शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
2
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
3
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
4
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
5
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
6
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
7
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
8
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
9
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
10
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
11
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
12
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
13
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
14
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
15
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
16
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
17
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
18
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
19
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
20
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या

जोरदार पावसाची प्रतीक्षा

By admin | Updated: June 9, 2016 01:43 IST

पुरंदर तालुक्यात आज दुष्काळी परिस्थिती असली तरी पावसाचे वातावरण तयार होत असून पुरंदरचा शेतकरी आजही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

भुलेश्वर : पुरंदर तालुक्यात आज दुष्काळी परिस्थिती असली तरी पावसाचे वातावरण तयार होत असून पुरंदरचा शेतकरी आजही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पुरंदर तालुक्यात खरीप हंगामात अल्प प्रमाणात पाऊस झाला. जमिनीत पेरणीयोग्य ओल झाल्याने मोठ्या प्रमाणात बाजरी, मूग, झटपट उत्पन्न मिळवून देणारा वाटाणा, भुईमूग आदी पिकांच्या मोठ्या प्रमाणात पेरणी करण्यात आली. जमिनीत पुरेशी ओल असल्याने पिकाची उगवणही चांगली झाली. मात्र पुन्हा पावसाने हुलकावणी दिल्याने उगवून आलेली पिकेही जळून गेली. अल्प प्रमाणात पाणी असलेल्या शेतकऱ्यांनी पिके जगवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. यासाठी काही शेतकऱ्यांना पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला. वाटाणा पीक काहीअंशी पदरात पडले, परंतु वातावरणात अधिक तापमान असल्याने शेंगा व दाणा भरण्यास अनेक अडचणी आल्या.यामुळे पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न निघाले नाही. यामुळे खरीप हंगाम मोठ्या प्रमाणात वायाच गेला.वाया गेलेल्या खरीप हंगामाची तूट रब्बी हंगामात भरून निघेल, या आशेवर पुरंदरचा शेतकरी पावसाची वाट पाहत असताना पुन्हा एकदा अल्प पावसाने रब्बी हंगामाची सुरुवात झाली. जमिनीत पुरेशी ओल असल्याने मोठ्या प्रमाणात ज्वारीची पेरणी करण्यात आली. उगवणही चांगली झाली. यामुळे पुरंदर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पेरणी करण्यात आली. मात्र पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झाला नाही. अनेक भागात तर पडलाच नाही, यामुळे माळरानावरील ज्वारी तर करपली. मात्र बागायती भागात ज्वारीचे पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न निघाले नाही. परंतु अनेक शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे ज्वारी झाली.पुरंदर तालुक्यात दरवर्षीपेक्षा कांद्याच्या लागनी तीव्र पाणीटंचाईमुळे कमी झाल्या. पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या जीवावर अनेक भागांत लागणी करण्यात आल्या. मात्र बाजारभाव समाधानकारक न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली. पुरंदर तालुक्यात समाधानकारक पाऊस पडला तर वर्षभर पुरेल एवढा धान्यसाठा पिकवता येतो. कांदा, वाटाणा यांसारखी पिके घेऊन वर्षभर आर्थिक चणचण कमी करता येते. यासाठी चालू वर्षी समाधानकारक पावसाची गरज आहे. समाधानकारक पाऊस होण्यासाठी शेतकरी ग्रामदेवतेस साकडे घालत आहे. यासाठी पुरंदरचा शेतकरी आजही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.>पावसाची सरासरी कमी : ३५२ मिलिमीटरपुरंदर तालुक्यात २००९ ते १० मध्ये ९०४ मिलिमीटर पाऊस पडला. तेव्हापासून आतापर्यंत पावसाची सरासरी कमी कमी होत गेली. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी कमी कमी होत गेली. २०१५-१६ या वर्षी ३५२ मिलिमीटर म्हणजेच सर्वात कमी पाऊस पडला. यामुळे यंदा तर तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. जून महिन्याच्या सुरुवातीला जर पावसाने सुरुवात केली तर पेरणी सुरळीत होते. यासाठी पाऊस सुरू होणे गरजेचे आहे.