शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

नागपुरात १५५ नगरसेवक

By admin | Updated: December 26, 2014 00:58 IST

महापालिकेच्या फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुका आता वॉर्ड पद्धतीने होणार आहे. शहराची वाढती लोकसंख्या, हुडकेश्वर-नरासाळा परिसराचा महापालिकेच्या हद्दीत झालेला समावेश पाहता नागपूर

वस्त्यांचे होणार स्वतंत्र वॉर्ड : १५ ते २० हजार लोकसंख्येचा एक गट कमलेश वानखेडे - नागपूरमहापालिकेच्या फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुका आता वॉर्ड पद्धतीने होणार आहे. शहराची वाढती लोकसंख्या, हुडकेश्वर-नरासाळा परिसराचा महापालिकेच्या हद्दीत झालेला समावेश पाहता नागपूर महापालिकेतील नगरसेवकांची संख्या सुमारे १५५ पर्यंत जाऊ शकते. एवढेच नव्हे तर नामनिर्देशित सदस्यांची संख्याही एक ते दोनने वाढण्याची शक्यता आहे. महापालिकेला मिळालेला ‘अ’ वर्ग दर्जा व एमएमसी अ‍ॅक्टमधील तरतुदींचा यासाठी आधार घेतला जाणार आहे. महापालिकेत राबविण्यात येणारी बहुसदस्यीय प्रभाग पद्धती रद्द करून एका वॉर्डातून एकच नगरसेवक निवडून देण्याची जुनी पद्धत पुन्हा अमलात आणण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने हिवाळी अधिवेशन काळात घेतला. त्यानुसार अध्यादेश जारी होईल. त्यामुळे आता वॉर्डांची नव्याने पुनर्रचना करण्यासाठी महापालिका कामी लागली आहे. राज्य शासनाकडून या संबंधीचा अध्यादेश जारी होताच महापालिका अधिकृतपणे या कामासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करणार आहे. गेल्या वेळी प्रभागाची रचना करताना एका प्रभागात २५ ते ३३ हजार लोकसंख्येचा समावेश करण्यात आला होता. नवीन रचनेत एका वॉर्डासाठी १५ ते २० हजार लोकसंख्या गृहीत धरली जाईल. सुमारे १० ते १२ हजार मतदार एका वॉर्डात येतील. शहराच्या बाह्य भागात असलेल्या सुमारे ८ ते १० प्रभागातील लोकसंख्या व मतदारसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे सध्या दोन नगरसेवक असलेल्या काही प्रभागात वॉर्ड पद्धतीत तेवढ्याच परिसरासाठी तीन नगरसेवक होण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, प्रभाग क्रमांक ६८ नरेंद्रनगर मध्ये २०१२ मध्ये ४२ हजार लोकसंख्या होती. ती आता सुमारे ६० हजारावर गेली आहे. येथे एका नगरसेवकाची वाढ होऊ शकते. प्रभाग पद्धतीत एकच वस्ती दोन प्रभागात विभागल्या गेली होती. आता वस्त्यांना वॉर्डाच्या रूपात स्वतंत्र ओळख मिळेल. रामदास पेठ, धंतोली, जयताळा, बोरगाव, झिंगाबाई टाकळी, हनुमाननगर, बालाजीनगर या वस्त्यांचे स्वतंत्र वॉर्ड होतील. नगरसेवकांची संख्या १५० पेक्षा जास्त असलेल्या महापालिकेला विशेष दर्जा दिला जातो. मात्र, नागपूर महापालिकेचा उपराजधानीचे शहर असल्यामुळे विशेष बाब म्हणून सहा महिन्यांपूर्वीच मेट्रो सिटीमध्ये समावेश करीत ‘अ’ वर्ग दर्जा देण्यात आला आहे. शिवाय महाराष्ट्र महापालिका कायद्यात महापालिकेला शासनाच्या काही अटींच्या अधीन राहून स्वत:ची नगरसेवक संख्या ठरवण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या दोन्ही बाबींचा फायदा घेत नगरसेवकांच्या वाढीव संख्येचा प्रस्ताव महापालिकेमार्फत तयार केला जाण्याची शक्यता आहे.नरसाळा, हुडकेश्वर भागात चार नगरसेवकहुडकेश्वर, नरसाळा हा परिसर महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आला आहे. येथे सुमारे एक लाख लोकसंख्या आहे. यापूर्वी या भागात दोन प्रभाग प्रस्तावित होते. वॉर्ड रचनेमध्ये येथे सुमारे चार नगरसेवक राहण्याची शक्यता आहे. दोन नामनिर्देशित सदस्यही वाढणारनगरसेवकांची संख्या १३६ असताना तीन नामनिर्देशित सदस्य नियुक्त केले जायचे. नगरसेवकांची संख्या वाढून १४५ झाली तेव्हा नामनिर्देशित सदस्यांची संख्या दोनने वाढवून पाच करण्यात आली. आता नव्या वॉर्ड रचनेत नगरसेवकांची संख्या सुमारे १५५ होण्याची शक्यता असल्यामुळे नामनिर्देशित सदस्यांची संख्याही एक किंवा दोनने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे २०१७ च्या महापालिकेच्या निवडणुकीत तिकीट न मिळणाऱ्या कार्यकर्त्यांना निवडणुकीनंतर सामावून घेण्यासाठी राजकीय पक्षांनाचीही अधिकची सोय होणार आहे. २००७ मध्ये १३६ नगरसेवक२००२ मध्ये तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक झाली होती. एका प्रभागात तीन नगरसेवक होते. या पद्धतीला पुढे विरोध झाला. त्यामुळे फेब्रुवारी २००७ मध्ये वॉर्ड पद्धतीने निवडणूक घेण्यात आली. वॉर्ड रचनेत नगरसेवकांची संख्या १३६ निश्चित करण्यात आली होती. २०१२ मध्ये १४५ नगरसेवक फेब्रुवारी २०१२ मध्ये वॉर्ड पद्धत रद्द करून प्रभाग पद्धत लागू करण्यात आली. त्यामुळे पुनर्रचना करून महापालिकेत ७२ प्रभाग तयार करण्यात आले. प्रत्येक प्रभागात दोन व शेवटच्या प्रभागात तीन नगरसेवकांची संख्या निश्चित करण्यात आली. यामुळे नगरसेवकांची संख्या १४५ वर पोहचली.