शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

खरिपातील नवीन मुगाची आवक सुरू, ६ हजार ४०० रुपयांपर्यंत दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:23 IST

विनायक चाकुरे, उदगीर : उदगीर बाजार समितीत नवीन मुगाची आवक सुरू झाली असून, जवळपास ४०० क्विंटलपेक्षा अधिक आवक झाली. ...

विनायक चाकुरे,

उदगीर : उदगीर बाजार समितीत नवीन मुगाची आवक सुरू झाली असून, जवळपास ४०० क्विंटलपेक्षा अधिक आवक झाली. ६ हजार ते ६ हजार ४०० रुपये प्रती क्विंटल असा दर मिळत आहे. दरम्यान, मुगात ओलाव्याचे प्रमाण अधिक असल्याने दर कमी मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सध्या येथील बाजारात नांदेड जिल्ह्याच्या काही भागातून तसेच कर्नाटकाच्या सीमावर्ती भागातून मुगाची आवक होत आहे.

यंदा केंद्र शासनाने मुगाची आधारभूत किंमत ७ हजार २७५ रुपये प्रती क्विंटल जाहीर केली आहे. यंदाच्या जूनमध्ये झालेल्या पावसाने शेतकऱ्यांनी मुगाची पेरणी केली होती. तालुक्यात १ हजार ५४३ हेक्टरवर पेरा झाला होता. तालुक्यातील एकुण खरिपाच्या ६४ हजार हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत मुगाचा पेरा अल्प आहे. त्यातच जुलैमध्ये पावसाने उघडीप दिल्याने मुगाच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे बाजारात आवक मर्यादित प्रमाणात होत आहे. सध्या जी आवक आहे, ती शेजारील नांदेड जिल्ह्यातील काही तालुक्यातील व कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागातील आहे. मुगात ओलाव्याचे प्रमाण जास्त असल्याने दर कमी मिळत आहे.

गुरुवारी येथील बाजार समितीत ४०० क्विंटलपेक्षा जास्त मुगाची आवक झाली. यावर्षी सर्वच पिकांची स्थिती चांगली असून, उत्पादनही कमी होत असल्याने दरही स्थिर राहणार नाहीत, असे व्यापारी सांगत आहेत. साधारणत: मुगात १३ टक्के ओलावा असावा, असे व्यापारी सांगतात. परंतु, सध्या २० ते २५ टक्क्यांपर्यंत ओलावा असल्याने शेतकऱ्यांना दर कमी मिळत आहे. शासनाने जरी ७ हजार २७५ रुपये प्रती क्विंटल हमीभाव जाहीर केला असला तरी अद्याप हमीभावाच्या दराने खरेदी करण्यासाठी शासनाचे खरेदी केंद्र सुरू होण्याच्या कुठल्याही हालचाली दिसत नाहीत. त्यामुळे शासकीय खरेदी केंद्र केव्हा सुरू होते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सोयाबीन उत्पादनाकडे लागल्या नजरा...

बाजारात जरी नवीन मुगाची आवक सुरू झाली असली तरी या भागातील प्रमुख पीक सोयाबीन असल्याने व्यापाऱ्यांच्या नजरा या सोयाबीनच्या राशीकडे लागल्या आहेत. यंदा काही शेतकऱ्यांचा सोयाबीन विक्रमी दराने विक्री झाल्याने सर्व शेतकऱ्यांच्या आशा सोयाबीनच्या उत्पादनाकडे लागल्या आहेत. मागील आठवड्यापासून तालुक्यातील सर्व मंडळात कमी-अधिक प्रमाणात पाऊस होत असल्याने सोयाबीनचे उत्पादन चांगले होण्याची आशा आहे.

ओलाव्यामुळे दर कमी...

यावर्षी सध्या तरी पाऊस नसल्याने मुगाचा दर्जा चांगला आहे. परंतु, शेतीमालात ओलावा जास्त असल्याने दर कमी मिळत आहेत. पावसाने अशीच उघडीप दिल्यास मुगाच्या राशी लवकर होतील. परंतु, शेतकऱ्यांनी आपला शेतमाल वाळवून विक्रीसाठी आणल्यास बाजारात चांगला दर मिळू शकतो.

- लक्ष्मीकांत चिकटवार, व्यापारी.