शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
5
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
6
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
7
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
8
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
9
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
11
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
12
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
13
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
14
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
15
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
16
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
17
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
18
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
19
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
20
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना

पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण तिपटीने जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:20 IST

गेल्या वर्षभरापासून कोरोनाचे संकट आहे. त्यावर मात करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढविणे गरजेचे ठरत आहे. महिलांनी आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण चांगले ...

गेल्या वर्षभरापासून कोरोनाचे संकट आहे. त्यावर मात करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढविणे गरजेचे ठरत आहे. महिलांनी आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण चांगले ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा ॲनिमियासारखा आजार होऊन अन्य आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आहारात लोहाची कमतरता झाली की ॲनिमिया होतो. ॲनिमियामध्ये रक्तातील ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे शरीरातील अवयवांवर परिणाम होतो.

सर्वसाधारणपणे पुरुषांत १३-१६ ग्रॅम टक्के, महिलांमध्ये १२ ते १५ ग्रॅम टक्के, गरोदर मातांमध्ये ११ ग्रॅम टक्के रक्त असावे लागते. ॲनिमिया हा किशोरवयीन मुलींत जवळपास ७० टक्के, मुलांत ५४ टक्के, तर ४९ वर्षांतील महिलांमध्ये ५० टक्के आहे. पुरुषांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण १५ टक्के असून त्याच्या तिप्पट महिलांमध्ये आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने ॲनिमियाला सायलेंट इमर्जन्सी असे म्हटले आहे. लोहाची कमतरता, बी १२, फोलिक ॲसिडमुळे हा आजार होतो.

महिलांमध्ये हा आजार अति रक्तस्राव, बालकांत जंतांचे आजार, लाल पेशींचे काही अनुवंशिक आजार, प्रसूतीपश्चात रक्तस्राव, काही दीर्घकालीन आजार, मुलींचा विवाह लवकर होऊन त्या गरोदर राहणे, दोन मुलांमधील अंतर कमी असणे, अशा बाबी या आजारास कारणीभूत ठरतात.

या आजाराची मासिक पाळीवेळी थकवा जाणवणे, रक्ताच्या कमतरतेमुळे धडधड होणे, गळून गेल्यासारखे वाटणे, भूक न लागणे, चिडचिडेपणा, नखे ठिसूळ होणे, केस पांढरे होणे, जास्त वेळ एकाग्रतेत काम न करता येणे, पायाला अथवा सर्वांगाला सूज येणे अशी लक्षणे आहेत.

वेळेत निदान न केल्यास महिलेची कार्यक्षमता अगदी कमी होते, रोग प्रतिकारशक्ती कमी होते, हृदय व फुप्फुसावर अतिरिक्त ताण पडून ते निकामी होण्याचा धोका असतो. गर्भवती महिलांमध्ये बाळाची वाढ पूर्ण न होणे, परिणामी कमी वजनाचे बाळ जन्मणे, बाळंतपणात गुंतागुंत असे या आजाराचे परिणाम होतात.

लोहयुक्त आणि संतुलित आहारामुळे हा आजार टाळता येऊ शकतो. चणे, पालक, ब्रोकोली, भोपळा बिया, सूर्यफूल बिया, काजू, पिस्ता, गूळ, बदाम खाण्यामुळे ॲनिमिया टाळता येऊ शकतो. तसेच भाज्या लोखंडाच्या भांड्यात शिजवाव्यात, महिलांनी वर्षातून एकदा तरी हिमोग्लोबीन तपासणी करावी, असा सल्लाही विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील सहयोगी प्रा. डॉ. विमल होळंबे-डोळे यांनी दिला.