शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

बँक खासगीकरण धोरणाविरोधात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:33 IST

येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या मुख्य शाखेसमोर ही निदर्शने करण्यात आली. यावेळी कॉ. धनंजय कुलकर्णी म्हणाले, सध्या बँकिंग उद्योगात अस्थिरता, ...

येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या मुख्य शाखेसमोर ही निदर्शने करण्यात आली. यावेळी कॉ. धनंजय कुलकर्णी म्हणाले, सध्या बँकिंग उद्योगात अस्थिरता, असुरक्षिततेचे वातावरण निर्माण केले जात आहे. बँकांच्या खासगीकरणामुळे बचतदारांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होईल.

बँकांच्या आजच्या दुरवस्थेला थकीत कर्जे जबाबदार आहेत. त्यावर उपाय म्हणून सुरुवातीला वसुली प्राधिकरणे आली, नंतर सरफेसी कायदा आला, त्यानंतर दिवाळखोरी कायदा आला; पण या थकीत कर्जदारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. या अर्थसंकल्पात सरकारने थकीत कर्ज एकत्रित करून एक रिकव्हरी कंपनी स्थापन करण्याची घोषणाही केली आहे. ज्यामुळे सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील थकीत कर्जे एका छत्रीखाली आणली जातील आणि त्या बँकांचे ताळेबंद स्वच्छ केले जातील. एकदा हे ताळेबंद स्वच्छ झाले की, या बँकांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव पुढे आणला जाईल. ही थकीत कर्जे एकदा दृष्टिआड झाली की, मग विविध मार्गांचा अवलंब करत तडजोड करून मोठ्या थकीत कर्जदारांना मोकळे केले जाईल, असा आरोपही त्यांनी केला. यावेळी शहरातील तसेच लातूरनजीकच्या शाखांतून ७० ते ८० बँक कर्मचारी-अधिकारी उपस्थित होते.