शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

एकाच झाडावर जतन केले ५१ प्रकारचे आंबे

By admin | Updated: May 11, 2014 22:48 IST

अवलिया सिव्हील इंजिनिअरची अफलातून कामगिरी

वाशिम: आखाती देशातील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून वाशिम जिल्‘ात ील आपल्या मूळ गावी आधुनिक शेती करण्याची कास धरत एक सिव्हील इंजिनिअर आंबाच्या एकाच झाडावर १३५० कलमे करत तब्बल ५१ प्रकारची आंब्याची फळे जपण्यात यशस्वी ठरला आहे. शेती करण्यासाठी नाके मुरडणार्‍या शेतकर्‍यांच्या मुलासाठी ही चांगलीच चपराक ठरली आहे. अंगात मुळातच काहीतरी वेगळे करण्याचा ध्यास असलेल्या वाशिममधील रवि माधवराव मारशेटवार या सिव्हील इंजिनिअरने सल्तनत ऑफ ओमानमध्ये नोकरी सोडून ओसाड माळावर आंब्याची बाग फुलविली आहे. सुरुवातीला त्याने माळरानावर दोन हेक्टर पडिक शेत विकत घेतले. नंतर तो माळ जेसीबीने सपाट करुन तेथे धरणातील काळया मातीचा गाळ आणून टाकला. तेथे एक हेक्टरमध्ये आंब्याच्या विविध जातीची एक हजार झाडे लावली. त्या झाडांवर दुर्मीळ होत असलेली आंब्यांची कलमे लावली. आज त्यांची ही बाग विविध जातीच्या दुर्मीळ आम्रवृक्षांची बँक बनली आहे. ती पाहण्यासाठी तेथे राज्यभरातून शेतकरी येतात.रवि मारशेटवाराची आमराई विविध जातीच्या शेकडो आंब्यांनी लदबदून गेली आहे. या बागेत हापूस, केशर, दशेरी, आम्रपाली, दुधपेढा, मल्लिका, मंजिरी, हुर, काळाखोबरा, कलेक्टर, महाराजा ऑस्ट्रेलियन केन्ट, सिंगणवाडी, बाबोली पुनासा, साखरगोटी, कागदी हापूस, वनराज, बारमासी, केळ्या, शेप्या, सिंधू, पसर्‍या ,रॉयल स्पेशल व पि›म बंगालचा हिमसागर यासह विविध गावरानी जातीचे आम्रवृक्ष आहेत. या वृक्षांना ५० ग्रामपासून ते दोन किलो वजनापर्यंतचे आंबे लागलेले आहेत. त्यांनी बहुतांश आम्रवृक्षांवर गावरानी व अन्य जातीच्या उत्तम चवीच्या दुर्मीळ आंब्यांच्या फांद्या कलम केल्याने एकाच झाडाला विविध जातीचे, विविध रंगाचे, विविध आकाराचे आंबे लागले आहेत. त्यांची ही आमराई भेट देणार्‍यांसाठी डोळयांचे पारणे फेडत आहे. त्यांच्या बागेतील एका वृक्षावर तब्बल ५१ दुर्मीळ जातीच्या आम्र्रवृक्षाच्या १३५० फांद्या कलम केल्या आहेत. या वृक्षाला विविध जातीच्या आंब्याची विविध आकाराची पाने व फळे लागल्याचे पाहावयास मिळते. त्यांनी या बागेच्या माध्यमातून विविध जातीच्या, रंगाच्या, सुगंधाच्या व चवीच्या गावरान आंब्याचे जतन केले आहे. या बोगच्या माध्यमातून पुढील पिढीला वनस्पतीविषयक जैवविविधता जपण्याचे कार्य रवि मारशेटवार यांनी केले आहे. ते यासोबत परिसरातील शेतकर्‍यांना शेतीविषयक मोफत मार्गदर्शन करतात. त्यासाठी शासनाच्या अनुदानाविना शेतकर्‍यांच्या कृषिसहली आयोजित करुन अत्याधुनिक तांत्रिक शेती करण्यास प्रोत्साहन देतात. तसेच नेत्रदान चळवळीचेही कार्य करतात.