शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
4
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
5
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
6
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
7
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
8
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
9
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
10
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
11
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
12
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
13
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
14
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
15
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
16
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
17
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
18
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
19
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
20
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत

टाऊन हॉलच्या उद्देशाला हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2016 03:48 IST

शहरातील सर्वसामान्य नागरिकांना कार्यक्रमासाठी नाममात्र दराने हॉल उपलब्ध व्हावा तसेच सामाजिक व सांस्कृतिक चळवळ जिवंत राहावी

शहरातील सर्वसामान्य नागरिकांना कार्यक्रमासाठी नाममात्र दराने हॉल उपलब्ध व्हावा तसेच सामाजिक व सांस्कृतिक चळवळ जिवंत राहावी, यासाठी १९९० च्या सुमारास उल्हासनगर नगरपालिकेचे तत्कालीन नगराध्यक्ष पप्पू कलानी यांनी टाऊन हॉल बांधला. कालांतराने सत्ताधारी आणि विरोधकांचे हॉलकडे दुर्लक्ष झाल्याने त्याची दुरवस्था झाली. त्यानंतर, हा हॉल कंत्राटदाराला ३० वर्षांसाठी बीओटी तत्त्वावर देण्यात आला. रविवार सोडून अन्य दिवशी सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांना माफक दरात तो मिळत नसल्याने हॉल बांधण्यामागील मूळ उद्देशालाच कंत्राटदाराने हरताळ फासला आहे. सर्वसामान्यांपेक्षा त्याचेच हित जपल्याची चर्चा शहरात आहे. कंत्राटदाराकडून करारनाम्यातील अटी सर्रास पायदळी तुडवल्या जात आहेत. १५ वर्षांत टाऊन हॉलचे एकदाही आॅडिट झाले नसून पूर्णत्वाच्या दाखल्याविना हॉलचा वापर होत आहे. कंत्राटदार अव्वाच्यासव्वा दर आकारून बक्कळ पैसा कमवत असल्याचा आरोप होत असूनही सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाचे नगरसेवक मूग गिळून गप्प आहेत. याचे कारण या मंडळींना कार्यक्रमासाठी कंत्राटदार हॉल विनामूल्य देत असल्याने ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ या धोरणामुळे त्यााविषयी कुणीही उघडपणे बोलायला तयार नाही. कंत्राटदार आणि राजकीय नेत्यांचे साटेलोटे असल्यामुळे शहरात वेगळीच संस्कृती रुजण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहरातील सांस्कृतिक चळवळ जिवंत ठेवण्यासाठी हॉल ताब्यात घेण्याची मागणी समाजसेवी संघटनांसह शहरातील सुजाण नागरिकांनी पालिकेकडे केली आहे. टाऊन हॉलच्या दुरवस्थेनंतर त्याच्या पुनर्बांधणीसाठी दोन कोटींची आवश्यकता होती. मात्र, त्या वेळी पालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने टाऊन हॉल बीओटी तत्त्वावर देण्याचे तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी ठरवले. मात्र, आता कंत्राटदारामुळे पालिकेचा हा उद्देश सफल झालेला दिसत नाही.>१९९९ मध्ये हा हॉल ३० वर्षांसाठी बीओटी तत्त्वावर देण्याचे महासभेने मान्य केले. टाऊन हॉलच्या दुरुस्तीसाठी दोन कोटींचा खर्च येणार होता. त्यासाठी कंत्राटदाराने बीअर बार, हॉटेल, मॅरेज लॉन्स, व्यायामशाळा बांधले. या सर्व गोष्टी कंत्राटदाराने भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. कंत्राटदाराला हवे तेवढे भाडे आकारण्याची मुभा पालिकेने कंत्राटदाराला दिली आहे. यामुळे तो स्वत:चा खिसा भरत असताना दुसऱ्या बाजूला पालिकेला तो वर्षाला फक्त तीन लाख देतो. मुख्य टाऊन हॉलमधील प्रेक्षागृह नाटक, सांस्कृतिक, सामाजिक त्याचप्रमाणे विविध स्पर्धा, कार्यक्रमांसाठी माफक दरात नागरिकांना उपलब्ध करून देण्याची अट कंत्राटदाराला घालण्यात आली आहे.मात्र, हा नियम धाब्यावर बसवून तो मनमानीपणे भाडे आकारतो, अशी सर्वसामान्यांची तक्रार आहे. येणारी पार्टी कशी आहे, त्यावर तो भाडे ठरवतो, असेही कंत्राटदाराच्या बाबतीत बोलले जात आहे. सर्वसामान्यांना नेहमीच्या धकाधकीच्या जीवनातून काही क्षण विरंगुळा मिळावा म्हणून तो नाटक, चित्रपट, एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जातो. मात्र, उल्हासनगरमध्ये याच्या उलटे चित्र आहे. सामान्यांसाठी बांधलेल्या टाऊन हॉलचा उपयोग आज त्यांना न होता कंत्राटदाराला होत आहे. याचे दर आवाक्याबाहेर असल्याने मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे. टाऊन हॉलचा कारभार आणि कंत्राटदार यांच्याविषयी साशंकता व्यक्त होत आहे. त्यातच, कंत्राटदाराने विनापरवानगी आणि पूर्णत्वाचा दाखला न घेता हॉलचा वापर सुरू केल्याने पालिकेच्या कारभारातही पारदर्शकता नाही, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.>श्रीमंतांना परवडणारे दर सामाजिक संस्था, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजक तसेच सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर हॉलचे भाडे आहे. श्रीमंतांना परवडण्यासाठी व कंत्राटदाराची चांदी व्हावी, याकरिताच हॉल बीओटी तत्त्वावर दिल्याचा आरोप होत आहे. दराबाबत पारदर्शकता नसल्याने कंत्राटदार अव्वाच्यासव्वा भाडे आकारत असल्याचे उघड झाले आहे. तीन तासासाठी ७० ते ८० हजार भाडे आकारत असल्याचे शहरामध्ये बोलले जात आहे. रविवारी हा हॉल भाडेतत्त्वावर देण्याचा अधिकार पालिकेकडे आहे. मात्र, त्यासाठी तीन महिने आधी बुकिंग करावे लागते. >पालिकेच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्हकंत्रादाराने टाऊन हॉलची पुनर्बांधणी करताना पालिकेची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. तसेच पूर्णत्वाच्या दाखल्याविना हॉलचा वापर सुरू केला आहे. गेल्या १५ वर्षांपासून हॉलचा वापर करणाऱ्या कंत्राटदाराने पूर्णत्वाचा दाखला घेतलेला नाही, हे प्रशासनाच्या लक्षात कसे आले नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. की, लक्षात येऊनही दुर्लक्ष केले जात आहे, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. पालिकेने पूर्णत्वाच्या दाखल्याविषयी कोणताही आक्षेप का घेतला नाही, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. हॉलला शहीद जनरल अरुणकुमार वैद्य यांचे नाव देण्यात आले आहे. प्रेक्षागृहाची देखरेख तसेच मूलभूत सुविधा कंत्राटदाराने पुरवल्या नाही. परिणामी, एखादा अपवाद सोडल्यास नाटक, चित्रपट, सांस्कृतिक कार्यक्रम झाले नाही. तसेच हॉलमधील काही भाग कंत्राटदाराने उपकंत्राटदाराला भाडेतत्त्वावर देण्याचा प्रताप केल्याचा आरोप होत आहे. कंत्राट रद्द करण्याची मागणी वारंवार केली जात आहे. हॉलमधील बीअर बारमध्ये हुक्कापार्लर सुरू असल्याचा आरोप महासभेत झाला होता. यावर, पालिका आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले होते. पुढे चौकशी बासनात गुंडाळण्यात आली. टाऊन हॉलचा कंत्राटदार भाजपाचा पदाधिकारी असल्याची टीका होत आहे. हा पदाधिकारी लोकप्रतिनिधी असून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी झाली आहे. मात्र, सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना विविध कार्यक्रमांसाठी मोफत अथवा माफक दरात हॉल दिला जात असल्याने ते हॉलच्या गैरव्यवहाराबाबत काहीच बोलत नसल्याची चर्चा पालिका वर्तुळात होत आहे.