शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

एकाच झाडावर जतन केले ५१ प्रकारचे आंबे

By admin | Updated: May 11, 2014 22:48 IST

अवलिया सिव्हील इंजिनिअरची अफलातून कामगिरी

वाशिम: आखाती देशातील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून वाशिम जिल्‘ात ील आपल्या मूळ गावी आधुनिक शेती करण्याची कास धरत एक सिव्हील इंजिनिअर आंबाच्या एकाच झाडावर १३५० कलमे करत तब्बल ५१ प्रकारची आंब्याची फळे जपण्यात यशस्वी ठरला आहे. शेती करण्यासाठी नाके मुरडणार्‍या शेतकर्‍यांच्या मुलासाठी ही चांगलीच चपराक ठरली आहे. अंगात मुळातच काहीतरी वेगळे करण्याचा ध्यास असलेल्या वाशिममधील रवि माधवराव मारशेटवार या सिव्हील इंजिनिअरने सल्तनत ऑफ ओमानमध्ये नोकरी सोडून ओसाड माळावर आंब्याची बाग फुलविली आहे. सुरुवातीला त्याने माळरानावर दोन हेक्टर पडिक शेत विकत घेतले. नंतर तो माळ जेसीबीने सपाट करुन तेथे धरणातील काळया मातीचा गाळ आणून टाकला. तेथे एक हेक्टरमध्ये आंब्याच्या विविध जातीची एक हजार झाडे लावली. त्या झाडांवर दुर्मीळ होत असलेली आंब्यांची कलमे लावली. आज त्यांची ही बाग विविध जातीच्या दुर्मीळ आम्रवृक्षांची बँक बनली आहे. ती पाहण्यासाठी तेथे राज्यभरातून शेतकरी येतात.रवि मारशेटवाराची आमराई विविध जातीच्या शेकडो आंब्यांनी लदबदून गेली आहे. या बागेत हापूस, केशर, दशेरी, आम्रपाली, दुधपेढा, मल्लिका, मंजिरी, हुर, काळाखोबरा, कलेक्टर, महाराजा ऑस्ट्रेलियन केन्ट, सिंगणवाडी, बाबोली पुनासा, साखरगोटी, कागदी हापूस, वनराज, बारमासी, केळ्या, शेप्या, सिंधू, पसर्‍या ,रॉयल स्पेशल व पि›म बंगालचा हिमसागर यासह विविध गावरानी जातीचे आम्रवृक्ष आहेत. या वृक्षांना ५० ग्रामपासून ते दोन किलो वजनापर्यंतचे आंबे लागलेले आहेत. त्यांनी बहुतांश आम्रवृक्षांवर गावरानी व अन्य जातीच्या उत्तम चवीच्या दुर्मीळ आंब्यांच्या फांद्या कलम केल्याने एकाच झाडाला विविध जातीचे, विविध रंगाचे, विविध आकाराचे आंबे लागले आहेत. त्यांची ही आमराई भेट देणार्‍यांसाठी डोळयांचे पारणे फेडत आहे. त्यांच्या बागेतील एका वृक्षावर तब्बल ५१ दुर्मीळ जातीच्या आम्र्रवृक्षाच्या १३५० फांद्या कलम केल्या आहेत. या वृक्षाला विविध जातीच्या आंब्याची विविध आकाराची पाने व फळे लागल्याचे पाहावयास मिळते. त्यांनी या बागेच्या माध्यमातून विविध जातीच्या, रंगाच्या, सुगंधाच्या व चवीच्या गावरान आंब्याचे जतन केले आहे. या बोगच्या माध्यमातून पुढील पिढीला वनस्पतीविषयक जैवविविधता जपण्याचे कार्य रवि मारशेटवार यांनी केले आहे. ते यासोबत परिसरातील शेतकर्‍यांना शेतीविषयक मोफत मार्गदर्शन करतात. त्यासाठी शासनाच्या अनुदानाविना शेतकर्‍यांच्या कृषिसहली आयोजित करुन अत्याधुनिक तांत्रिक शेती करण्यास प्रोत्साहन देतात. तसेच नेत्रदान चळवळीचेही कार्य करतात.