शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

राज्य आपत्ती निवारण निधीत आता केंद्राचा वाटा ९० टक्के

By admin | Updated: March 8, 2015 02:40 IST

राज्यांच्या आपत्ती निवारण निधीतील (स्टेट डिझस्टर रिलिफ फंड) सहभागाचे सूत्र चौदाव्या वित्त आयोगाने बदलले असून यापुढे या निधीत केंद्र सरकारचा वाटा ९० टक्के व राज्यांचा वाटा १० टक्के असणार आहे.

अजित गोगटे - मुंबईराज्यांच्या आपत्ती निवारण निधीतील (स्टेट डिझस्टर रिलिफ फंड) सहभागाचे सूत्र चौदाव्या वित्त आयोगाने बदलले असून यापुढे या निधीत केंद्र सरकारचा वाटा ९० टक्के व राज्यांचा वाटा १० टक्के असणार आहे. परिणामी आगामी पाच वर्षांत महाराष्ट्राला आपत्ती निवारण निधीसाठी केंद्राकडून एकूण ७,३७६ कोटी रुपये मिळणार आहेत.आधीच्या आयोगांनी स्वीकारलेली पद्धत आणि गेल्या पाच वर्षांत आपत्ती निवारण कामांसाठी करावा लागलेला खर्च विचारात घेऊन आयोगाने देशातील सर्व राज्यांसाठी मिळून आपत्ती निवारण निधीसाठी ६१,२१९ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यापैकी महाराष्ट्राचा आगामी पाच वर्षांसाठीचा वाटा ८,१९५ कोटी रुपयांचा असेल. त्यात ७,३७६ कोटी रुपये केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून मिळतील व बाकीची ८२० कोटी रुपयांची रक्कम राज्याला घालावी लागेल.सध्या काही ठराविक नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींसाठीच या निधीतून खर्च करण्याची तरतूद आहे. अनेक राज्यांनी यात वीज कोसळणे, सर्पदंश,समुद्र किंवा नदीमुळे जमिनीची धूप होणे, दरडी कोसळणे, ढगफुटी, बांबूला फुलोरा येणे इत्यादी आपत्तीकारक घटनांचा समावेश करण्याचा आग्रह धरला होता. परंतु नानाविध प्रकारची नैसर्गिक स्थिती असलेल्या भारतासारख्या देशात सर्वत्र लागू होईल असे आपत्तीचे असे कोणतेही स्वरूप आधीच ठरविणे कठीण असल्याने आयोगाने आपत्तींची सध्याची यादी विस्तारण्याची कोणतीही शिफारस केली नाही. मात्र राज्यसापेक्ष आपत्तीची परिस्थिती हाताळण्यात लवचकिता असावी यासाठी राज्य आपत्ती निवारण निधीतील १० टक्क्यांपर्यंत रक्कम, यादीत नसलेल्या परंतु राज्याला गरजेचे वाटेल अशा आपत्तीसाठी खर्च करण्याची राज्यांना मुभा असावी, असे आयोगाने सुचविले आहे. मात्र राज्यांनी आपल्यादृष्टीने राज्यसापेक्ष आपत्ती आधीच अधिसूचित कराव्यात व त्यासाठी निधी वापराचे निकषही ठरवावेत, असे आयोगाने म्हटले आहे.सध्याच्या व्यवस्थेनुसार काही निवडक वस्तूंवर आकारला जाणारा अधिभार हाच आपत्ती निवारण निधीसाठी पैसे उभे करण्याचा एकमेव मार्ग आहे. परंतु हे अधिभार कालांतराने बंद झाले किंवा वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यावर त्यात सामावून घेतले गेले तर हा मार्ग ही बंद होईल. त्यामुळे सरकारने या निधीसाठी पैसे उभे करण्याचा खात्रीशीर पर्यायी मार्ग शोधावा, असे आयोगाने सुचविले आहे.याच अनुषंगाने आयोगाने असेही म्हटले आहे की, सामान्य लोक व उद्योग विश्वालाही या निधीमध्ये सहभागी करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी कंपन्यांच्या मान्यताप्राप्त ‘सीएसआर’ कामांमध्ये आपत्ती निवारण निधीला दिलेल्या देणग्यांचा समावेश करणे आणि पंतप्रधान मदत निधीप्रमाणे या निधीवरही प्राप्तिकरात सूट देणे, या उपायांवर सरकारने सक्रियतेने विचार करावा.राज्य आपत्ती निधीतील केंद्र, राज्य सरकारचा वाटावर्षकेंद्र सरकार राज्य सरकार२०१५-१६ १,३३५ कोटी १४८ कोटी२०१६-१७ १,४०२ कोटी१५६ कोटी२०१७-१८ १,४७२कोटी१६४ कोटी२०१८-१९ १,५४५ कोटी १७२ कोटी२०१९-२०१,६२२ कोटी १८० कोटी