शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

तुटलेल्या मनांची अस्तित्वाची लढत

By admin | Updated: October 2, 2014 00:11 IST

निवडणूक पंचरंगी, लढत मात्र तिरंगी; स्पर्धेत नसूनही काँग्रेसची मते निर्णायक

संकेत गोयथळे -- गुहागर--मतदार संघात पंचरंगी निवडणूक होणार हे निश्चित झाले आहे. यामध्ये प्रमुख लढत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना या तिघांमध्ये होणार असल्याने आघाडी व युती तुटलेले हे पक्ष अस्तित्वाच्या लढाईप्रमाणे एकमेकाविरोधात प्रचारात उतरले आहेत. यामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला किती मते पडतात, यावर राजकीय गणित बिघडू शकते.तात्या नातू यांच्यापासून गुहागर मतदार संघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जायचा. विनय नातू यांनी सलग चार टर्म आमदारकी भुषविली. मतदार संघाच्या फेररचनेत खेड मतदार संघ गायब होऊन मोठा भाग गुहागर मतदार संघात आला. अस्तित्वहिन झालेल्या तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी हा मतदार संघ मागितला. यातूनच विनय नातू यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविल्याने सेना - भाजपच्या मतांच्या विभाजन होऊन राष्ट्रवादीचे भास्कर जाधव निवडून आले.यानंतरचे राजकीय गणितच बदलून गेले. यापूर्वी वर्षानुवर्षे भाजपचा आमदार असल्याने शिवसेनेला नगण्य समजले जायचे. रामदास कदम यांनी विनय नातूंपेक्षा १० हजार मते अधिक घेऊन येथे भाजपापेक्षा शिवसेनेचे प्राबल्य असल्याचे दाखवून दिले. यावेळीही शिवसेना हा मतदार संघ सहजासहजी सोडण्यास तयार नव्हती. अखेर युतीच तुटल्याने सर्वांनाच आपला मार्ग मोकळा झाला आहे व कोण किती बलाढ्य हे दाखविण्यासाठी अस्तित्वाची लढाई सुरु झाली आहे.युती तुटल्याने विद्यमान आमदार भास्कर जाधव यांचे प्रथम दर्शनी पारडे जड झाल्याचे दिसत आहे. कारण गतवेळी युती विभाजनामुळेच भास्कर जाधव विजयी झाले. यानंतर पराभूत झालेले रामदास कदम व विनय नातूही पहिली काही वर्षे मतदार संघात फिरकले नाहीत तर दुसऱ्या बाजूने भास्कर जाधव यांनी नगरविकास राज्यमंत्रीपद राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व कामगार मंत्री अशी पदे भूषविताना विकास कामांच्या माध्यमातून सातत्याने मतदार संघाशी संपर्क ठेवला होता. विरोधकांच्या ताब्यातील गुहागर पंचायत समिती व गुहागर नगरपंचायत ताब्यात घेऊन चढता आलेख कायम ठेवला आहे. लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांना या मतदार संघातून अडीच हजाराचे मताधिक्य देऊन युती असतानाही आपाणच आघाडीवर असल्याचे सिद्ध केले आहे. काँग्रेस यावेळी बरोबर नसल्याने काही प्रमाणात ही मते कमी होणार आहेत. नीलेश राणे यांनी जाधवांविरोधात उघडपणे दंड थोपटले आहेत. काँग्रेसकडून राणे समर्थक संदीप सावंत हे उमेदवार आहेत. चिपळूण वगळता संदीप सावंत गुहागर व खेड मतदार संघाशी फारसा संपर्क नाही. काँग्रेसचेही या पट्ट्यात फार मोठे प्राबल्य नाही. असे असले तरी भास्कर जाधव यांना राजकीय शत्रू मानणाऱ्या नीलेश राणे यांच्याकडून किती जोर लावला जातो यावर भास्कर जाधव याचे यश अवलंबून आहे.केंंद्र सरकारच्या कामगिरीवर भाजपचा प्रमुख प्रचार रहाणार आहे. युतीचे विभाजन झाल्याने मतामध्ये होणारी घट लक्षात घेऊन प्रमुखपणे मोदी इफेक्ट व भास्कर जाधव यांच्या आक्रमक शैलीमुळे दुखावलेल्या राष्ट्रवादी कार्यकर्ते व भाजपाला सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा भाजपाच्या लाटेमध्ये घेणे याचे आव्हान विनय नातूंसमोर असणार आहे. शिवसेनेचेही येथे प्राबल्य असले तरी येथे अनंत गीते व रामदास कदम असे दोन गट आहेत. विजयकुमार भोसले हे या मतदार संघासाठी नवखे उमेदवार आहेत. अशा स्थितीत गटतट विसरुन शिवसेना कार्यकर्ते कशाप्रकारे काम करतात यावर शिवसेनेची मते कायम रहाणार आहेत. यावेळी मनसे निवडणूक रिंगणात नसल्याने शिवसेनेच्या विजयकुमार भोसले फायदा होईल, असे मानले जात आहे. गतवेळी मनसेच्या वैभव खेडेकर यांना या मतदार संघातून आठ हजार मते पडली होती. ही मते शिवसेनेकडे आकृष्ट होऊ शकतात. बसपा पक्षाचे येथे राजकीय अस्तित्व नाही तरीही वैयक्तिक संपर्कावर चार ते पाच हजार मते घेण्यास सुरेश पवार यशस्वी झाले तर इतर पक्षांचे नुकसान होऊ शकते.गुहागरएकूण मतदार २,२८,५७२नाव पक्षभास्कर जाधवराष्ट्रवादीडॉ. विनय नातूभाजपसंदीप सावंतकाँग्रेससुरेश गमरेबसपाविजयकुमार भोसलेशिवसेना