शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

साडेतीन लाख कोटींचे कर्ज !

By admin | Updated: March 18, 2016 02:39 IST

राज्यावरील कर्जाचा डोंगर वाढतच आहे. आजमितीला ३ लाख ३३ हजार १६० कोटी रुपयांचे कर्ज राज्याच्या शिरावर आहे. चौदाव्या वित्त आयोगाने घालून दिलेल्या मर्यादेच्या ते आतच असल्याचा

मुंबई : राज्यावरील कर्जाचा डोंगर वाढतच आहे. आजमितीला ३ लाख ३३ हजार १६० कोटी रुपयांचे कर्ज राज्याच्या शिरावर आहे. चौदाव्या वित्त आयोगाने घालून दिलेल्या मर्यादेच्या ते आतच असल्याचा दावा सरकारने केला आहे. राज्याच्या स्थूल उत्पन्नाशी कर्जाचे प्रमाण १६.९२ टक्के इतके आहे. राज्य स्थूल राज्य उत्पन्नात ५.८ टक्के वाढ होऊन ते १५ लाख २४ हजार ८४६ कोटी रुपयांवर गेले आहे. सरकारने विधिमंडळात गुरुवारी सादर केलेल्या राज्याच्या आर्थिक अहवालात राज्याच्या तिजोरीचे हे वास्तव समोर आले आहे. राज्य सरकारने निश्चित केलेले उत्पन्नाचे उद्दिष्ट यंदा साधले जाईल की नाही याबाबत साशंकता व्यक्त करण्यात आली आहे. २०१४-१५मध्ये शासनाचे महसुली उत्पन्न १ लाख ८० हजार ७९४कोटी रुपये होते. २०१५-१६(म्हणजे येत्या ३१ मार्चपर्यंत) ते १लाख ९८ हजार २३१ कोटी रुपये अपेक्षित आहे. तथापि, यापैकी डिसेंबर २०१५पर्यंत १ लाख २६ हजार ४५७ कोटी इतके महसुली उत्पन्न झाले. याचा अर्थ जानेवारी ते मार्च २०१६ या तीन महिन्यांत तब्बल ७१ हजार ७७४ कोटी रुपयांचे उत्पन्न होणे अपेक्षित होते. (विशेष प्रतिनिधी)आज अर्थमंत्र्यांची कसोटी...राज्यावरील भीषण दुष्काळाचे ढग अधिक गडद होत असताना आणि राज्याच्या तिजोरीवर कमालीचा ताण आलेला असताना २०१६-१७चा वार्षिक अर्थसंकल्प सादर करताना वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कसोटी लागणार आहे. शुक्रवारी दुपारी २ वाजता ते विधानसभेत अर्थसंकल्प सादर करतील. एलबीटी माफ करणे, टोलमाफी, दुष्काळी भागासाठी केलेली तरतूद यामुळे राज्यासमोर मोठे आर्थिक आव्हान उभे झाले आहे. या पार्श्वभूमीवर, काही कटू निर्णय मुनगंटीवार यांना घ्यावे लागूशकतात. सरकारी आस्थापनांवरील खर्च, पुनरावृत्तीहोत असलेल्या आणि कालबाह्य झालेल्यालोकाभिमुख योजनांना कात्री लावली जाते काय याबाबत उत्सुकता आहे. गुंतवणूक मंजूर किती अन् प्रत्यक्षात कितीमेक इन इंडियांतर्गत राज्यात ७ लाख ९४ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले असून, त्याद्वारे ३० लाख रोजगारनिर्मिती केली जाईल, असा दावा सरकारने केला आहे. २०१९पर्यंत काय होणार - २०१९पर्यंत कोणकोणते प्रकल्प पूर्ण होतील याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. मुंबई कोस्टल रोडसाठी परवानग्या मिळाल्या असून, आता ३० एप्रिलला निविदा निघतील. १६ सप्टेंबरला कार्यादेश देऊ. १५ जुलै २०१९पर्यंत पहिला टप्पा पूर्ण होईल.- मुंबई हार्बर लिंकसाठी आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कार्यादेश दिले जातील. पहिला टप्पा २०१९पर्यंत पूर्ण होईल. - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत सर्व परवानग्या मिळाल्या असून, लवकरच मंत्रिमंडळात यासंबंधीच्या अंतिम प्रस्तावाला मंजुरी दिली जाईल व डिसेंबर २०१९पर्यंत काम पूर्ण होईल. - मेट्रो लाइन-७साठी एप्रिल २०१६मध्ये काम सुरू होईल. जून २०१९मध्ये पूर्ण होईल. मेट्रो लाइन३चे दोन महिन्यांत कार्यादेश दिले जातील. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी)पर्यंतचा टप्पा २०१९पर्यंत पूर्ण होईल.- या प्रकल्पातून निघणारा मलबा कोस्टल रोड व छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामात वापरला जाईल. त्यामुळे एक हजार कोटींची बचत होईल.- नागपूर-मुंबई कम्युनिकेशन एक्स्प्रेस-वे या सहापदरी रस्त्यापैकी दोनपदरी रस्त्याचे काम २०१९पर्यंत पूर्ण होईल. उर्वरित काम डिसेंबर २०२०मध्ये पूर्ण होईल.