शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

दररोज ४ लाख ८० हजार लीटर पाण्यावर पुनर्प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:25 IST

लातूर : शहर महानगरपालिकेच्यावतीने शहरातील सांडपाण्यावर विकेंद्रीत पुनर्प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला आहे. जैविक पद्धतीने सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया करणारा ...

लातूर : शहर महानगरपालिकेच्यावतीने शहरातील सांडपाण्यावर विकेंद्रीत पुनर्प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला आहे. जैविक पद्धतीने सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया करणारा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प असून, जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले.

शहर पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावे, पाणीटंचाई कायमची दूर व्हावी यासाठी विविध पर्यायांवर पालिकेच्यावतीने काम केले जात आहे. केवळ पाणीटंचाईच नाही तर शहराला स्वच्छ व सुंदर करण्यासाठीही मनपा विविध उपक्रम राबवते. नाल्यातील पाण्याच्या माध्यमातून होणारे प्रदूषण टाळणे आणि पाण्याचा पुन्हा वापर करणे या हेतूने सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प महानगरपालिकेने हाती घेतले आहेत. शहराच्या विविध भागातून वाहून जाणाऱ्या सांडपाण्यावर महानगरपालिकेने विकेंद्रीत पुनर्प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे. यात नाल्याचे पाणी अडवून या दूषित पाण्यावर वेगवेगळ्या माध्यमातून जैविक प्रक्रिया केली जाते. एका प्रकल्पातून प्रतिदिवशी ६० हजार लीटर शुद्ध पाण्याची होते. अशा एकूण ८ प्रकल्पांमुळे ४ लाख ८० हजार लीटर शुद्ध पाणी पुन्हा वापरात येणार आहे. पाणी शुद्धीकरण करताना निघालेल्या वेस्टेजचा खत म्हणून वापर करणे शक्य होणार आहे. एकूण ८ प्रकल्पांपैकी मांजरा आयुर्वेदिक महाविद्यालय परिसरातील प्रकल्पाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाला महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, पालिकेचे आयुक्त अमन मित्तल, विरोधी पक्षनेते ॲड. दीपक सूळ, सहाय्यक आयुक्त मंजुषा गुरमे, नगरसेवक रविशंकर जाधव, अशोक गोविंदपूरकर, आयुब मनियार, अहमद खान पठाण, सचिन बंडापल्ले, युनूस मोमीन, नागसेन कामेगावकर, दत्ता सोमवंशी, पर्यावरण सल्लागार राहुल बोबे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी अमित देशमुख म्हणाले, पाण्यावर पुनर्प्रक्रिया करणारा प्रकल्प लातुरात उभा राहिला याचे समाधान वाटते. सर्वच शहरांमध्ये अशा प्रकल्पांची आवश्यकता आहे. यामुळे प्रदूषणमुक्तीसह पाणीटंचाई कमी करण्यासही मदत होणार आहे. मनपाने उभारलेला हा प्रकल्प राज्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे.

२५ लाखांत उभारला प्रकल्प...

अनेक शहरात मलनिःसारण अथवा सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्प उभारले जातात. परंतु, त्यावर येणारा भरमसाठ खर्च आणि त्याची देखभाल, दुरुस्ती करणे शक्य होत नाही. लातूर मनपाने केवळ २५ लाखांमध्ये एका प्रकल्पाची उभारणी केली आहे. एकूण ८ प्रकल्पांकरिता २ कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे.