शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
7
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
8
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
9
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
10
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
11
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
12
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
13
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
14
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
15
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
16
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
17
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
18
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
19
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
20
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार

शेतीमालाला ‘ब्रॅण्डिंग’ चे बळ!

By admin | Updated: May 22, 2014 02:16 IST

विदर्भातील शेतकर्‍याचा माल देशातच नव्हे तर विदेशात पोहोचावा. त्याला योग्य भाव मिळावा.

विदर्भातील शेतकर्‍याचा माल देशातच नव्हे तर विदेशात पोहोचावा. त्याला योग्य भाव मिळावा. अन् येथील शेतकरी समृद्ध व्हावा. यासाठी कृषी व पणन मंडळाने येथील शेतकर्‍यांच्या मालाचे ब्रॅण्डिंग करून त्याची स्वत: विक्री करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यात सर्वप्रथम तांदूळ पिकाची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, विदर्भातील हा पहिलाच प्रयोग मानल्या जात आहे. शेतकरी हा दिवस-रात्र काबाडकष्ट करतो. धान्य पिकवतो. पण त्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. ही वस्तुस्थिती राहिली आहे. व्यापारी कमी किमतीत माल खरेदी करून त्यावर लाखो रुपयांचा नफा मिळवितो. परंतु त्याचा शेतकर्‍यांना काहीही फायदा होत नाही.

विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात भाताचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन होते. शिवाय येथे पिकणारा तांदूळ हा चविष्ट व दज्रेदार असतो. मात्र असे असताना शेतकर्‍याच्या या तांदळाला कधीच योग्य भाव मिळत नाही. कृषी व पणन मंडळाने ही गोष्ट लक्षात घेऊ न, यंदा स्वत: शेतकर्‍यांचा धान २५00 ते २६00 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करून तो राज्यभरात पोहोचविला आहे. यात पणन मंडळाने सुमारे ११00 ते १२00 क्विंटल धानाची खरेदी करून त्याची ‘महाराईस’ या ब्रॅण्डच्या नावाने विक्री केली आहे. पणन मंडळाच्या या प्रयोगाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, त्यातून मंडळाचे मनोबल वाढले आहे. कदाचित यामुळेच मंडळाने आता तूर डाळ, भिवापुरी मिरची व हळदीचे ब्रॅण्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, पणन मंडळाने शेतकर्‍यांचा तांदूळ ५, १0 व २५ किलोच्या आकर्षक पॅकिंगमध्ये ‘महाराईस’ नावाने बाजारात उपलब्ध केला आहे. यातून गत वर्षभरात पुणे, मुंबई, ठाणे व औरंगाबाद शहरात या तांदळाची मोठय़ा प्रमाणात विक्री केली आहे.

शेतकर्‍यांना मिळणार बोनस

विशेष म्हणजे, कृषी व पणन मंडळाला ‘महाराईस’च्या विक्रीतून मिळणारा नफा शेतकर्‍यांना बोनस स्वरूपात परत केला जाणार आहे. पणन मंडळ शेतकर्‍यांकडून २५00 ते २६00 रुपये प्रति क्विंटल दराने धान खरेदी करून, त्याची ‘महाराईस’नावाने ५५ ते ६0 रुपये प्रति किलो दराने विक्री करीत आहे. यातून मंडळाला मोठय़ा प्रमाणात नफा मिळत आहे. पुढील वर्षभरात हा नफा पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. यातून मंडळाकडे एक मोठी रक्कम गोळा होताच, ती संबंधित शेतकर्‍यांना बोनस स्वरूपात परत केली जाणार आहे. विशेष म्हणजे, असा प्रयोग यापूर्वी केवळ कापूस पणन महासंघाने केला आहे. मात्र धान उत्पादक शेतकर्‍यांना प्रथमच असा दुहेरी लाभ मिळणार आहे.