शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

विक्रमगडमध्ये ४० दिवसाचेच पाणी

By admin | Updated: February 13, 2017 03:19 IST

तालुक्यात मार्च महिन्या पासून काही गाव पाड्यात पाण्याचा खड-खडात सुरु होण्यास सुरुवात झाली असून मे महिन्यापर्यंत तर काही गाव पाड्यात बिकट अवस्था होते.

राहुल वाडेकर / विक्रमगडतालुक्यात मार्च महिन्या पासून काही गाव पाड्यात पाण्याचा खड-खडात सुरु होण्यास सुरुवात झाली असून मे महिन्यापर्यंत तर काही गाव पाड्यात बिकट अवस्था होते. सध्याच्या पेयजल साठ्याच्या पहाणीनुसार तालुक्यातील बहुतेक गावात जेम तेम ४० दिवस पाणी पुरेल इतकाच पाण्याचा साठ शिल्लक आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच नदी- नाले आटण्यास सुरवात झाली असून विहिरींनी तळ गाठले आहेत. दरवर्षी पाणी टंचाई ग्रस्त असणाऱ्या गाव- पाड्यांना कायम स्वरूपी उपाय योजना करण्याचे तर दूरच पण गेल्या ११ वर्षा पासूनच्या पाणी पुरवठा योजना अपूर्ण आवस्थेत आहेत. तालुक्यातील १० ग्राम पंचायतींसाठी राबविण्यात आलेल्या नळपाणी योजना आजपर्यंत आर्धावत आवस्थेत आहेत. यातील ६ योजना ११ वर्षा पासून तर ४ योजना ४ वर्षांपासून रखडलेल्या असल्याने या योजनाच्या कामात सावळा गोधळ असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आतापर्यंत या योजनानसाठी तब्बल १ कोटी ९७ लाख ५९ हजार रु खर्च झाला आहे. तालुक्यातील २००४-०५ साला पासून पाणी पुरवठा योजनांना साठी देहर्जे गावातील योजनेसाठी १५.८५ लाख रुपये निधी मंजूर होता, त्या पैकी १२.६१ लाख वितरीत करण्यात आले आहेत. साखरेगावासाठी २२.९९ लाख निधी मंजूर होता त्यापैकी १७.७३ लाख निधी वितरीत करण्यात आला. केव गावसाठी २१.६१ लाख रुपये निधी मंजूर होता त्यापैकी ८.६१ लाख रुपये निधी वितरीत करण्यात आला. या योजनात अपहार झाल्याने आजही न्याय प्रविष्ठ असल्याने गेल्या ११ वर्षा पासून रखडल्या आहेत. २००५-६ साली दादाडे ( कमळ पाडा) गावासाठी २३.४ लाख रुपये निधी मंजूर होता त्या पैकी ८.५९ लाख रुपये वितरीत करण्यात आले आहेत. जांभा- पोचाडा गावासाठी १५.८८ निधी मंजूर होता. त्या पैकी ६.६१ लाख निधी वितरीत करण्यात आला आहे. हातने गावा साठी १५.८८ लाख निधी मंजूर होता. त्या पैकी ६.७९ लाख निधी वितरीत करण्यात आला आहे. तर २०११-१२ साली खांड-उघानीपाडा गावासाठी ४६.६४ लाख निधी मंजूर होता. त्या पैकी ३९.८८ लाख निधी वितरीत करण्यात आला आहे. टेटवाली गावासाठी ३४.२४ लाख निधी मंजूर होता त्यापैकी २९.२७ लाख निधी वितरीत करण्यात आला. उपराले गावासाठी ४५.४४ लाख निधी मंजूर होता त्या पैकी ३८.८५ लाख निधी वितरीत करण्यात आला आहे. उटावली- पोटखल साठी ४४.९९ लाख निधी मंजूर होता त्या पैकी २५.६४ लाख निधी वितरीत करण्यात आला आहे.आशा साखरे, केव, खांड-उघानीपाडा, दादाडे जांभा, हाताने, टेटवली, उपराले, उटावली, देहर्जे या गावांसाठी स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना राबवण्यात आल्या. या साठी निधी सुद्धा वितरीत करण्यात आला आहे. या तील सहा योजनांचे काम २००४-५ मध्ये तर चार योजना २०११-१२ मध्ये हाती घेण्यात आल्या. यासाठी निधी वितरीत करण्यात आला. या साठी झालेल्या कामासाठी तब्बल २ कोटीच्या आसपास निधी ही खर्च झाला. अशी माहिती पंचायत समितीकडून देण्यात आली आहे. मात्र आजही या काही पाणी पुरवठा योजनेतील काही गावात नळाला पाणी आजतागायत आले नाही. यातील देहर्जे, साखरे, केव या तीन योजनातील अपहार झाल्या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल आहे. तर बाकीच्या योजना या ना त्या कारणाने अद्याप रखडलेल्या आहेत.पाणी पुरवठा विभागाकडून असा युक्तिवादया योजनाचा निधी ग्राम पंचायातींना देण्यात येत असून पाणी पुरवठा विभाग फक्त देखरेखीचे काम करते असा युक्तिवाद पाणी पुरवठा विभाग कडून करण्यात येतो. मात्र, ग्रामीण भागातील बहुतांशी ग्राम पंचायती सक्षम नसल्याने ठेकेदार नेमून काम करण्यात येते. तरी ही या योजना आजतागायत पूर्ण झाल्या नाहीत. या- ना त्या कारणाने या योजना अपूर्ण असल्याने या गावातील नागरिकांना पाण्यासाठी विहीर-नदी- नाल्यांचा आधार घ्यावा लागतो. योजनाच्या कामात चाल ढकल करून काय साध्य झाले. असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.