शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

जैवविविधतेचा वारसा ‘ग्लोरी आॅफ आलापल्ली’

By admin | Updated: February 13, 2017 03:59 IST

महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली-भामरागड मार्गावरील ‘ग्लोरी आॅफ आलापल्ली’ आजही पर्यटकांना खुणावतो.

गजानन चोपडे / नागपूरमहाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली-भामरागड मार्गावरील ‘ग्लोरी आॅफ आलापल्ली’ आजही पर्यटकांना खुणावतो. राज्यातील जैवविविधतेचा वारसा म्हणून नावारूपास आलेले हे साग वृक्षाचे प्रचंड वन आहे.१९५३ मध्ये आलापल्लीपासून १८ किमीवर या सागवानी वनवैभवाची निर्मिती करण्यात आली. ६ हेक्टरचे हे राखीव वनक्षेत्र असून यात करस्री, तेंदू, साग व बेल वृक्षांचे प्रमाण अधिक आहे. यात ४०० वर्षांहून अधिक वयोमानचे सागवृक्ष अद्यापही ताठ उभे आहेत. याला लागूनच मिरकल वनतलाव असून हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाला भेट देणारे देशी-विदेशी पर्यटक आवर्जून या स्थळाला भेट देतात. कर्नाटक राज्याने २००७ साली पहिले जैवविविधता वारसा स्थळ घोषित करून आघाडी घेतली होती. त्या पाठोपाठ २०१४ मध्ये ‘ग्लोरी आॅफ आलापल्ली’ला वारसास्थळ घोषित करण्यात आले. गेल्या दोन वर्षांत त्यात नवीन जैवविविधतेची भर पडली नसली, तरी अलीकडे जळगाव जिल्ह्यातील लांडोरखोरी व रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास आणि आंजर्ला अशा तीन ते चार ठिकाणांचे प्रस्ताव महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाकडे प्राप्त झाल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष डॉ.विलास बर्डेकर यांनी दिली. यातील वेळास व आंजर्ला ही गावे सागरी कासवांसाठी प्रसिद्ध असून या गावांत ‘होम स्टे टुरिझम’ चा प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात आल्याचेही डॉ. बर्डेकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.