शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
4
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
5
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
6
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
7
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
8
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
9
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
10
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
11
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
12
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
13
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
14
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
15
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
16
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
17
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
18
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
19
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
20
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...

उघड्या डीपींमुळे अपघाताचा धोका

By admin | Updated: May 16, 2016 01:39 IST

वीज वितरण कंपनीचे लोणावळा परिसरातील बहुतांश ठिकाणच्या डीपींचे दरवाजे तुटलेले आहेत.

लोणावळा : वीज वितरण कंपनीचे लोणावळा परिसरातील बहुतांश ठिकाणच्या डीपींचे दरवाजे तुटलेले आहेत. या उघड्या डीपींमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. पिंपरी येथे मागील आठवड्यात एका रोहित्राला आग लागल्याने एकाचा जागीच जळून मृत्यू झाला होता.वीज वितरण कंपनीचे मुख्य कार्यालय असलेल्या नांगरगाव भागातील अनेक डीपींची झाकणे तुटलेली आहेत. यासह कुमार चौकातील पोलीस चौकीशेजारील डीपी, भांगरवाडी, रायवूड या सर्वच भागांमध्ये तीच परिस्थिती असताना कंपनी व अधिकारी याकडे डोळेझाक करत आहेत. पंधरा दिवसांवर पावसाळा आला असून, या उघड्या डीपींमधून शॉर्ट सर्किटसारखे प्रकार होऊ शकतात. कंपनीने तातडीने याची दखल घेत डीपी बॉक्सला झाकणे लावावीत, अशी मागणी नागरिक करत आहेत.त्याचप्रमाणे पावसाळ्यापूर्वीच्या कामात वीजतारांना अडसर ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम वीज वितरणच्या वतीने ठेकेदारांना देण्यात आले आहे. हे काम करताना संबंधित ठेकेदार तळापासून झाडे तोडत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. राष्ट्रीय महामार्गालगतची अशाच प्रकारे वृक्षतोड सुरू असताना आयआरबीच्या वतीने हे काम थांबविण्यात आले आहे. वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी या कामांची पाहणी करत सदर ठेकेदारांना योग्य सूचना कराव्यात, अशी मागणी नागरिक करत आहेत. (वार्ताहर)> अनेक डीपी झाल्या जीर्ण करंजगाव : नाणे मावळमधील जांभवली, थोरण, शिरदे, पाले नामा, उकसान, सोमवडी, भाजगाव, कोळवाडी, गोवित्री, उंबरवाडी, करंजगाव, साबळेवाडी, मोरमारवाडी, कांबरे, कोंडिवडे, नवीन उकसान, नानोली, साई, वाऊड, कचरेवाडी, घोणशेत येथील वीज वितरणच्या डीपी जीर्ण व खराब अवस्थेत आहेत. एखाद्या ठिकाणी विद्युतवाहक तार तुटली असता त्या जोडण्यासाठी विद्युतपुरवठा बंद करावा लागतो. परंतु, कार्यालयाला कळवूनही कर्मचारी पुरवठा बंद करण्यासाठी अनेकदा तीन-चार दिवसांनी हजर होतात. त्या दरम्यान तीन दिवस विद्युतपुरवठा खंडित झालेला असतो. विद्युत प्रवाहाच्या तुलनेत डीपीची क्षमता कमी असल्यामुळे काही ठिकाणी डीपीमधून ठिणग्या उडतात. काही डीपीमध्ये जाळ होतो. प्रशासन, महावितरणला सांगूनही डीपी दुरुस्त केल्या जात नाहीत.खांबावर काही ठिकाणी शेतपंपाचे विद्युत जोड तोडले जातात. महावितरणला कळवले असता महावितरण सांगते की, आज कर्मचारी आलेला नाही. जो कर्मचारी त्या त्या गावासाठी नेमणूक झाली असेल, तर तोच कर्मचारी येऊ शकतो. अन्यथा, दुसरा कर्मचारी येत नाही. त्या दिवशी पंप बंद राहून शेतीचे नुकसान होते. रजेवरचा कर्मचारी आल्यावर मोटार लाइन जोडली जाते. तोपर्यंत शेतकऱ्यांचे पीक पूर्णपणे वाळलेले असते. महावितरणच्या अशा कारभाराने नागरिक त्रस्त झाले असून, विद्युत समस्या दूर करण्याची मागणी ते करीत आहेत.