शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

राज्यातील ४३९ लाचखोरांचा तपास लटकला

By admin | Updated: September 10, 2016 13:51 IST

जानेवारी २०१६ ते आॅगस्ट २०१६ अखेर या आठ महिन्यांत ६९१ जणांनी स्वीकारलेल्या लाचेतील व अन्य भ्रष्ट्राचार प्रकरणातील ४३९ लाचखोरांचा तपास लटकल्याची माहिती समोर आली आहे.

आप्पासाहेब पाटील, आॅनलाईन लोकमत
सोलापूर, दि. १० -  अभियोगपूर्व मंजुरी मिळेना, तपास कामात विलंब, दोषारोपपत्र दाखल करण्यास दिरंगाई, या ना अशा अनेक कारणांमुळे जानेवारी २०१६ ते आॅगस्ट २०१६ अखेर या आठ महिन्यांत ६९१ जणांनी स्वीकारलेल्या लाचेतील व अन्य भ्रष्ट्राचार प्रकरणातील ४३९ लाचखोरांचा तपास लटकला (प्रलंबित) असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे़ 
लाचलुचपत व भ्रष्टाचार निर्मूलनाच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने गृहविभागाच्या अंतर्गत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची स्थापना केली आहे. एखादा शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी सर्वसामान्य व्यक्तीला एखादे काम पूर्ण करण्यासाठीच्या मोबदल्यात पैसे (लाच) मागतो. त्यासंबंधीची तक्रार ती व्यक्ती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) देते़ तेव्हा एसीबी तक्रारदारासोबत एक पंच पाठवून सदर अधिकारी किंवा कर्मचारी यांनी लाच मागितली किंवा नाही, याबाबत खात्री करतात. त्यानंतर एसीबी सापळा लावून शासकीय अधिकारी व कर्मचारी हे पैसे घेताना त्यास रंगेहाथ पकडतात़ त्यानंतर संबंधित लाचखोरांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येतो़ मात्र पुढील कार्यवाहीसाठी एसीबी खाते दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी संबंधित लाचखोरांच्या विभागप्रमुखास दोषारोपपत्र दाखल करण्याची परवानगी मागते़ मात्र संबंधित खाते परवानगी देण्यास विलंब करीत असल्यामुळे लाचखोरांच्या तपासात मोठा अडथळा निर्माण होऊ लागला आहे़  मात्र एसीबीच्या कामगिरीमुळे अलीकडच्या काळात प्रलंबित प्रकरणे निकाली निघू लागली आहेत़
अभियोग मंजुरी म्हणजे आहे तरी काय?
एखाद्या शासकीय अधिकारी व कर्मचारी हा लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडला तर त्याविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येतो़ त्यानंतर त्यांच्या पुढील चौकशीसाठी दोषारोपपत्र दाखल करावे लागते़ दोषारोपपत्र दाखल करण्याची जबाबदारी एसीबीची असते़ त्यासाठी एसीबीला संबंधित लाचखोराच्या विभागप्रमुखाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे़ त्यासाठीचे पत्र एसीबी त्या विभागप्रमुखाला देते़ या संपूर्ण प्रक्रियेलाच अभियोगपूर्व मंजुरी असे म्हणतात़ मात्र ही काहीवेळा परवानगी मिळत नसल्याने तपास रखडला जातो़ 
 
एसीबीच्या आजपर्यंतच्या कामगिरीवर एक नजर
- राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आॅगस्टअखेर राज्यात ६९१ सापळा कारवाया यशस्वी केल्या़ शिवाय ८ अपसंपदा, १० अन्य भ्रष्ट्राचारांची प्रकरणे समोर आणली़ राज्यात एकूण ७०९ गुन्हे दाखल करण्यात आले़ मात्र दाखल गुन्ह्यापैकी ४३९ प्रकरणे तपासावर प्रलंबित आहेत़ त्यापैकी ४ प्रकरणे हे शासनाच्या अभियोग पूर्व मंजूरीसाठी तर सक्षम अशा ७६ प्रकरणासाठी प्रलंबित आहेत़ राज्यात आॅगस्टअखेर फक्त ३५ प्रकरणास अभियोग पूर्व मंजूरी प्राप्त झाली आहे़
 
ख़ापर मात्र एसीबीच्या माथी 
बºयाचदा खातेप्रमुखाची परवानगी न मिळाल्याने तपास पूर्ण होत नाही़ पुढे सुनावणीवेळी या त्रुटी आरोपीचे वकील युक्तिवादावेळी मांडतात़ त्यामुळे फक्त गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढते आणि दुसरीकडे निर्दोष सुटण्याचेही प्रमाण वाढते़ केवळ खातेप्रमुखाची परवानगी न मिळाल्याने़ या साºयाचे खापर पुढे एसीबीवर फोडले जाते़
 
तपासातला अडथळा़
- लाचखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांच्या पुढील तपासासाठी दोषारोपपत्र दाखल करण्यात येते़ त्यासाठी त्या लाचखोरांच्या प्रमुखांची पूर्वपरवानगी हवी असते़ त्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रितसर कागदपत्रांची पूर्तता देखील केली जाते; पण काही वेळा संबंधित लाचखोराच्या विभागप्रमुखांकडून त्यास विरोधही दर्शविला जातो़ त्यासंबंधीचे कारणही संबंधित विभागप्रमुख लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे देते़ दोषारोपपत्र सादर करण्याला विरोध केल्यामुळे तपास कामात अडथळे निर्माण होऊ लागले आहेत.
 
दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी विभागप्रमुखांच्या पूर्वपरवानगीसाठी एसीबी रितसर पाठपुरावा करते़ अभियोगपूर्व मंजुरी मिळत नाही म्हणून तपास रखडला जातो हे खरे असले तरी मात्र याची टक्केवारी फारच कमी आहे़ काही वेळा लाच घेतानाच्या बाबीही अभियोगपूर्व मंजुरी देताना तपासल्या जातात़ 
- अरुण देवकर उपअधीक्षक, एसीबी, सोलापूऱ