शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडमध्ये ४० दिवसाचेच पाणी

By admin | Updated: February 13, 2017 03:19 IST

तालुक्यात मार्च महिन्या पासून काही गाव पाड्यात पाण्याचा खड-खडात सुरु होण्यास सुरुवात झाली असून मे महिन्यापर्यंत तर काही गाव पाड्यात बिकट अवस्था होते.

राहुल वाडेकर / विक्रमगडतालुक्यात मार्च महिन्या पासून काही गाव पाड्यात पाण्याचा खड-खडात सुरु होण्यास सुरुवात झाली असून मे महिन्यापर्यंत तर काही गाव पाड्यात बिकट अवस्था होते. सध्याच्या पेयजल साठ्याच्या पहाणीनुसार तालुक्यातील बहुतेक गावात जेम तेम ४० दिवस पाणी पुरेल इतकाच पाण्याचा साठ शिल्लक आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच नदी- नाले आटण्यास सुरवात झाली असून विहिरींनी तळ गाठले आहेत. दरवर्षी पाणी टंचाई ग्रस्त असणाऱ्या गाव- पाड्यांना कायम स्वरूपी उपाय योजना करण्याचे तर दूरच पण गेल्या ११ वर्षा पासूनच्या पाणी पुरवठा योजना अपूर्ण आवस्थेत आहेत. तालुक्यातील १० ग्राम पंचायतींसाठी राबविण्यात आलेल्या नळपाणी योजना आजपर्यंत आर्धावत आवस्थेत आहेत. यातील ६ योजना ११ वर्षा पासून तर ४ योजना ४ वर्षांपासून रखडलेल्या असल्याने या योजनाच्या कामात सावळा गोधळ असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आतापर्यंत या योजनानसाठी तब्बल १ कोटी ९७ लाख ५९ हजार रु खर्च झाला आहे. तालुक्यातील २००४-०५ साला पासून पाणी पुरवठा योजनांना साठी देहर्जे गावातील योजनेसाठी १५.८५ लाख रुपये निधी मंजूर होता, त्या पैकी १२.६१ लाख वितरीत करण्यात आले आहेत. साखरेगावासाठी २२.९९ लाख निधी मंजूर होता त्यापैकी १७.७३ लाख निधी वितरीत करण्यात आला. केव गावसाठी २१.६१ लाख रुपये निधी मंजूर होता त्यापैकी ८.६१ लाख रुपये निधी वितरीत करण्यात आला. या योजनात अपहार झाल्याने आजही न्याय प्रविष्ठ असल्याने गेल्या ११ वर्षा पासून रखडल्या आहेत. २००५-६ साली दादाडे ( कमळ पाडा) गावासाठी २३.४ लाख रुपये निधी मंजूर होता त्या पैकी ८.५९ लाख रुपये वितरीत करण्यात आले आहेत. जांभा- पोचाडा गावासाठी १५.८८ निधी मंजूर होता. त्या पैकी ६.६१ लाख निधी वितरीत करण्यात आला आहे. हातने गावा साठी १५.८८ लाख निधी मंजूर होता. त्या पैकी ६.७९ लाख निधी वितरीत करण्यात आला आहे. तर २०११-१२ साली खांड-उघानीपाडा गावासाठी ४६.६४ लाख निधी मंजूर होता. त्या पैकी ३९.८८ लाख निधी वितरीत करण्यात आला आहे. टेटवाली गावासाठी ३४.२४ लाख निधी मंजूर होता त्यापैकी २९.२७ लाख निधी वितरीत करण्यात आला. उपराले गावासाठी ४५.४४ लाख निधी मंजूर होता त्या पैकी ३८.८५ लाख निधी वितरीत करण्यात आला आहे. उटावली- पोटखल साठी ४४.९९ लाख निधी मंजूर होता त्या पैकी २५.६४ लाख निधी वितरीत करण्यात आला आहे.आशा साखरे, केव, खांड-उघानीपाडा, दादाडे जांभा, हाताने, टेटवली, उपराले, उटावली, देहर्जे या गावांसाठी स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना राबवण्यात आल्या. या साठी निधी सुद्धा वितरीत करण्यात आला आहे. या तील सहा योजनांचे काम २००४-५ मध्ये तर चार योजना २०११-१२ मध्ये हाती घेण्यात आल्या. यासाठी निधी वितरीत करण्यात आला. या साठी झालेल्या कामासाठी तब्बल २ कोटीच्या आसपास निधी ही खर्च झाला. अशी माहिती पंचायत समितीकडून देण्यात आली आहे. मात्र आजही या काही पाणी पुरवठा योजनेतील काही गावात नळाला पाणी आजतागायत आले नाही. यातील देहर्जे, साखरे, केव या तीन योजनातील अपहार झाल्या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल आहे. तर बाकीच्या योजना या ना त्या कारणाने अद्याप रखडलेल्या आहेत.पाणी पुरवठा विभागाकडून असा युक्तिवादया योजनाचा निधी ग्राम पंचायातींना देण्यात येत असून पाणी पुरवठा विभाग फक्त देखरेखीचे काम करते असा युक्तिवाद पाणी पुरवठा विभाग कडून करण्यात येतो. मात्र, ग्रामीण भागातील बहुतांशी ग्राम पंचायती सक्षम नसल्याने ठेकेदार नेमून काम करण्यात येते. तरी ही या योजना आजतागायत पूर्ण झाल्या नाहीत. या- ना त्या कारणाने या योजना अपूर्ण असल्याने या गावातील नागरिकांना पाण्यासाठी विहीर-नदी- नाल्यांचा आधार घ्यावा लागतो. योजनाच्या कामात चाल ढकल करून काय साध्य झाले. असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.