शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

महाराष्ट्राच्या पाणीटंचाईकडे केंद्राचे दुर्लक्ष

By admin | Updated: April 9, 2016 01:09 IST

भारताचे शेजारी राष्ट्र मालदीव बेटात डिसेंबर २0१४ मध्ये पाण्याचे संकट उभे राहिले तेव्हा पंतप्रधान मोदींनी तत्परतेने हवाई दलाच्या ५ विमानाव्दारे व नेव्हीच्या लढाऊ जहाजांव्दारे लाखो

सुरेश भटेवरा : नितीन अग्रवाल ,  नवी दिल्लीभारताचे शेजारी राष्ट्र मालदीव बेटात डिसेंबर २0१४ मध्ये पाण्याचे संकट उभे राहिले तेव्हा पंतप्रधान मोदींनी तत्परतेने हवाई दलाच्या ५ विमानाव्दारे व नेव्हीच्या लढाऊ जहाजांव्दारे लाखो टन पाणी मालदीवला पाठवले. आपल्या अनेक परदेश दौऱ्यात या कृतीचा गौरवपूर्ण उल्लेखही पंतप्रधानांनी साऱ्या जगाला ऐकवला. महाराष्ट्राच्या भीषण दुष्काळात पिण्याच्या पाण्याचे देखील संकट निर्माण झाले असतांना, केंद्रातले मोदी सरकार नेमके काय करते आहे, याची लोकमतच्या दिल्ली ब्युरोने माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता, केंद्रीय जलसंसाधन मंत्रालयाकडून विचित्र उत्तरे ऐकायला मिळाली. राष्ट्रीय आपत्ती निवारण यंत्रणा (एनडीआरएफ) देखील याविषयी सक्रिय नसल्याचे जाणवले. अपवाद फक्त सुरेश प्रभूंच्या रेल्वे मंत्रालयाचा, मराठवाड्यात विशेषत: लातूरमधे वॉटर ट्रेन चालवण्याचा इरादा प्रभूंनी व्यक्त केला आहे.महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त भागात पाणी पोहोचवण्यासाठी आपले मंत्रालय नेमके काय करते आहे, याची माहिती लोकमतने केंद्रीय जलसंसाधन मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना विचारली तेव्हा ‘तूर्त सारे मंत्रालय जल सप्ताहाच्या विविध कार्यक्रमांमधे व्यस्त आहे, सोमवारपूर्वी या संबंधी कोणतीही माहिती देता येणार नाही. महाराष्ट्रातल्या पाणी संकटासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची मदत पुरवण्याची तूर्त कोणतीही योजना नाही’, असे विचित्र उत्तर ऐकायला मिळाले. रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारच्या विनंतीनुसार पंढरपूर लातूर रेल्वे झोनमधे बॉक्स टाईप न्यूॅमॅटिक (बीपीटीएन)५0 टँकर्स वॅगन्सच्या, दोन वॉटर ट्रेन्स चालवण्याचे ठरवले आहे. एका टँकर वॅगनमधे अंदाजे ५५ हजार लिटर्स पाणी यानुसार एका वॉटर ट्रेनव्दारा एकावेळी २७ लाख ५0 हजार लिटर्स पाण्याची वाहतूक केली जाणार आहे. संपूर्ण उन्हाळयात रेल्वेच्या या दोन वॉटर ट्रेन्स, पंढरपूर लातूर विभागात तैनात असतील व गरजेनुसार त्याव्दारे लातूरसह अन्य गावांना पाणीपुरवठा केला जाईल, असे रेल्वे मंत्रालयाच्या सूत्रांकडून समजले.