शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतरमध्ये काश्मीरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हटला...
2
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
3
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी २५,००० च्या लेव्हलवर; Bharti Airtel, IndusInd, Infosys टॉप लूझर्स
4
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित
5
बिहार दौऱ्यादरम्यान आयनॉक्स मॉलमध्ये पोहचले राहुल गांधी, पाहिला 'हा' चित्रपट, म्हणाले...
6
मुंबई एअरपोर्टवरुन प्रवास करणाऱ्यांना आता अधिक खर्च करावा लागणार; 'या' शुल्कात मोठी वाढ, किती पैसे द्यावे लागणार?
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
8
SBI मध्ये ₹५ लाख जमा केल्यावर मिळेल ₹२ लाखांपेक्षा अधिक व्याज; पाहा १,२,३ आणि ५ वर्षांचं कॅलक्युलेशन
9
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
10
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
11
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
12
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
13
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
14
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
15
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
16
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
17
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
18
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
19
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
20
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!

राणेंविरोधात सर्व एकवटणार

By admin | Updated: September 25, 2014 23:28 IST

विधानसभेतही पुनरावृत्ती : सिंधुदुर्गात विरोधकांची पुन्हा तीच रणनीती

महेश सरनाईक - कणकवली -विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आता (२७ सप्टेंबर) येवून ठेपली आहे. मात्र, युती आघाडीमधील कोंडी फुटताना दिसत नाही. असे असले तरी गत काही निवडणुकांप्रमाणेच यावेळीदेखील सिंधुदुर्गात नारायण राणेंचा पराभव करण्यासाठी त्यांचे सर्व विरोधक पुन्हा एकवटण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. युती झाली अथवा नाही तरी राणेंना कोंडीत पकडण्यासाठी शिवसेना, भाजप, काँग्रेसमधील एक गट, राष्ट्रवादीमधील एक गट एकत्र येवून राणेंच्या पराभवासाठी आराखडा बनवत आहेत. राणे या निवडणुकीत या सर्र्वावर कशी मारतात याकडे सर्व राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.गेल्या २५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत नारायण राणे यांनी राजकारणात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. गत लोकसभा निवडणुकीत नीलेश राणे यांचा रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून झालेला पराभव हा या राजकारणातीलच एक भाग आहे. नीलेश राणेंचा पराभव वगळता आतापर्यंत राणे हे जिल्ह्यातील आपल्या विरोधकांना कायमच पुरून उरले आहेत. मात्र, याला अपवाद म्हणून लोकसभा निवडणुकीकडे पाहिले जात आहे. लोकसभा निवडणूक ही देशात अभूतपूर्व निवडणूक झाली. त्यात महाराष्ट्र राज्यासह देशाच्या अनेक भागातील दिग्गजांना पराभवाची चव चाखायला लागली. मात्र, असे असले तरी निलेश राणेंचा झालेला पराभव नारायण राणेंच्या प्रचंड जिव्हारी लागला होता. त्यातच त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामाही दोन वेळा दिला होता. मात्र, त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील निर्णायक अवस्थेत त्यांनी झालेल्या गोष्टी विसरून पुन्हा काँग्रेसमध्येच सक्रिय काम करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्षश्रेष्ठींना त्यांच्याकडे राज्यातील प्रचार प्रमुखपद सोपवले. त्यामुळे नारायण राणे हे आता केवळ सिंधुदुर्ग आणि कोकणातच नव्हे तर राज्यभर प्रचारदौरे करणार आहेत. त्यामुळे त्यांना प्रचारासाठी सिंधुदुर्गात जास्त वेळ देणे तसे अवघडच होणार आहे. त्यामुळे राणे यांना पराभूत करण्यासाठी त्यांचे राजकीय विरोधक कंबर कसताना आढळत आहेत.शिवसेना जिल्हाप्रमुख आणि मालवण-कुडाळ मतदारसंघातील राणेंचे प्रतिस्पर्धी वैभव नाईक यांनी बुधवारी मालवण येथे पत्रकार परिषद घेऊन विरोधाची भूमिका जाहीर केली. त्यात त्यांनी हेच स्पष्ट केले आहे, की राज्यात महायुतीबाबत कोणताही निर्णय होऊ दे, सिंधुदुर्गात राणेंविरोधात सर्व एकवटून प्रचार करणार आहोत. आतापर्यंत कुडाळ-मालवण आणि कणकवली मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे यावर शिक्कामोर्तब झाले असून सावंतवाडीही हाच फॉर्म्युला असेल.सिंधुदुर्गातील तीन मतदारसंघाचा विचार करता कणकवलीमध्ये भाजपाकडून प्रमोद जठार यांच्याविरोधात काँग्रेसकडून अजूनही नावाची अधिकृत घोषणा झाली नसली तरी नितेश राणे हे निवडणूक लढविणार आहेत. आमदार विजय सावंत आणि कुलदीप पेडणेकर हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे राणे विरूद्ध जठार अशीच ही लढत होणार आहे. यात अपक्ष किती मते मिळवितात, यावर भवितव्य अवलंबून असेल. नारायण राणे यांच्याविरोधात वैभव नाईक यांच्यात सरळ लढत होत आहे. मात्र, येथेही राणे विरूद्ध सर्व विरोधक असेच चित्र आहे. कारण वैभव नाईक यांनी मालवणमध्ये बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेला भाजपाचे मालवणातील पदाधिकारीही उपस्थित होते.लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले चव चाखलेले काँग्रेस कार्यकर्ते विधानसभेमध्ये काय करतात?ते पाहण्यासाठी आता १९ आॅक्टोबरची वाट पहावी लागणार आहे.सर्वात चुरशीची लढत होणार आहे ती सावंतवाडी मतदारसंघात. कारण येथे शिवसेनेकडून दीपक केसरकर, आघाडी झाल्यास राष्ट्रवादीकडून सुरेश दळवी, मनसेकडून परशुराम उपरकर, अपक्ष म्हणून राजन तेली असे एकापेक्षा एक मातब्बर उमेदवार रिंगणात असतील. गत निवडणुकीत आमदार दीपक केसरकर यांना निवडून आणण्यात मोलाची कामगिरी करणारे काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते राणेंचा आदेश मानून काय करतात? यावरही बहुतांशी गणिते अवलंबून असणार आहेत.