शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

औराद शहाजानी परिसरात तापमानाचा पारा वाढला @ ३८.५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:19 IST

दरम्यान, यावर्षी परतीचा चांगला पाऊस झाल्याने १ हजार २०० हेक्टरवर रब्बी हंगामात सिंचन झाले आहे. औराद शहाजानी परिसरात तापमानाचा ...

दरम्यान, यावर्षी परतीचा चांगला पाऊस झाल्याने १ हजार २०० हेक्टरवर रब्बी हंगामात सिंचन झाले आहे.

औराद शहाजानी परिसरात तापमानाचा पारा वाढल्याने दुपारी रस्ते निर्मनुष्य असल्याचे दिसून येत आहे.

सध्या शेतकऱ्यांनी पपई, केळी बागांची आणि भाजीपाल्याची लागवड केली आहे. मात्र, लातूर जिल्ह्यातील तापमानाचा पारा मार्चच्या पहिल्याच आठवड्यात ३८ अंशांच्या वर गेला आहे. यामुळे पुढील महिन्यात उन्हाची तीव्रता अधिक राहणार आहे. औराद शहाजानी परिसर हा तेरणा आणि मांजरा नद्यांच्या वाहणाऱ्या प्रवाहामुळे आणि या नद्यांवर उच्चस्तरीय व काेल्हापुरी बंधारे आहेत; पण गत वर्ष साेडले तर मागील पाच वर्षांत या भागातील कमी पावसामुळे पाणीटंचाई निर्माण झाली हाेती. या वर्षी चांगला पाणीसाठा झाला हाेता; परिणामी, सिंचनक्षेत्रात पुन्हा एकदा वाढ हाेऊन १ हजार २०० हेक्टरवर रब्बीचा हंगाम पाेहोचला आहे. बारमाही सिंचन तर ३ हजार हेक्टरांवर पाेहोचले आहे. यामध्ये तेरणा व मांजरावरील पाच बंधाऱ्यांचे उच्चस्तरीयमध्ये रूपांतर करून बारमाही पाणी थांबले. याचाच सिंचनावर वाढीवर परिणाम झाला आहे. यातूनच ऊस, भाजीपाला, फळबागांसह हंगामी पाण्यावर पिके घेण्याचे प्रमाण वाढले आहे.

आठवड्यातील तापमानाचा आलेख...

औराद तापमान मार्च महिन्यात

कमाल किमान बाष्पीभवन

दिनांक ७ मार्च कमाल - ३८.५ किमान - १८.००, ६ मार्च - कमाल - ३७.५, किमान - १७. ३२, ५ मार्च - कमाल - ३६.००, किमान - १६.००, ४ मार्च - कमाल - ३७.००, किमान - २१.००, ३ मार्च - किमान - ३६.०० कमाल - २२.००, २ मार्च - किमान - ३६.५ कमाल - २२.००, १ मार्च राेजी किमान तापमान - ३५.००, कमाल - २५.०० अंश आहे. तापमानाचा पारा आणखी वाढेल, असे हवामान केंद्राचे मापक मुक्रम नाईकवाडे म्हणाले.

बंधाऱ्यांतील पाणीसाठ्यात हाेतेय घट...

वाढत्या तापमानामुळे बंधाऱ्यातील पाणीसाठ्यातही दिवसेंदिवस घट हाेत आहे.

वांजरखेडा बंधारा काेरडा पडला आहे. तगरखेडा - १० टक्के, औराद - ४० टक्के, साेनखेड - काेरडा, गुंजरगा ४० टक्के, लिंबाळा - काेरडा, मदनसुरी बंधारा - ४० टक्के जलसाठा आहे. याबाबत जलसिंचन विभागाचे शाखा अभियंता एस.आर. मुळे म्हणाले, बाष्पीभवन वाढत असल्याने पाणीपातळीत घट हाेत आहे. लाल काेळीचा प्रादुर्भाव औराद परिसरातील भाजीपाल्यावर अधिक आहे. परिणामी, उत्पादनात माेठ्या प्रमाणावर घट हाेत आहे.