शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
3
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
4
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
5
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
6
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
7
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
8
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
9
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
10
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
11
संपादकीय : विरोधकांशी बोलणार कोण? विरोधकांच्या प्रश्नांवर सरकारची चुप्पी आणि संसदीय कोंडी
12
जशी नोटाबंदी, टाळेबंदी.. तशीच नवी ‘व्होटबंदी’! निवडणूक आयोगाच्या नव्या मतदार यादी मोहिमेचे विच्छेदन
13
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
14
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
15
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
16
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
17
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
18
पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार
19
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
20
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  

शेतीमालाला ‘ब्रॅण्डिंग’ चे बळ!

By admin | Updated: May 22, 2014 02:16 IST

विदर्भातील शेतकर्‍याचा माल देशातच नव्हे तर विदेशात पोहोचावा. त्याला योग्य भाव मिळावा.

विदर्भातील शेतकर्‍याचा माल देशातच नव्हे तर विदेशात पोहोचावा. त्याला योग्य भाव मिळावा. अन् येथील शेतकरी समृद्ध व्हावा. यासाठी कृषी व पणन मंडळाने येथील शेतकर्‍यांच्या मालाचे ब्रॅण्डिंग करून त्याची स्वत: विक्री करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यात सर्वप्रथम तांदूळ पिकाची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, विदर्भातील हा पहिलाच प्रयोग मानल्या जात आहे. शेतकरी हा दिवस-रात्र काबाडकष्ट करतो. धान्य पिकवतो. पण त्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. ही वस्तुस्थिती राहिली आहे. व्यापारी कमी किमतीत माल खरेदी करून त्यावर लाखो रुपयांचा नफा मिळवितो. परंतु त्याचा शेतकर्‍यांना काहीही फायदा होत नाही.

विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात भाताचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन होते. शिवाय येथे पिकणारा तांदूळ हा चविष्ट व दज्रेदार असतो. मात्र असे असताना शेतकर्‍याच्या या तांदळाला कधीच योग्य भाव मिळत नाही. कृषी व पणन मंडळाने ही गोष्ट लक्षात घेऊ न, यंदा स्वत: शेतकर्‍यांचा धान २५00 ते २६00 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करून तो राज्यभरात पोहोचविला आहे. यात पणन मंडळाने सुमारे ११00 ते १२00 क्विंटल धानाची खरेदी करून त्याची ‘महाराईस’ या ब्रॅण्डच्या नावाने विक्री केली आहे. पणन मंडळाच्या या प्रयोगाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, त्यातून मंडळाचे मनोबल वाढले आहे. कदाचित यामुळेच मंडळाने आता तूर डाळ, भिवापुरी मिरची व हळदीचे ब्रॅण्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, पणन मंडळाने शेतकर्‍यांचा तांदूळ ५, १0 व २५ किलोच्या आकर्षक पॅकिंगमध्ये ‘महाराईस’ नावाने बाजारात उपलब्ध केला आहे. यातून गत वर्षभरात पुणे, मुंबई, ठाणे व औरंगाबाद शहरात या तांदळाची मोठय़ा प्रमाणात विक्री केली आहे.

शेतकर्‍यांना मिळणार बोनस

विशेष म्हणजे, कृषी व पणन मंडळाला ‘महाराईस’च्या विक्रीतून मिळणारा नफा शेतकर्‍यांना बोनस स्वरूपात परत केला जाणार आहे. पणन मंडळ शेतकर्‍यांकडून २५00 ते २६00 रुपये प्रति क्विंटल दराने धान खरेदी करून, त्याची ‘महाराईस’नावाने ५५ ते ६0 रुपये प्रति किलो दराने विक्री करीत आहे. यातून मंडळाला मोठय़ा प्रमाणात नफा मिळत आहे. पुढील वर्षभरात हा नफा पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. यातून मंडळाकडे एक मोठी रक्कम गोळा होताच, ती संबंधित शेतकर्‍यांना बोनस स्वरूपात परत केली जाणार आहे. विशेष म्हणजे, असा प्रयोग यापूर्वी केवळ कापूस पणन महासंघाने केला आहे. मात्र धान उत्पादक शेतकर्‍यांना प्रथमच असा दुहेरी लाभ मिळणार आहे.