शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

तुटलेल्या मनांची अस्तित्वाची लढत

By admin | Updated: October 2, 2014 00:11 IST

निवडणूक पंचरंगी, लढत मात्र तिरंगी; स्पर्धेत नसूनही काँग्रेसची मते निर्णायक

संकेत गोयथळे -- गुहागर--मतदार संघात पंचरंगी निवडणूक होणार हे निश्चित झाले आहे. यामध्ये प्रमुख लढत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना या तिघांमध्ये होणार असल्याने आघाडी व युती तुटलेले हे पक्ष अस्तित्वाच्या लढाईप्रमाणे एकमेकाविरोधात प्रचारात उतरले आहेत. यामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला किती मते पडतात, यावर राजकीय गणित बिघडू शकते.तात्या नातू यांच्यापासून गुहागर मतदार संघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जायचा. विनय नातू यांनी सलग चार टर्म आमदारकी भुषविली. मतदार संघाच्या फेररचनेत खेड मतदार संघ गायब होऊन मोठा भाग गुहागर मतदार संघात आला. अस्तित्वहिन झालेल्या तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी हा मतदार संघ मागितला. यातूनच विनय नातू यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविल्याने सेना - भाजपच्या मतांच्या विभाजन होऊन राष्ट्रवादीचे भास्कर जाधव निवडून आले.यानंतरचे राजकीय गणितच बदलून गेले. यापूर्वी वर्षानुवर्षे भाजपचा आमदार असल्याने शिवसेनेला नगण्य समजले जायचे. रामदास कदम यांनी विनय नातूंपेक्षा १० हजार मते अधिक घेऊन येथे भाजपापेक्षा शिवसेनेचे प्राबल्य असल्याचे दाखवून दिले. यावेळीही शिवसेना हा मतदार संघ सहजासहजी सोडण्यास तयार नव्हती. अखेर युतीच तुटल्याने सर्वांनाच आपला मार्ग मोकळा झाला आहे व कोण किती बलाढ्य हे दाखविण्यासाठी अस्तित्वाची लढाई सुरु झाली आहे.युती तुटल्याने विद्यमान आमदार भास्कर जाधव यांचे प्रथम दर्शनी पारडे जड झाल्याचे दिसत आहे. कारण गतवेळी युती विभाजनामुळेच भास्कर जाधव विजयी झाले. यानंतर पराभूत झालेले रामदास कदम व विनय नातूही पहिली काही वर्षे मतदार संघात फिरकले नाहीत तर दुसऱ्या बाजूने भास्कर जाधव यांनी नगरविकास राज्यमंत्रीपद राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व कामगार मंत्री अशी पदे भूषविताना विकास कामांच्या माध्यमातून सातत्याने मतदार संघाशी संपर्क ठेवला होता. विरोधकांच्या ताब्यातील गुहागर पंचायत समिती व गुहागर नगरपंचायत ताब्यात घेऊन चढता आलेख कायम ठेवला आहे. लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांना या मतदार संघातून अडीच हजाराचे मताधिक्य देऊन युती असतानाही आपाणच आघाडीवर असल्याचे सिद्ध केले आहे. काँग्रेस यावेळी बरोबर नसल्याने काही प्रमाणात ही मते कमी होणार आहेत. नीलेश राणे यांनी जाधवांविरोधात उघडपणे दंड थोपटले आहेत. काँग्रेसकडून राणे समर्थक संदीप सावंत हे उमेदवार आहेत. चिपळूण वगळता संदीप सावंत गुहागर व खेड मतदार संघाशी फारसा संपर्क नाही. काँग्रेसचेही या पट्ट्यात फार मोठे प्राबल्य नाही. असे असले तरी भास्कर जाधव यांना राजकीय शत्रू मानणाऱ्या नीलेश राणे यांच्याकडून किती जोर लावला जातो यावर भास्कर जाधव याचे यश अवलंबून आहे.केंंद्र सरकारच्या कामगिरीवर भाजपचा प्रमुख प्रचार रहाणार आहे. युतीचे विभाजन झाल्याने मतामध्ये होणारी घट लक्षात घेऊन प्रमुखपणे मोदी इफेक्ट व भास्कर जाधव यांच्या आक्रमक शैलीमुळे दुखावलेल्या राष्ट्रवादी कार्यकर्ते व भाजपाला सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा भाजपाच्या लाटेमध्ये घेणे याचे आव्हान विनय नातूंसमोर असणार आहे. शिवसेनेचेही येथे प्राबल्य असले तरी येथे अनंत गीते व रामदास कदम असे दोन गट आहेत. विजयकुमार भोसले हे या मतदार संघासाठी नवखे उमेदवार आहेत. अशा स्थितीत गटतट विसरुन शिवसेना कार्यकर्ते कशाप्रकारे काम करतात यावर शिवसेनेची मते कायम रहाणार आहेत. यावेळी मनसे निवडणूक रिंगणात नसल्याने शिवसेनेच्या विजयकुमार भोसले फायदा होईल, असे मानले जात आहे. गतवेळी मनसेच्या वैभव खेडेकर यांना या मतदार संघातून आठ हजार मते पडली होती. ही मते शिवसेनेकडे आकृष्ट होऊ शकतात. बसपा पक्षाचे येथे राजकीय अस्तित्व नाही तरीही वैयक्तिक संपर्कावर चार ते पाच हजार मते घेण्यास सुरेश पवार यशस्वी झाले तर इतर पक्षांचे नुकसान होऊ शकते.गुहागरएकूण मतदार २,२८,५७२नाव पक्षभास्कर जाधवराष्ट्रवादीडॉ. विनय नातूभाजपसंदीप सावंतकाँग्रेससुरेश गमरेबसपाविजयकुमार भोसलेशिवसेना