शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

मद्यनिर्मिती उद्योगांचे पाणी तातडीने बंद करा

By admin | Updated: April 9, 2016 03:08 IST

बीअर व मद्यनिर्मिती उद्योगांचे पाणी किमान दोन महिन्यांसाठी तातडीने बंद करण्याची मागणी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केली आहे. भीषण दुष्काळाचा सामना करीत असलेला मराठवाडा हा बीअर व मद्यनिर्मितीचे

औरंगाबाद : बीअर व मद्यनिर्मिती उद्योगांचे पाणी किमान दोन महिन्यांसाठी तातडीने बंद करण्याची मागणी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केली आहे. भीषण दुष्काळाचा सामना करीत असलेला मराठवाडा हा बीअर व मद्यनिर्मितीचे केंद्र म्हणून पुढे येत असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.बीअर व मद्यनिर्मिती करणाऱ्या औरंगाबादेतील १२ उद्योगांना दररोज ४० लाख लिटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे. याबाबत ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानंतर सर्वत्र खळबळ उडाली. सिल्लोडचे आ. अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला. पाऊस पडेपर्यंत येत्या दोन महिन्यांच्या कालावधीत या उद्योगांचे पाणी बंद करण्याची मागणी त्यांनी केली. अशा उद्योगांकडून मिळणाऱ्या महसुलाचा मोह राज्य सरकारला सुटत नसल्याने त्यांचे पाणी बंद करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहेत. भरमसाठ पाण्याचा वापर करणारे बीअर व मद्यनिर्मिती उद्योगच मुळात अनाठायी, अवाजवी आहेत. दुष्काळाने होरपळत असलेल्या मराठवाड्याची ओळख दारूबनविण्याचे केंद्र, अशी होत आहे. मराठवाड्याची ही क्रूरचेष्टाच नव्हे का? या उद्योगांतून फारशी रोजगारनिर्मिती होत नसल्याने त्यांचे पाणी तातडीने बंद करावे. रसायने, कागदनिर्मिती करणाऱ्या प्रक्रिया उद्योगांचीही तातडीने पाणीकपात करणे गरजेचे आहे.- प्रा. एच. एम. देसरडा, अर्थतज्ज्ञ्>> पिण्याचे पाणी, शेती आणि नंतर उद्योग, असा जायकवाडीच्या धरणातून पाण्याचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे; परंतु शेतीसाठी या धरणातील पाण्याचा वापर कधीचाच बंद झाला आहे. घोटभर पाण्यासाठी मराठवाड्यातील ग्रामीण जनतेला भटकंती करावी लागत असताना मद्यनिर्मिती उद्योगांना भरमसाठ पाणी उपलब्ध करून दिले जाते, हेच चुकीचे असून, त्यांचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याची गरज आहे.- आ. हर्षवर्धन जाधवबीअर व मद्यनिर्मिती कारखान्यांकडून होणाऱ्या पाणी वापराची राज्य शासनाने योग्य ती दखल घेणे गरजेचे आहे. या उद्योगांना नेहमीच मुबलक पाणी मिळत गेल्याने पाणी बचतीकडे त्यांचे दुर्लक्षच झाले. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवून या उद्योगांनी पाणी बचतीचे उपाय योजावेत. तसेच फेरवापरावरही भर द्यावा.- हरिभाऊ बागडे, अध्यक्ष विधानसभाटंचाईच्या काळात बीअर व मद्यनिर्मितीच नव्हे, तर सर्व प्रक्रिया उद्योगांचे पाणी तातडीने बंद करण्याची गरज आहे. या उद्योगांची पाणी कपात केल्याचे कागदोपत्री दाखविले जात असले, तरी परिस्थिती वेगळी आहे. त्यांच्या वीज देयकात सातत्याने वाढ होत आहे. याचाच अर्थ पाणीकपात नावालाच असल्याचे स्पष्ट होते. बीअर व मद्यनिर्मिती कारखान्यांनी पाण्याचा मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवला असून, पाणी बंद केले तरी त्यांच्या उत्पादनावर कसलाही परिणाम होणार नाही.- जयाजी सूर्यवंशी, अन्नदाता शेतकरी संघटना