शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
3
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
4
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
5
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
6
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
7
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
8
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
9
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
10
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
11
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
12
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
13
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
14
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
15
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
16
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
17
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
18
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
19
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
20
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार

पालिकेने अतिक्रमण हटविले; नागरिक तहसीलच्या दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:19 IST

शहरात थोडगा रोड येथील खासगी जागेत ४२ कुटुंबे मागील २० ते २५ वर्षांपासून राहत असून, त्यांच्याकडे आधारकार्ड, रेशन कार्ड, ...

शहरात थोडगा रोड येथील खासगी जागेत ४२ कुटुंबे मागील २० ते २५ वर्षांपासून राहत असून, त्यांच्याकडे आधारकार्ड, रेशन कार्ड, तसेच त्यांची मुले शहरातील शाळेत शिक्षण घेत आहेत. हे निराधार शहरातील प्लास्टिकचा कचरा गोळा करून उदरनिर्वाह करीत असतात. मात्र, खासगी जागेवरील अतिक्रमण काढल्यानंतर नगरपालिकेने कचरा वेगळा करण्याच्या अटीवर त्यांना काही जागा एमआयडीसीजवळच्या डंपिंग ग्राउंड येथे दिली होती. मात्र, त्या ठिकाणी या कुटुंबाबरोबर शहरातील अन्य लोक नगरपालिका कबालनामे देणार असल्याचे समजून त्या ठिकाणी आपले घर करून राहण्यास सुरुवात केली. त्यामुळे नगरपालिकेचे डंपिंग ग्राउंड पूर्णत: झोपड्यांनी भरून गेले.

पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणधारकांना तेथून काढले. त्यांच्या झोपड्या काढून टाकल्या आहेत. त्यामुळे निराधार व निराश्रित मजुरांनी तहसील कार्यालयाच्या आवारात ठाण मांडले आहे. आम्हाला गायरान जागेवर राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, तहसील कार्यालयाने हा विषय आपल्या कक्षेत येत नसल्याचे सांगून त्यावर बोलण्यास नकार दिला आहे. दरम्यान, प्रशासनाच्या या गोंधळामुळे ही कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. त्वरित गायरान जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी अण्णाराव सूर्यवंशी, गोविंद कांबळे, शीलाताई शिंदे, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, आदींनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

रेशन, आधार कार्ड असूनही अडचण...

रेशनकार्ड, आधार कार्ड आहे. पण, राहण्यासाठी घर नाही. ही कुटुंबे कर्नाटकातून येथे स्थायिक झाली आहेत. २५ वर्षांपासून ती येथे राहत असल्यामुळे त्यांना येथील रहिवासी म्हणून गणले जात आहे. प्रत्येक वेळेस ते मतदान करतात. त्यांची मुले ही वेगवेगळ्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. शिवाय, उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस सुविधा आहे. परंतु, राहण्यासाठी घर नाही, असे अण्णाराव सूर्यवंशी यांनी सांगितले.