शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

घोडबंदरच्या आदिवासीपाड्यांत दूषित पाणी

By admin | Updated: April 4, 2017 04:18 IST

आदिवासीपाड्यांना ठाणे महापालिका स्थापन होऊन ३१ वर्षांचा कालावधी लोटला, तरीही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे

नामदेव पाषाणकर,घोडबंदर- ठाणे शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असताना घोडबंदर परिसरातील देवीचापाडा, पानखंडा, पाचवड, नागलाबंदर, टकारडा या आदिवासीपाड्यांना ठाणे महापालिका स्थापन होऊन ३१ वर्षांचा कालावधी लोटला, तरीही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. वेळेवर टँकर मिळत नसल्याने बोअरवेलचे दूषित पाणी पिण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय नाही.आदिवासीपाडे घोडबंदरच्या मुख्य रस्त्यापासून तीन ते चार किमी अंतरावर आहेत. पाड्यांच्या काही फुटांच्या अंतरावर मोठी गृहसंकुले आणि बंगले आहेत. त्यांना पाणी मिळते, तर काही जागी टँकरचा पाणीपुरवठा सुरू आहे. पूर्वी या पाड्यांच्या शेजारून वाहणाऱ्या जिवंत झऱ्यांना पाणी यायचे. तेच पाणी पिऊन आदिवासी जीवन जगत होते. मात्र, काही वर्षांत जवळच उभ्या राहिलेल्या गृहसंकुलांत खोदलेल्या बोअरवेलमुळे या झऱ्यांचे जलस्रोत बंद झाले. वनजमिनीचे कारण सांगून आदिवासीपाड्यांना वीज, पाणी, पायवाटा नाकारण्यात येतात. टकारडा येथे दूरवर पाणी देण्यात आले,मात्रबाकीच्या पाड्यांना टँकरने पाणी दिले जात आहे.हे टँकर अनेकदा वेळेवर येत नसल्याने हातपंपाचे पाणी पिण्याशिवाय पर्याय नाही. पानखंडा येथील शाळेतील मुलांनादेखील हातपंपाचेच पाणी प्यावे लागत आहे.याबाबत, तेथील शिक्षकांकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, आमच्या शाळेची बोअरवेल अडीचशे फूट खोल आहे आणि आरोग्य विभागाने पाणीतपासणी केली असून पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल दिला आहे. दुसरीकडे पाड्यात असलेल्या अन्य तीन बोअरवेलची स्थिती नेमकी उलटी आहे. त्यापैकी एक बंद आहे, तर अन्य दोन बोअरवेलचे पाणी कपडे, धुणीभांडी आणि पिण्यासाठी वापरले जाते. १० ते १५दिवसांतून टँकर येत असल्याने बोअरवेलचे पाणी पिण्याशिवाय येथील रहिवाशांना पर्याय नाही. सकाळच्या सुमारास थोडेसे व्यवस्थित पाणी मिळते. नंतर, येणारे पाणी गढूळ असते. हे पाणी घरात ठेवल्यावर काही वेळातच लालसर बनते. शिवाय, हे पाणी दुर्गंधीयुक्त आहे. नाइलाजास्तव ते प्यावे लागते. या पाण्याने कावीळ होते, पोटाचे दुखणे जडते, अशा तक्र ारी आहेत.जीव जगवायचा, तर हे पाणी प्यायलाच पाहिजे, अशी प्रतिक्रि या ज्येष्ठ महिला विसुरी उंबरखांडे या महिलेने दिली. तुम्हाला पाणी मिळत नाही, तर तुम्ही तक्र ार का करत नाही, असे विचारले असता महिलांनी सांगितले की, याबाबत कोणास तक्र ार करायची तेच आम्हाला माहीत नाही. जेएनएनयूआरएमच्या माध्यमातून ३०१ कोटींची पाणीयोजना घोडबंदरसाठी तयार करण्यात आली होती.>पाणीप्रश्न सुटणार तरी कधी? : येथील प्रस्तावित पाणीयोजनेसाठी निधी मिळाला नसल्याने आता अमृत योजनेतून निधी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.तसेच प्रशासनदेखील योजनेला गती देण्याचा प्रयत्न करत आहे. साकेतवरून सव्वाचार मीटर रु ंदीची पाइपलाइन टाकण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नगरसेवकांनी आयुक्तांकडे केली आहे. हे काम होऊन पाणी वितरण व्यवस्था सुधारली तरच घोडबंदरचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.