शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

५ वर्षांत २०० कोटींचा अक्षरश: चुराडा

By admin | Updated: August 1, 2016 03:33 IST

पावसाळा आला की, साथीच्या आजारांच्या बातम्या येतात. तसेच खड्ड्यांची छायाचित्रे आणि बातम्यांनी रकानेच्या रकाने भरले जातात.

- सदानंद नाईक पावसाळा आला की, साथीच्या आजारांच्या बातम्या येतात. तसेच खड्ड्यांची छायाचित्रे आणि बातम्यांनी रकानेच्या रकाने भरले जातात. दरवर्षीचे हे चित्र असते. पण, यात कुठलाही बदल होत नाही. विरोधक भ्रष्टाचाराचा आरोप करतात. सत्ताधारी ते फेटाळत चौकशीचे आश्वासन देतात. पुढे काय होेते, हे कुणालाही कळत नाही. यात सामान्यजन मात्र भरडले जातात. त्यांच्या करांच्या पैशांची उधळपट्टी केली जाते. शिवाय, त्यांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतो. अन्य शहरांप्रमाणे उल्हासनगरात वेगळी परिस्थिती नाही. शहराच्या या विद्रुपीकरणाला पालिका अधिकारी, नगरसेवक आणि कंत्राटदार यांची अभद्र युतीच कारणीभूत आहे. त्यांना शहराच्या विकासाशी काहीही देणेघेणे नसते. उल्हासनगर पालिकेने पाच वर्षांत रस्ते दुरुस्तीवर २०० कोटी खर्च केले. पण, रस्त्यांची चाळण काही थांबलेली नाही. खड्ड्यांत रस्ते की रस्त्यांत खड्डे... असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. पालिका रस्तादुरुस्ती, पुनर्बांधणीसाठी दरवर्षी अर्थसंकल्पात ३५ ते ४० कोटींची तरतूद करते. त्यापैकी खड्डे भरण्यासाठी ५ ते ६ कोटी खर्च केले जातात. मात्र, दुरुस्तीनंतर महिनाभरात रस्त्यांची स्थिती जैसे थे होते. नवीन रस्त्यांच्या बांधणीनंतर थर्ड पार्टी आॅडिट होत नसल्याने निकृष्ट दर्जाचे रस्ते बांधल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात नेमलेले सल्लागारही नेहमीचेच असल्याने सर्व कामे संगनमताने केली जातात. वास्तविक, विरोधी पक्ष याविरोधात आवाज उठवण्याऐवजी आपल्या परिसरातील रस्त्यांसाठी निधी कसा मिळेल, याचाच सातत्याने विचार करत असतात.>माफक अपेक्षांनाही हरताळपालिकेने किमान मूलभूत सुविधा व्यवस्थित द्याव्यात, एवढी माफक अपेक्षा नागरिकांची असते. पण, नेमका याचाच विसर प्रशासनाला होतो. आपण सामान्यांच्या सेवेसाठी नाहीतर कंत्राटदारांकरिता आहोत, हे त्यांना व्यवस्थित ठाऊक असते. त्यातूनच भ्रष्टाचाराला सुुरुवात होते आणि शहराला बकालपणा येऊ लागतो.>महापालिकेच्या प्रमुख उत्पन्नाच्या स्रोतांपैकी एलबीटीचे उत्पन्न बंद झाले. त्या बदल्यात सरकारकडून मिळालेला निधी अपुरा आहे. तसेच अधिकाऱ्यांची संख्या कमी असून सरकार प्रतिनियुक्तीवर अधिकारी देत नाही. त्यामुळे पालिकेचा गाडा प्रभारी कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून हाकावा लागत आहे. या सर्वांचा परिणाम विकासकामांवर झाला आहे. सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षाने आपली भूमिका अचूक वठ्रवल्यास विकासकामाला वेग येईल. - मनोहर हिरे पालिका आयुक्त उल्हासनगर >10 वर्षांत 450 ते ५०० कोटी रुपये खर्च करूनही रस्त्याची परिस्थिती सुधारलेली नाही. अनेक रस्त्यांची दुरुस्ती कोट्यवधींच्या निधीतून वर्षातून दोन वेळा करण्याची वेळ पालिकेवर येते. निकृष्ट बांधकाम करणाऱ्या एकाही कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची हिंमत पालिकेने दाखवली नाही. रस्तेबांधणीची कामे या क्षेत्रात मक्तेदारी असलेल्या कंपन्यांकडे जात असल्याने भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जाते. यातूनच निकृष्ट दर्जाचे काम केले जाते. आणि सरतेशेवटी याचा सर्वाधिक त्रास केवळ आणि केवळ नागरिकांनाच होतो.कलानींच्या काळातील रस्ते मजबूततत्कालीन नगराध्यक्ष पप्पू कलानी यांनी शहरातील रस्ते काँक्रिटीकरणास सुरुवात केल्यानंतर राज्यातून त्यांच्यावर टीकेचा भडीमार झाला. कालांतराने मजबूत व टिकाऊ असा ‘उल्हासनगर पॅटर्न’ मुंबईसह राज्यातील इतर शहरांनी राबवला. १९८० ते ९२ दरम्यान गोलमैदान रस्ता, नेहरू चौक ते उल्हानगर पोलीस ठाणे, मुख्य बाजारातील रस्ते, कल्याण-अंबरनाथ महामार्गाच्या रस्त्यासह अनेक मुख्य रस्ते बांधले. कलानींच्या सत्ताकाळात बांधलेल्या बहुतांश रस्त्यांची स्थिती आजही चांगली आहे. मात्र, १९९२ नंतर बांधलेल्या काँॅक्रिटच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. तेच ते रस्ते आलटूनपालटून बांधण्यात येत आहेत.