शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

खरिपातील नवीन मुगाची आवक सुरू, ६ हजार ४०० रुपयांपर्यंत दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:23 IST

विनायक चाकुरे, उदगीर : उदगीर बाजार समितीत नवीन मुगाची आवक सुरू झाली असून, जवळपास ४०० क्विंटलपेक्षा अधिक आवक झाली. ...

विनायक चाकुरे,

उदगीर : उदगीर बाजार समितीत नवीन मुगाची आवक सुरू झाली असून, जवळपास ४०० क्विंटलपेक्षा अधिक आवक झाली. ६ हजार ते ६ हजार ४०० रुपये प्रती क्विंटल असा दर मिळत आहे. दरम्यान, मुगात ओलाव्याचे प्रमाण अधिक असल्याने दर कमी मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सध्या येथील बाजारात नांदेड जिल्ह्याच्या काही भागातून तसेच कर्नाटकाच्या सीमावर्ती भागातून मुगाची आवक होत आहे.

यंदा केंद्र शासनाने मुगाची आधारभूत किंमत ७ हजार २७५ रुपये प्रती क्विंटल जाहीर केली आहे. यंदाच्या जूनमध्ये झालेल्या पावसाने शेतकऱ्यांनी मुगाची पेरणी केली होती. तालुक्यात १ हजार ५४३ हेक्टरवर पेरा झाला होता. तालुक्यातील एकुण खरिपाच्या ६४ हजार हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत मुगाचा पेरा अल्प आहे. त्यातच जुलैमध्ये पावसाने उघडीप दिल्याने मुगाच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे बाजारात आवक मर्यादित प्रमाणात होत आहे. सध्या जी आवक आहे, ती शेजारील नांदेड जिल्ह्यातील काही तालुक्यातील व कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागातील आहे. मुगात ओलाव्याचे प्रमाण जास्त असल्याने दर कमी मिळत आहे.

गुरुवारी येथील बाजार समितीत ४०० क्विंटलपेक्षा जास्त मुगाची आवक झाली. यावर्षी सर्वच पिकांची स्थिती चांगली असून, उत्पादनही कमी होत असल्याने दरही स्थिर राहणार नाहीत, असे व्यापारी सांगत आहेत. साधारणत: मुगात १३ टक्के ओलावा असावा, असे व्यापारी सांगतात. परंतु, सध्या २० ते २५ टक्क्यांपर्यंत ओलावा असल्याने शेतकऱ्यांना दर कमी मिळत आहे. शासनाने जरी ७ हजार २७५ रुपये प्रती क्विंटल हमीभाव जाहीर केला असला तरी अद्याप हमीभावाच्या दराने खरेदी करण्यासाठी शासनाचे खरेदी केंद्र सुरू होण्याच्या कुठल्याही हालचाली दिसत नाहीत. त्यामुळे शासकीय खरेदी केंद्र केव्हा सुरू होते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सोयाबीन उत्पादनाकडे लागल्या नजरा...

बाजारात जरी नवीन मुगाची आवक सुरू झाली असली तरी या भागातील प्रमुख पीक सोयाबीन असल्याने व्यापाऱ्यांच्या नजरा या सोयाबीनच्या राशीकडे लागल्या आहेत. यंदा काही शेतकऱ्यांचा सोयाबीन विक्रमी दराने विक्री झाल्याने सर्व शेतकऱ्यांच्या आशा सोयाबीनच्या उत्पादनाकडे लागल्या आहेत. मागील आठवड्यापासून तालुक्यातील सर्व मंडळात कमी-अधिक प्रमाणात पाऊस होत असल्याने सोयाबीनचे उत्पादन चांगले होण्याची आशा आहे.

ओलाव्यामुळे दर कमी...

यावर्षी सध्या तरी पाऊस नसल्याने मुगाचा दर्जा चांगला आहे. परंतु, शेतीमालात ओलावा जास्त असल्याने दर कमी मिळत आहेत. पावसाने अशीच उघडीप दिल्यास मुगाच्या राशी लवकर होतील. परंतु, शेतकऱ्यांनी आपला शेतमाल वाळवून विक्रीसाठी आणल्यास बाजारात चांगला दर मिळू शकतो.

- लक्ष्मीकांत चिकटवार, व्यापारी.