शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

किनारपट्टीच्या पर्यावरणाला सुरुंग

By admin | Updated: June 6, 2017 02:48 IST

पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी शासकीय पातळीवरील अनास्थेमुळे डहाणूतील किनाऱ्यालगतच्या पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क बोर्डी : पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी शासकीय पातळीवरील अनास्थेमुळे डहाणूतील किनाऱ्यालगतच्या पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. रेती चोरीमुळे किनाऱ्याची धूप, तर विसंगत धोरणामुळे वृक्षतोड होत आहे. दरम्यान नागरिकांनी राबवलेल्या ताडगोळे रोपणाच्या अभिनव उपक्र मास वन विभागाच्या आडमुठे धोरणामुळे तिलांजली मिळाल्याने पर्यावरण शाबूत राखायचे कसे हा प्रश्न पर्यावरण दिनी नागरिकांना पडला आहे. पर्यावरणविषयक कार्यक्र मातून पर्यावरण संरक्षण व संवर्धन साधले जाते. या साठी शासन, विविध संस्था आणि नागरिकांकडून कृतीशील सहभाग आवश्यक आहे. डहाणूतील ३५ किमी लांबीच्या किनाऱ्यावरील पर्यावरणाचा समतोल स्थानिक लोकसंस्कृतीशी जोडला गेला आहे. मात्र त्याला स्थानिक प्रशासनाची जोड लाभत नसल्याने पर्यावरण संवर्धंनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथे बाराही महिने समुद्रात वाहने उतरवून रेती उपसा केला जातो. परिणामी किनाऱ्याची धूप होत असून प्रतिवर्षी सुरू झाडांची एक रांग जमीनदोस्त होत आहे. शिवाय आठ-दहा वर्षापूर्वी आढळणारे रेतीचे साठे अविरत उपशामुळे नामशेष झाले असून त्यामुळे विणीच्या हंगामात येऊन शेकडो पिल्लांची पैदास थांबून समुद्री कासवांची परंपरा खंडित झाली आहे. केवळ जखमी व मृत कासवे आढळत आहेत. येथील किनाऱ्यावरील सुरु ंची गर्द हिरवाई आणि गवताची चादर या नैसिर्गक सौंदर्याला वृक्षतोडीचे ग्रहण लागले आहे. या मध्ये काही छुप्यारीतीने अविवेकी स्थानिकांचा हात असून विविध नियमांचा दाखला देत वन विभागाकडून प्रत्यक्ष तोड सुरू आहे. वयोमार्यादा पूर्ण झाल्याचे कारण देऊन चिखले गावातील सुमारे साडेतीनशे निलिगरी वृक्षांची कत्तल केली जात आहे. जोराचे वारे रोखणारे हे शंभरफूटी वृक्ष जमीन दोस्त होऊ घातल्याने पावसाळ्यात घरं आणि शेतीची अपरिमित हानी होणार असल्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. >उपक्रम गेला मातीत ७० हजार रोपे तुडवली जात आहेतनरपड आणि चिखले किनाऱ्यावर मागील सात-आठ वर्षांपासून ताडगोळे रोपणाचा अभिनव उपक्र म स्थानीकांकडून उत्स्फूर्तरीत्या राबविला जात आहे. मात्र डहाणू व बोर्डीवन परिक्षेत्र विभागाच्या आडमुठे धोरणामुळे सुमारे ७० हजार रोपं तुडवली जात आहेत. स्थानिकांनी अनेकदा तक्र ार करूनही वरिष्ठांकडून दखल घेतली जात नसल्यामुळे शासकीय अनास्थेचा फटका पर्यावरणाला बसतो आहे. केवळ कागदावर वुक्षारोपणाचे चारअंकी आकडे मांडले जात असून त्याची निपक्षपणे चौकशी झाल्यास प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर येईल. चिखले किनाऱ्यावर सुमारे साडेतीनशे निलिगरी वुक्षांची कत्तल वन विभागाकडून केली जात आहे. एका बाजूला वृक्षारोपणाचा निर्धार आणि दुसरीकडे कत्तल सुरू आहे. स्थानिकांना विश्वासात न घेता घडलेला हा प्रकार तत्काळ थांवविण्यात यावा.’’ -किरण पाटील चिखले ग्रामपंचायत सदस्य