शहरं
Join us  
Trending Stories
1
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
2
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
3
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
4
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
5
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
6
आजोबा, वडील एक्स आर्मी, पतीही...! कोण आहेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी
7
Operation Sindoor: नऊ ठिकाणं... ९० दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले!
8
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
9
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
10
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
11
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
12
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
13
Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू
14
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
15
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...
16
"आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं", मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
17
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
18
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
19
Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले
20
FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश

घोडबंदरच्या आदिवासीपाड्यांत दूषित पाणी

By admin | Updated: April 4, 2017 04:18 IST

आदिवासीपाड्यांना ठाणे महापालिका स्थापन होऊन ३१ वर्षांचा कालावधी लोटला, तरीही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे

नामदेव पाषाणकर,घोडबंदर- ठाणे शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असताना घोडबंदर परिसरातील देवीचापाडा, पानखंडा, पाचवड, नागलाबंदर, टकारडा या आदिवासीपाड्यांना ठाणे महापालिका स्थापन होऊन ३१ वर्षांचा कालावधी लोटला, तरीही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. वेळेवर टँकर मिळत नसल्याने बोअरवेलचे दूषित पाणी पिण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय नाही.आदिवासीपाडे घोडबंदरच्या मुख्य रस्त्यापासून तीन ते चार किमी अंतरावर आहेत. पाड्यांच्या काही फुटांच्या अंतरावर मोठी गृहसंकुले आणि बंगले आहेत. त्यांना पाणी मिळते, तर काही जागी टँकरचा पाणीपुरवठा सुरू आहे. पूर्वी या पाड्यांच्या शेजारून वाहणाऱ्या जिवंत झऱ्यांना पाणी यायचे. तेच पाणी पिऊन आदिवासी जीवन जगत होते. मात्र, काही वर्षांत जवळच उभ्या राहिलेल्या गृहसंकुलांत खोदलेल्या बोअरवेलमुळे या झऱ्यांचे जलस्रोत बंद झाले. वनजमिनीचे कारण सांगून आदिवासीपाड्यांना वीज, पाणी, पायवाटा नाकारण्यात येतात. टकारडा येथे दूरवर पाणी देण्यात आले,मात्रबाकीच्या पाड्यांना टँकरने पाणी दिले जात आहे.हे टँकर अनेकदा वेळेवर येत नसल्याने हातपंपाचे पाणी पिण्याशिवाय पर्याय नाही. पानखंडा येथील शाळेतील मुलांनादेखील हातपंपाचेच पाणी प्यावे लागत आहे.याबाबत, तेथील शिक्षकांकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, आमच्या शाळेची बोअरवेल अडीचशे फूट खोल आहे आणि आरोग्य विभागाने पाणीतपासणी केली असून पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल दिला आहे. दुसरीकडे पाड्यात असलेल्या अन्य तीन बोअरवेलची स्थिती नेमकी उलटी आहे. त्यापैकी एक बंद आहे, तर अन्य दोन बोअरवेलचे पाणी कपडे, धुणीभांडी आणि पिण्यासाठी वापरले जाते. १० ते १५दिवसांतून टँकर येत असल्याने बोअरवेलचे पाणी पिण्याशिवाय येथील रहिवाशांना पर्याय नाही. सकाळच्या सुमारास थोडेसे व्यवस्थित पाणी मिळते. नंतर, येणारे पाणी गढूळ असते. हे पाणी घरात ठेवल्यावर काही वेळातच लालसर बनते. शिवाय, हे पाणी दुर्गंधीयुक्त आहे. नाइलाजास्तव ते प्यावे लागते. या पाण्याने कावीळ होते, पोटाचे दुखणे जडते, अशा तक्र ारी आहेत.जीव जगवायचा, तर हे पाणी प्यायलाच पाहिजे, अशी प्रतिक्रि या ज्येष्ठ महिला विसुरी उंबरखांडे या महिलेने दिली. तुम्हाला पाणी मिळत नाही, तर तुम्ही तक्र ार का करत नाही, असे विचारले असता महिलांनी सांगितले की, याबाबत कोणास तक्र ार करायची तेच आम्हाला माहीत नाही. जेएनएनयूआरएमच्या माध्यमातून ३०१ कोटींची पाणीयोजना घोडबंदरसाठी तयार करण्यात आली होती.>पाणीप्रश्न सुटणार तरी कधी? : येथील प्रस्तावित पाणीयोजनेसाठी निधी मिळाला नसल्याने आता अमृत योजनेतून निधी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.तसेच प्रशासनदेखील योजनेला गती देण्याचा प्रयत्न करत आहे. साकेतवरून सव्वाचार मीटर रु ंदीची पाइपलाइन टाकण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नगरसेवकांनी आयुक्तांकडे केली आहे. हे काम होऊन पाणी वितरण व्यवस्था सुधारली तरच घोडबंदरचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.