शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

जोरदार पावसाची प्रतीक्षा

By admin | Updated: June 9, 2016 01:43 IST

पुरंदर तालुक्यात आज दुष्काळी परिस्थिती असली तरी पावसाचे वातावरण तयार होत असून पुरंदरचा शेतकरी आजही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

भुलेश्वर : पुरंदर तालुक्यात आज दुष्काळी परिस्थिती असली तरी पावसाचे वातावरण तयार होत असून पुरंदरचा शेतकरी आजही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पुरंदर तालुक्यात खरीप हंगामात अल्प प्रमाणात पाऊस झाला. जमिनीत पेरणीयोग्य ओल झाल्याने मोठ्या प्रमाणात बाजरी, मूग, झटपट उत्पन्न मिळवून देणारा वाटाणा, भुईमूग आदी पिकांच्या मोठ्या प्रमाणात पेरणी करण्यात आली. जमिनीत पुरेशी ओल असल्याने पिकाची उगवणही चांगली झाली. मात्र पुन्हा पावसाने हुलकावणी दिल्याने उगवून आलेली पिकेही जळून गेली. अल्प प्रमाणात पाणी असलेल्या शेतकऱ्यांनी पिके जगवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. यासाठी काही शेतकऱ्यांना पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला. वाटाणा पीक काहीअंशी पदरात पडले, परंतु वातावरणात अधिक तापमान असल्याने शेंगा व दाणा भरण्यास अनेक अडचणी आल्या.यामुळे पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न निघाले नाही. यामुळे खरीप हंगाम मोठ्या प्रमाणात वायाच गेला.वाया गेलेल्या खरीप हंगामाची तूट रब्बी हंगामात भरून निघेल, या आशेवर पुरंदरचा शेतकरी पावसाची वाट पाहत असताना पुन्हा एकदा अल्प पावसाने रब्बी हंगामाची सुरुवात झाली. जमिनीत पुरेशी ओल असल्याने मोठ्या प्रमाणात ज्वारीची पेरणी करण्यात आली. उगवणही चांगली झाली. यामुळे पुरंदर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पेरणी करण्यात आली. मात्र पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झाला नाही. अनेक भागात तर पडलाच नाही, यामुळे माळरानावरील ज्वारी तर करपली. मात्र बागायती भागात ज्वारीचे पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न निघाले नाही. परंतु अनेक शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे ज्वारी झाली.पुरंदर तालुक्यात दरवर्षीपेक्षा कांद्याच्या लागनी तीव्र पाणीटंचाईमुळे कमी झाल्या. पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या जीवावर अनेक भागांत लागणी करण्यात आल्या. मात्र बाजारभाव समाधानकारक न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली. पुरंदर तालुक्यात समाधानकारक पाऊस पडला तर वर्षभर पुरेल एवढा धान्यसाठा पिकवता येतो. कांदा, वाटाणा यांसारखी पिके घेऊन वर्षभर आर्थिक चणचण कमी करता येते. यासाठी चालू वर्षी समाधानकारक पावसाची गरज आहे. समाधानकारक पाऊस होण्यासाठी शेतकरी ग्रामदेवतेस साकडे घालत आहे. यासाठी पुरंदरचा शेतकरी आजही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.>पावसाची सरासरी कमी : ३५२ मिलिमीटरपुरंदर तालुक्यात २००९ ते १० मध्ये ९०४ मिलिमीटर पाऊस पडला. तेव्हापासून आतापर्यंत पावसाची सरासरी कमी कमी होत गेली. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी कमी कमी होत गेली. २०१५-१६ या वर्षी ३५२ मिलिमीटर म्हणजेच सर्वात कमी पाऊस पडला. यामुळे यंदा तर तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. जून महिन्याच्या सुरुवातीला जर पावसाने सुरुवात केली तर पेरणी सुरळीत होते. यासाठी पाऊस सुरू होणे गरजेचे आहे.