शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

राज्य आपत्ती निवारण निधीत आता केंद्राचा वाटा ९० टक्के

By admin | Updated: March 8, 2015 02:40 IST

राज्यांच्या आपत्ती निवारण निधीतील (स्टेट डिझस्टर रिलिफ फंड) सहभागाचे सूत्र चौदाव्या वित्त आयोगाने बदलले असून यापुढे या निधीत केंद्र सरकारचा वाटा ९० टक्के व राज्यांचा वाटा १० टक्के असणार आहे.

अजित गोगटे - मुंबईराज्यांच्या आपत्ती निवारण निधीतील (स्टेट डिझस्टर रिलिफ फंड) सहभागाचे सूत्र चौदाव्या वित्त आयोगाने बदलले असून यापुढे या निधीत केंद्र सरकारचा वाटा ९० टक्के व राज्यांचा वाटा १० टक्के असणार आहे. परिणामी आगामी पाच वर्षांत महाराष्ट्राला आपत्ती निवारण निधीसाठी केंद्राकडून एकूण ७,३७६ कोटी रुपये मिळणार आहेत.आधीच्या आयोगांनी स्वीकारलेली पद्धत आणि गेल्या पाच वर्षांत आपत्ती निवारण कामांसाठी करावा लागलेला खर्च विचारात घेऊन आयोगाने देशातील सर्व राज्यांसाठी मिळून आपत्ती निवारण निधीसाठी ६१,२१९ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यापैकी महाराष्ट्राचा आगामी पाच वर्षांसाठीचा वाटा ८,१९५ कोटी रुपयांचा असेल. त्यात ७,३७६ कोटी रुपये केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून मिळतील व बाकीची ८२० कोटी रुपयांची रक्कम राज्याला घालावी लागेल.सध्या काही ठराविक नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींसाठीच या निधीतून खर्च करण्याची तरतूद आहे. अनेक राज्यांनी यात वीज कोसळणे, सर्पदंश,समुद्र किंवा नदीमुळे जमिनीची धूप होणे, दरडी कोसळणे, ढगफुटी, बांबूला फुलोरा येणे इत्यादी आपत्तीकारक घटनांचा समावेश करण्याचा आग्रह धरला होता. परंतु नानाविध प्रकारची नैसर्गिक स्थिती असलेल्या भारतासारख्या देशात सर्वत्र लागू होईल असे आपत्तीचे असे कोणतेही स्वरूप आधीच ठरविणे कठीण असल्याने आयोगाने आपत्तींची सध्याची यादी विस्तारण्याची कोणतीही शिफारस केली नाही. मात्र राज्यसापेक्ष आपत्तीची परिस्थिती हाताळण्यात लवचकिता असावी यासाठी राज्य आपत्ती निवारण निधीतील १० टक्क्यांपर्यंत रक्कम, यादीत नसलेल्या परंतु राज्याला गरजेचे वाटेल अशा आपत्तीसाठी खर्च करण्याची राज्यांना मुभा असावी, असे आयोगाने सुचविले आहे. मात्र राज्यांनी आपल्यादृष्टीने राज्यसापेक्ष आपत्ती आधीच अधिसूचित कराव्यात व त्यासाठी निधी वापराचे निकषही ठरवावेत, असे आयोगाने म्हटले आहे.सध्याच्या व्यवस्थेनुसार काही निवडक वस्तूंवर आकारला जाणारा अधिभार हाच आपत्ती निवारण निधीसाठी पैसे उभे करण्याचा एकमेव मार्ग आहे. परंतु हे अधिभार कालांतराने बंद झाले किंवा वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यावर त्यात सामावून घेतले गेले तर हा मार्ग ही बंद होईल. त्यामुळे सरकारने या निधीसाठी पैसे उभे करण्याचा खात्रीशीर पर्यायी मार्ग शोधावा, असे आयोगाने सुचविले आहे.याच अनुषंगाने आयोगाने असेही म्हटले आहे की, सामान्य लोक व उद्योग विश्वालाही या निधीमध्ये सहभागी करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी कंपन्यांच्या मान्यताप्राप्त ‘सीएसआर’ कामांमध्ये आपत्ती निवारण निधीला दिलेल्या देणग्यांचा समावेश करणे आणि पंतप्रधान मदत निधीप्रमाणे या निधीवरही प्राप्तिकरात सूट देणे, या उपायांवर सरकारने सक्रियतेने विचार करावा.राज्य आपत्ती निधीतील केंद्र, राज्य सरकारचा वाटावर्षकेंद्र सरकार राज्य सरकार२०१५-१६ १,३३५ कोटी १४८ कोटी२०१६-१७ १,४०२ कोटी१५६ कोटी२०१७-१८ १,४७२कोटी१६४ कोटी२०१८-१९ १,५४५ कोटी १७२ कोटी२०१९-२०१,६२२ कोटी १८० कोटी