शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

उघड्या डीपींमुळे अपघाताचा धोका

By admin | Updated: May 16, 2016 01:39 IST

वीज वितरण कंपनीचे लोणावळा परिसरातील बहुतांश ठिकाणच्या डीपींचे दरवाजे तुटलेले आहेत.

लोणावळा : वीज वितरण कंपनीचे लोणावळा परिसरातील बहुतांश ठिकाणच्या डीपींचे दरवाजे तुटलेले आहेत. या उघड्या डीपींमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. पिंपरी येथे मागील आठवड्यात एका रोहित्राला आग लागल्याने एकाचा जागीच जळून मृत्यू झाला होता.वीज वितरण कंपनीचे मुख्य कार्यालय असलेल्या नांगरगाव भागातील अनेक डीपींची झाकणे तुटलेली आहेत. यासह कुमार चौकातील पोलीस चौकीशेजारील डीपी, भांगरवाडी, रायवूड या सर्वच भागांमध्ये तीच परिस्थिती असताना कंपनी व अधिकारी याकडे डोळेझाक करत आहेत. पंधरा दिवसांवर पावसाळा आला असून, या उघड्या डीपींमधून शॉर्ट सर्किटसारखे प्रकार होऊ शकतात. कंपनीने तातडीने याची दखल घेत डीपी बॉक्सला झाकणे लावावीत, अशी मागणी नागरिक करत आहेत.त्याचप्रमाणे पावसाळ्यापूर्वीच्या कामात वीजतारांना अडसर ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम वीज वितरणच्या वतीने ठेकेदारांना देण्यात आले आहे. हे काम करताना संबंधित ठेकेदार तळापासून झाडे तोडत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. राष्ट्रीय महामार्गालगतची अशाच प्रकारे वृक्षतोड सुरू असताना आयआरबीच्या वतीने हे काम थांबविण्यात आले आहे. वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी या कामांची पाहणी करत सदर ठेकेदारांना योग्य सूचना कराव्यात, अशी मागणी नागरिक करत आहेत. (वार्ताहर)> अनेक डीपी झाल्या जीर्ण करंजगाव : नाणे मावळमधील जांभवली, थोरण, शिरदे, पाले नामा, उकसान, सोमवडी, भाजगाव, कोळवाडी, गोवित्री, उंबरवाडी, करंजगाव, साबळेवाडी, मोरमारवाडी, कांबरे, कोंडिवडे, नवीन उकसान, नानोली, साई, वाऊड, कचरेवाडी, घोणशेत येथील वीज वितरणच्या डीपी जीर्ण व खराब अवस्थेत आहेत. एखाद्या ठिकाणी विद्युतवाहक तार तुटली असता त्या जोडण्यासाठी विद्युतपुरवठा बंद करावा लागतो. परंतु, कार्यालयाला कळवूनही कर्मचारी पुरवठा बंद करण्यासाठी अनेकदा तीन-चार दिवसांनी हजर होतात. त्या दरम्यान तीन दिवस विद्युतपुरवठा खंडित झालेला असतो. विद्युत प्रवाहाच्या तुलनेत डीपीची क्षमता कमी असल्यामुळे काही ठिकाणी डीपीमधून ठिणग्या उडतात. काही डीपीमध्ये जाळ होतो. प्रशासन, महावितरणला सांगूनही डीपी दुरुस्त केल्या जात नाहीत.खांबावर काही ठिकाणी शेतपंपाचे विद्युत जोड तोडले जातात. महावितरणला कळवले असता महावितरण सांगते की, आज कर्मचारी आलेला नाही. जो कर्मचारी त्या त्या गावासाठी नेमणूक झाली असेल, तर तोच कर्मचारी येऊ शकतो. अन्यथा, दुसरा कर्मचारी येत नाही. त्या दिवशी पंप बंद राहून शेतीचे नुकसान होते. रजेवरचा कर्मचारी आल्यावर मोटार लाइन जोडली जाते. तोपर्यंत शेतकऱ्यांचे पीक पूर्णपणे वाळलेले असते. महावितरणच्या अशा कारभाराने नागरिक त्रस्त झाले असून, विद्युत समस्या दूर करण्याची मागणी ते करीत आहेत.