शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

जिल्ह्यातील शाळा सुरू; महाविद्यालये मात्र बंदच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : पहिल्या टप्प्यात नववी ते बारावी आणि दुसऱ्या टप्प्यात ५ वी ते ८ वीचे वर्ग ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : पहिल्या टप्प्यात नववी ते बारावी आणि दुसऱ्या टप्प्यात ५ वी ते ८ वीचे वर्ग सुरू झाले असले तरी वरिष्ठ महाविद्यालये अद्यापि बंद आहेत. या विद्यार्थ्यांनाही आता ऑनलाईनऐवजी ऑफलाईन वर्ग सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. ऑनलाईनने लर्निंग व्यवस्थित होत नसल्याचे म्हणणे वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचेही आहे.

जिल्ह्यात ११७ वरिष्ठ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमध्ये ४७ हजार ८०० विद्यार्थीसंख्या आहे. नागरी महाविद्यालये वगळता ग्रामीण भागातील महाविद्यालयांचे ऑनलाईन वर्गही होत नाहीत. विद्यापीठाचा अभ्यासक्रम प्राप्त करून विद्यार्थी स्वयंअध्ययन करून परीक्षा देत आहेत. कोरोनामुळे शैक्षणिक नुकसान झाल्याची भावना विद्यार्थ्यांच्या मनात आहे. पाचवी ते आठवी आणि नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाल्याने या विद्यार्थ्यांनाही आता काॅलेजेस सुरू होण्याची ओढ लागली आहे. विद्यार्थी ऑनलाईनला कंटाळले असून, ऑफलाईनची त्यांना प्रतीक्षा आहे.

प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिकचे वर्ग सुरू झाले आहेत. शासनाने आता वरिष्ठ महाविद्यालयही सुरू करणे गरजेचे आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळेल. सदर मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद राज्यभर आंदोलन करत आहे. त्यानुसार लातूर, उदगीर, औसा, अहमदपूर आदी ठिकाणी अभाविपने आंदोलन केले आहे.

- मीत ठक्कर, अध्यक्ष अभाविप

शहरी भागातील महाविद्यालयांनी ऑनलाईन वर्ग घेतले, परंतु ग्रामीण भागातील अनेक महाविद्यालयांनी ऑनलाईन वर्ग घेतले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. शिक्षण मिळाले नाही. आतातरी शासनाने महाविद्यालय सुरू करून ऑफलाईन वर्ग सुरू करावेत. कोरोनाचा संसर्ग कमी झालेला आहे. त्यामुळे वर्ग सुरू करण्यास काहीच हरकत नाही, अशी मागणी आहे.

- प्रीतम दंदे, सम्यक विद्यार्थी आंदोलन

आमच्यापेक्षा लहान मुलांचे वर्ग सुरू झालेले आहेत. कोरोना प्रतिबंधासाठी ज्या सूचना वा गाईडलाईन दिल्या जातील त्या फाॅलो करण्यासाठी आमच्यात समज आहे. त्यामुळे वरिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यास काही हरकत नाही. जेणेकरून पदवीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळेल. वर्ग नाही. प्रात्यक्षिक नाही. पुढे कसे कळेल? त्यामुळे ऑफलाईन सुरू करावे.

- प्रवीण करमले, विद्यार्थी