शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

यंदाच्या बजेटने मला काय दिले रे भाऊ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:24 IST

दरवर्षी १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करतात; मात्र त्यातील तरतुदी, योजनांची ग्रामीण भागातील बहुसंख्य नागरिक, युवकांना माहितीही ...

दरवर्षी १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करतात; मात्र त्यातील तरतुदी, योजनांची ग्रामीण भागातील बहुसंख्य नागरिक, युवकांना माहितीही नसल्याचे दिसून येते. त्यामुळे अर्थसंकल्प हा कितपत उपयुक्त असतो, याची किंचितही कल्पना नसल्याचे पहावयास मिळाले. सध्याची परिस्थिती पाहता आगामी काळात आणखीन महागाईचा भडका वाढू नये, अशी सापेक्ष भावना सर्वसामान्यांतून व्यक्त झाली. दरम्यान, काहींनी अर्थसंकल्प बरा असल्याचे सांगितले तर काहींनी अर्थसंकल्पात कुठलीही आशा नसल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अर्थसंकल्प सादर झाला; पण त्यातून आम्हाला काय मिळणार? दूरचित्रवाणीवर अर्थसंकल्पातील घोषणा ऐकल्या; परंतु त्या प्रत्यक्षात कितपत उतरतात, हा खरा प्रश्न आहे.

- मेघा नराळे, सर्वसामान्य गृहिणी.

यंदाच्या अर्थसंकल्पात आयात तेलाच्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आणखीन तेलाचे दर वाढतील. सरकार जीएसटी, इन्कमटॅक्समध्ये सवलत देईल, अशी अपेक्षा होती.

- जगन्नाथ बिरनाळे, किराणा दुकानदार.

अर्थसंकल्प सादर झाल्याचे ऐकले; पण ते आम्हाला समजायला तर हवं. आम्ही फक्त खासगी नोकरी जाणतो. अर्थसंकल्पाचा फायदा, तोटा लवकरच समजेल.

- सादिक शेख, खासगी नोकरदार.

देशात पायाभूत सुविधा, कृषी, शिक्षण, आरोग्य, रस्ते, रोजगार वाढीसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. जीएसटी नियमात, दरात बदल करण्यात आले नाहीत. रोजगार वाढविण्यासाठी प्रयत्न करणारा हा अर्थसंकल्प आहे.

- दिनेश गिल्डा, व्यापारी.

यंदाच्या अर्थसंकल्पात रस्ते, वाहतुकीसाठी चांगली तरतूद करण्यात आली आहे. आम्हाला केवळ चांगले रस्ते, सुरक्षित वाहतूक आणि महागाई नको, एवढीच अपेक्षा असते.

- श्रीकृष्ण पाडे, ॲाटोचालक.

आपला देश कृषीप्रधान असल्याने शेती सुधारण्यासाठी चांगले कार्यक्रम राबविण्याची गरज आहे. त्यामुळे शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प असणे आवश्यक आहे.

- देवराव म्हेत्रे, शेतकरी.

सरकारकडून कुठलाही कर सुरुवातीस तो पेट्रोल, डिझेलवर आकारला जातो. त्याची झळ ग्राहकांना बसते. त्यामुळे महागाई वाढण्यास सुरुवात होते. हा कर कमी होणे आवश्यक आहे.

- अजय शहा, पेट्रोल पंपचालक.

यंदाचा अर्थसंकल्प हा आशादायी नाही. त्यात ज्येष्ठांच्या हिताचा कुठलाही विचार करण्यात आला नाही. त्यामुळे महागाई आणखीन वाढून जगणं असह्य होणार आहे.

- डॉ.बी.आर. पाटील, ज्येष्ठ नागरिक.

अर्थसंकल्प सादर झाला; पण त्यानुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातही तशीच स्थिती आहे.

- विष्णू शेळके, युवक.

सरकारने दरवर्षीप्रमाणे अर्थसंकल्प सादर केला असेल; पण आमच्यासारख्या गोरगरीब हातावर पोट असलेल्यांसाठी काय असणार आहे? आम्हाला त्यातील काहीही समजत नाही.

- सुधाकर शेंडगे, भाजीपाला विक्रेता.

बसस्थानक...

येथील मध्यवर्ती बसस्थानकात अवघ्या २ टक्के नागरिकांचे अर्थसंकल्पाकडे लक्ष होते. बहुतांश नागरिकांना त्याची कुठलीही माहिती नसल्याचे पहावयास मिळाले. एक-दोन प्रवाशांना अर्थसंकल्पासंदर्भात चर्चा केली असता, त्यातील आम्हाला काय समजणार, त्यासाठी त्या क्षेत्रातील लोकांना बोलावे लागेल, असे सांगितले.

रेल्वेस्थानक...

लातुरातील रेल्वेस्थानकावर अवघ्या काही नागरिकांनाच अर्थसंकल्पाबाबत माहिती होती. अनेकांचा अर्थसंकल्पाशी कुठलाही संबंध नसल्याचे पहावयास मिळाले. अर्थसंकल्प काहीही असो. आगामी काळात महागाई वाढू नये, अशी अपेक्षा काही प्रवाशांनी बोलताना व्यक्त केली.