शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

फुकाच्या श्रेयासाठी भाजपा-सेनेत चढाओढ

By admin | Updated: February 15, 2017 03:59 IST

मोनो, मेट्रो, कोस्टल रोड या सगळ्या प्रकल्पांचे श्रेय घेण्यासाठी भाजपा आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. मात्र, या सर्व प्रकल्पांची मुहूर्तमेढ

अतुल कुलकर्णी / मुंबईमोनो, मेट्रो, कोस्टल रोड या सगळ्या प्रकल्पांचे श्रेय घेण्यासाठी भाजपा आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. मात्र, या सर्व प्रकल्पांची मुहूर्तमेढ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात रोवली गेली असून, त्यावर आॅगस्ट २०१२ पर्यंत तब्बल १७९७ कोटी रुपये खर्च झाले होते. शिवाय, मुंबईत एमएमआरडीएने हाती घेतलेल्या मोठ्या २० प्रकल्पांवर आघाडी सरकारच्या काळात ९,८८१ कोटी रुपये खर्च झाले असताना, या कामांचेही श्रेय लाटण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.२००१ साली तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री सुनील तटकरे यांनी मोनो आणि मेट्रोची माहिती विधानसभेत दिली होती. त्या वेळी शिवसेनेचे सभागृहातील सदस्य प्रमोद नवलकर आणि दत्ताजी नलावडे यांनी हे सगळे दिवास्वप्न आहे. मुंबईत ते शक्य नाही, असे ठासून सांगत याला विरोध केला होता. अशी मोठी कामे करण्यासाठी कागदपत्रांचे ढिगारे उपसावे लागतात, गल्लीपासून दिल्लीपर्यंत मान्यता घ्याव्या लागतात त्यामुळे असली कामे पूर्ण होण्यास विलंब लागतो हे वास्तव असले तरी श्रेयाची लढाई मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने चव्हाट्यावर आली आहे.मेट्रो आणि मोनोचे वास्तव !मुंबई मेट्रोचे ९ मार्ग असतील व त्यांची एकूण लांबी १४६.५ कि.मी. असेल. असा निर्णय २८ मे २००४ साली घेण्यात आला. त्याचवेळी हे काम तीन टप्प्यात होईल व तिसरा टप्पा २०२१ साली पूर्ण होईल असेही ठरले. वर्सोवा अंधेरी घाटकोपर मेट्रो मार्ग पहिल्या टप्प्याच्या कामास आॅगस्ट २००४ साली मंजुरी दिली गेली. चारकोप वांद्रे मानखूर्द मेट्रो मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामास केंद्रसरकारने ३ नोव्हेंबर २००८ रोजी १५३२ कोटींच्या तफावत निधीस मंजूरी दिली. त्यासाठी मुंबई मेट्रो ट्रान्सपोर्ट प्रा. लि. कंपनी स्थापन केली गेली व यासाठीचा सवलत करारनाम्यावर २१ जानेवारी २०१० रोजी सह्या करण्यात आल्या. या प्रकल्पाला २० डिसेंबर २०११ रोजी काही अटींच्या अधीन राहून केंद्रीय पर्यावरण विभागाने मंजूरीही दिली.३३.८५ कि.मी. लांबीचे व २४,४३० कोटी रुपये खर्चाचे कुलाबा बांद्रे सिप्झ मेट्रो मार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम करण्यासाठी भारत सरकारने ११ डिसेंबर २०११ रोजी या प्रकल्पाची जायका रोलिंग प्लॅनमध्ये अंशत: भुयारी मार्ग म्हणून समावेश करण्याची शिफारस केली. नोव्हेंबर २०११ व फेब्रुवारी २०१२ मध्ये जायका संपर्क मंडळाने मुंबई महागनर प्रदेश विकास प्राधिकारणाला भेट देऊन मार्च २०१२ मध्ये या प्रकल्पाची पूर्णत: भुयारी म्हणून जायका रोलिंग प्लॅनमध्ये समाविष्ट करण्याची शिफारस केंद्र सरकारने केली. यासाठी ११ एप्रिल २०१२ रोजी जनसुनावणी झाली व त्ळाचा अहवाल व पर्यावरण अभ्यास अहवाल जुलै २०१२ मध्ये जायकाला सादर केला गेला.कोस्टल रोडचे वास्तव !वरळी सीलिंकचा दुसरा टप्पा वरळी ते हाजीअली होता. मात्र तेवढ्या पैशात नरिमन पॉर्इंट-मनोरा आमदार निवास पासून कांदिवली पश्चिम द्रुतगती मार्गापर्यंतचा कोस्टल रोड होऊ शकतो असा प्रस्ताव पृथ्वीराज चव्हाण यांच्यापुढे मांडला गेला. त्यासाठी तांत्रिक समिती स्थापन केली गेली. या समितीचा अहवाल त्यांना सादर करण्यात आला. या संयुक्त तांत्रिक समितीमध्ये तेव्हाचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपिन श्रीमाळी, केंद्र सरकारच्या पर्यावरण व वन विभागाच्या सल्लागार डॉ.नलिनी भट, राष्ट्रीय सागरी विज्ञान संस्थेचे संचालक एस.आर.शेट्ये, पवई आयआयटीचे प्रा. डॉ. तरुण कांत, वास्तूरचनाकार चंद्रशेखर प्रभू, जे. जे. स्कूल आॅफ आकीर्टेक्चरचे प्राध्यापक राजीव मिश्रा, वास्तूरचनाकार हाफिज कॉन्ट्रॅक्टर, पी.के.दास, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वाहतूक शाखेचे प्रमुख पी.आर.के.मूर्ती आणि प्राधिकरणाचे मुख्य अभियंता शरद सबनीस यांचा समावेश होता. या समितीच्या २०१२ पर्यंत १० बैठका झाल्या. समितीच्या अहवालानुसार मार्गाची लांबी ३५.६० किमी असेल.