शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
3
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
4
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
5
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
6
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
7
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
8
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
9
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
10
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
11
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
12
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
13
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
14
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
15
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
16
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
17
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
18
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
19
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
20
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ

मद्यनिर्मिती उद्योगांचे पाणी तातडीने बंद करा

By admin | Updated: April 9, 2016 03:08 IST

बीअर व मद्यनिर्मिती उद्योगांचे पाणी किमान दोन महिन्यांसाठी तातडीने बंद करण्याची मागणी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केली आहे. भीषण दुष्काळाचा सामना करीत असलेला मराठवाडा हा बीअर व मद्यनिर्मितीचे

औरंगाबाद : बीअर व मद्यनिर्मिती उद्योगांचे पाणी किमान दोन महिन्यांसाठी तातडीने बंद करण्याची मागणी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केली आहे. भीषण दुष्काळाचा सामना करीत असलेला मराठवाडा हा बीअर व मद्यनिर्मितीचे केंद्र म्हणून पुढे येत असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.बीअर व मद्यनिर्मिती करणाऱ्या औरंगाबादेतील १२ उद्योगांना दररोज ४० लाख लिटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे. याबाबत ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानंतर सर्वत्र खळबळ उडाली. सिल्लोडचे आ. अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला. पाऊस पडेपर्यंत येत्या दोन महिन्यांच्या कालावधीत या उद्योगांचे पाणी बंद करण्याची मागणी त्यांनी केली. अशा उद्योगांकडून मिळणाऱ्या महसुलाचा मोह राज्य सरकारला सुटत नसल्याने त्यांचे पाणी बंद करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहेत. भरमसाठ पाण्याचा वापर करणारे बीअर व मद्यनिर्मिती उद्योगच मुळात अनाठायी, अवाजवी आहेत. दुष्काळाने होरपळत असलेल्या मराठवाड्याची ओळख दारूबनविण्याचे केंद्र, अशी होत आहे. मराठवाड्याची ही क्रूरचेष्टाच नव्हे का? या उद्योगांतून फारशी रोजगारनिर्मिती होत नसल्याने त्यांचे पाणी तातडीने बंद करावे. रसायने, कागदनिर्मिती करणाऱ्या प्रक्रिया उद्योगांचीही तातडीने पाणीकपात करणे गरजेचे आहे.- प्रा. एच. एम. देसरडा, अर्थतज्ज्ञ्>> पिण्याचे पाणी, शेती आणि नंतर उद्योग, असा जायकवाडीच्या धरणातून पाण्याचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे; परंतु शेतीसाठी या धरणातील पाण्याचा वापर कधीचाच बंद झाला आहे. घोटभर पाण्यासाठी मराठवाड्यातील ग्रामीण जनतेला भटकंती करावी लागत असताना मद्यनिर्मिती उद्योगांना भरमसाठ पाणी उपलब्ध करून दिले जाते, हेच चुकीचे असून, त्यांचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याची गरज आहे.- आ. हर्षवर्धन जाधवबीअर व मद्यनिर्मिती कारखान्यांकडून होणाऱ्या पाणी वापराची राज्य शासनाने योग्य ती दखल घेणे गरजेचे आहे. या उद्योगांना नेहमीच मुबलक पाणी मिळत गेल्याने पाणी बचतीकडे त्यांचे दुर्लक्षच झाले. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवून या उद्योगांनी पाणी बचतीचे उपाय योजावेत. तसेच फेरवापरावरही भर द्यावा.- हरिभाऊ बागडे, अध्यक्ष विधानसभाटंचाईच्या काळात बीअर व मद्यनिर्मितीच नव्हे, तर सर्व प्रक्रिया उद्योगांचे पाणी तातडीने बंद करण्याची गरज आहे. या उद्योगांची पाणी कपात केल्याचे कागदोपत्री दाखविले जात असले, तरी परिस्थिती वेगळी आहे. त्यांच्या वीज देयकात सातत्याने वाढ होत आहे. याचाच अर्थ पाणीकपात नावालाच असल्याचे स्पष्ट होते. बीअर व मद्यनिर्मिती कारखान्यांनी पाण्याचा मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवला असून, पाणी बंद केले तरी त्यांच्या उत्पादनावर कसलाही परिणाम होणार नाही.- जयाजी सूर्यवंशी, अन्नदाता शेतकरी संघटना