शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

मद्यनिर्मिती उद्योगांचे पाणी तातडीने बंद करा

By admin | Updated: April 9, 2016 03:08 IST

बीअर व मद्यनिर्मिती उद्योगांचे पाणी किमान दोन महिन्यांसाठी तातडीने बंद करण्याची मागणी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केली आहे. भीषण दुष्काळाचा सामना करीत असलेला मराठवाडा हा बीअर व मद्यनिर्मितीचे

औरंगाबाद : बीअर व मद्यनिर्मिती उद्योगांचे पाणी किमान दोन महिन्यांसाठी तातडीने बंद करण्याची मागणी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केली आहे. भीषण दुष्काळाचा सामना करीत असलेला मराठवाडा हा बीअर व मद्यनिर्मितीचे केंद्र म्हणून पुढे येत असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.बीअर व मद्यनिर्मिती करणाऱ्या औरंगाबादेतील १२ उद्योगांना दररोज ४० लाख लिटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे. याबाबत ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानंतर सर्वत्र खळबळ उडाली. सिल्लोडचे आ. अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला. पाऊस पडेपर्यंत येत्या दोन महिन्यांच्या कालावधीत या उद्योगांचे पाणी बंद करण्याची मागणी त्यांनी केली. अशा उद्योगांकडून मिळणाऱ्या महसुलाचा मोह राज्य सरकारला सुटत नसल्याने त्यांचे पाणी बंद करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहेत. भरमसाठ पाण्याचा वापर करणारे बीअर व मद्यनिर्मिती उद्योगच मुळात अनाठायी, अवाजवी आहेत. दुष्काळाने होरपळत असलेल्या मराठवाड्याची ओळख दारूबनविण्याचे केंद्र, अशी होत आहे. मराठवाड्याची ही क्रूरचेष्टाच नव्हे का? या उद्योगांतून फारशी रोजगारनिर्मिती होत नसल्याने त्यांचे पाणी तातडीने बंद करावे. रसायने, कागदनिर्मिती करणाऱ्या प्रक्रिया उद्योगांचीही तातडीने पाणीकपात करणे गरजेचे आहे.- प्रा. एच. एम. देसरडा, अर्थतज्ज्ञ्>> पिण्याचे पाणी, शेती आणि नंतर उद्योग, असा जायकवाडीच्या धरणातून पाण्याचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे; परंतु शेतीसाठी या धरणातील पाण्याचा वापर कधीचाच बंद झाला आहे. घोटभर पाण्यासाठी मराठवाड्यातील ग्रामीण जनतेला भटकंती करावी लागत असताना मद्यनिर्मिती उद्योगांना भरमसाठ पाणी उपलब्ध करून दिले जाते, हेच चुकीचे असून, त्यांचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याची गरज आहे.- आ. हर्षवर्धन जाधवबीअर व मद्यनिर्मिती कारखान्यांकडून होणाऱ्या पाणी वापराची राज्य शासनाने योग्य ती दखल घेणे गरजेचे आहे. या उद्योगांना नेहमीच मुबलक पाणी मिळत गेल्याने पाणी बचतीकडे त्यांचे दुर्लक्षच झाले. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवून या उद्योगांनी पाणी बचतीचे उपाय योजावेत. तसेच फेरवापरावरही भर द्यावा.- हरिभाऊ बागडे, अध्यक्ष विधानसभाटंचाईच्या काळात बीअर व मद्यनिर्मितीच नव्हे, तर सर्व प्रक्रिया उद्योगांचे पाणी तातडीने बंद करण्याची गरज आहे. या उद्योगांची पाणी कपात केल्याचे कागदोपत्री दाखविले जात असले, तरी परिस्थिती वेगळी आहे. त्यांच्या वीज देयकात सातत्याने वाढ होत आहे. याचाच अर्थ पाणीकपात नावालाच असल्याचे स्पष्ट होते. बीअर व मद्यनिर्मिती कारखान्यांनी पाण्याचा मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवला असून, पाणी बंद केले तरी त्यांच्या उत्पादनावर कसलाही परिणाम होणार नाही.- जयाजी सूर्यवंशी, अन्नदाता शेतकरी संघटना