे प्राबल्य नाही. असे असले तरी भास्कर जाधव यांना राजकीय शत्रू मानणाऱ्या नीलेश राणे यांच्याकडून किती जोर लावला जातो यावर भास्कर जाधव याचे यश अवलंबून आहे.केंंद्र सरकारच्या कामगिरीवर भाजपचा प्रमुख प्रचार रहाणार आहे. युतीचे विभाजन झाल्याने मतामध्ये होणारी घट लक्षात घेऊन प्रमुखपणे मोदी इफेक्ट व भास्कर जाधव यांच्या आक्रमक शैलीमुळे दुखावलेल्या राष्ट्रवादी कार्यकर्ते व भाजपाला सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा भाजपाच्या लाटेमध्ये घेणे याचे आव्हान विनय नातूंसमोर असणार आहे. शिवसेनेचेही येथे प्राबल्य असले तरी येथे अनंत गीते व रामदास कदम असे दोन गट आहेत. विजयकुमार भोसले हे या मतदार संघासाठी नवखे उमेदवार आहेत. अशा स्थितीत गटतट विसरुन शिवसेना कार्यकर्ते कशाप्रकारे काम करतात यावर शिवसेनेची मते कायम रहाणार आहेत. यावेळी मनसे निवडणूक रिंगणात नसल्याने शिवसेनेच्या विजयकुमार भोसले फायदा होईल, असे मानले जात आहे. गतवेळी मनसेच्या वैभव खेडेकर यांना या मतदार संघातून आठ हजार मते पडली होती. ही मते शिवसेनेकडे आकृष्ट होऊ शकतात. बसपा पक्षाचे येथे राजकीय अस्तित्व नाही तरीही वैयक्तिक संपर्कावर चार ते पाच हजार मते घेण्यास सुरेश पवार यशस्वी झाले तर इतर पक्षांचे नुकसान होऊ शकते.गुहागरएकूण मतदार २,२८,५७२नाव पक्षभास्कर जाधवराष्ट्रवादीडॉ. विनय नातूभाजपसंदीप सावंतकाँग्रेससुरेश गमरेबसपाविजयकुमार भोसलेशिवसेना