शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
2
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
3
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
4
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
5
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
6
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
7
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
8
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
9
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
10
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
11
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
12
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
13
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
14
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
15
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
16
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
17
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
18
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
19
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
20
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?

परप्रांतीयांचा १५ मच्छीमार बोटींवर हल्ला

By admin | Updated: May 17, 2014 22:04 IST

खोल समुद्रात मासेमारीस गेलेल्या करंजा, रेवस, कुलाबा, मुंबई आणि राज्यातील इतर १५ मच्छीमार बोटींवर शुक्रवारी देवगड समुद्रकिनार्‍यानजीक परप्रांतीय बोटींवरील कर्मचार्‍यांनी जोरदार हल्ला केला.

उरण : खोल समुद्रात मासेमारीस गेलेल्या करंजा, रेवस, कुलाबा, मुंबई आणि राज्यातील इतर १५ मच्छीमार बोटींवर शुक्रवारी देवगड समुद्रकिनार्‍यानजीक परप्रांतीय बोटींवरील कर्मचार्‍यांनी जोरदार हल्ला केला. शिशाचे गोळे, दगडांनी हल्ला चढविल्याने बोटींवरील ८ खलाशी जखमी झाले. या प्रकरणी देवगड पोलिसात परप्रांतीय मच्छीमारांविरोधात तक्रार करण्यात आली आहे. शुक्रवारी (१६) करंजा, रेवस, कुलाबा, मुंबई आणि राज्यातील इतर १५ मच्छीमार बोटी खोल समुद्रात मासेमारीस गेल्या होत्या. शासनाच्या नियमाप्रमाणे १२ नॉटिकल मैलावरील देवगड समुद्रकिनार्‍यानजीक या मच्छीमारी बोटी मासेमारी करीत होत्या. अचानक कर्नाटक राज्यातील मलपा बंदरातील ७०-८० मच्छीमार बोटी मच्छीमारांवर चाल करून आल्या. या परप्रांतीय मच्छीमारांनी शिशांचे गोळे, दगडफेक करीत राज्यातील मच्छीमार बोटी आणि त्यावरील कर्मचार्‍यांवर हल्ला केला. या हल्ल्यात मच्छीमार बोटींच्या केबिनच्या काचा तुटल्या. बोटी, साधन-सामग्री आणि जाळींचेही नुकसान झाल्याची माहिती करंजा मच्छीमार संस्थेचे चेअरमन प्रदीप नाखवा यांनी दिली. (वार्ताहर)मासळीची लूट?राज्यातील सागरी क्षेत्रात परप्रांतीय मच्छीमारांनी धुमाकूळ घातला आहे. बेधुंदपणे करीत असलेल्या प्रचंड प्रमाणातील मासेमारीमुळे राज्यातील मच्छीमारांच्या वाट्याची मासळी अक्षरश: लुटून नेत आहेत. परप्रांतीय मच्छीमार मासळी लुटून नेण्याबरोबरच राज्यातील मच्छीमारांवर हल्लेही करीत आहेत. अशा घुसखोरी करणार्‍या परप्रांतीय मच्छीमारांचा शासन, गस्ती पथक, मत्स्य व्यवसाय विभाग, पोलिसांनी दखल घेऊन बंदोबस्त करण्याची मागणी करंजा मच्छीमार संस्थेचे चेअरमन प्रदीप नाखवा यांनी केली आहे.