शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

ब्रिटिशकालीन पैसेवारीला हायकोर्टात आव्हान

By admin | Updated: January 16, 2016 01:22 IST

शेतपिकाचे मूल्यमापन करणाऱ्या ब्रिटिशकालीन पैसेवारी पद्धतीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. ही पद्धत सदोष असून त्यामुळे

नागपूर : शेतपिकाचे मूल्यमापन करणाऱ्या ब्रिटिशकालीन पैसेवारी पद्धतीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. ही पद्धत सदोष असून त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला आहे.सायतखर्डा, ता. घाटंजी (यवतमाळ) येथील ग्रामविकास बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. नीलेश चावरडोल यांनी ही याचिका दाखल केली आहे. या पद्धतीची सदोषता सिद्ध करण्यासाठी २० आॅक्टोबर २०१५ रोजीच्या ‘जीआर’द्वारे जाहीर पैसेवारीचे उदाहरण याचिकेत देण्यात आले आहे. या ‘जीआर’द्वारे ५० टक्क्यांवर व ५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. अमरावती विभागापेक्षा यवतमाळ जिल्ह्यात दुष्काळाचा प्रभाव जास्त होता. परंतु या जिल्ह्यातील वणी तालुक्यातील केवळ दोन गावे वगळता सर्व गावांची पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. यामुळे या पद्धतीतील दोष थेट शेतकऱ्यांच्या जीवनाला प्रभावित करतो. त्यामुळे पीक मूल्यमापनासाठी तज्ज्ञ व अनुभवी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी व संपूर्ण गावातील पिकांची स्थिती तपासण्यात यावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.शासनाला दोन आठवड्यांची मुदतन्यायमूर्ती भूषण गवई व न्यायमूर्ती प्रदीप देशमुख यांच्यासमक्ष गुरुवारी याचिकेवर सुनावणी झाली. त्यांनी शासनाला नोटीस बजावून दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.