शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
3
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
4
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
5
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
6
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
7
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
8
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
9
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
10
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
11
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
12
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
13
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
14
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
15
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
16
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
17
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
18
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
19
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
20
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर

मसलगा प्रकल्प भरला; जलवाहिनी अद्याप कोरडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:21 IST

खरोसा : सततच्या पावसामुळे निलंगा तालुक्यातील मसलगा प्रकल्प भरला आहे. मात्र, या प्रकल्पावर अवलंबून असलेली औसा तालुक्यातील खरोश्यासह परिसरातील ...

खरोसा : सततच्या पावसामुळे निलंगा तालुक्यातील मसलगा प्रकल्प भरला आहे. मात्र, या प्रकल्पावर अवलंबून असलेली औसा तालुक्यातील खरोश्यासह परिसरातील नऊ गावांसाठीची जलयोजना कोरडीच आहे. परिणामी, भर पावसाळ्यात या पाणीयोजनेवर अवलंबून असलेल्या गावांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

औसा तालुक्यातील खरोश्यासह नऊ गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत साडेअकरा कोटी रुपये खर्चून ऑक्टोबर २००६ मध्ये सुरुवातीस पाच खेडी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली. त्यानंतर या योजनेत चार खेडी समाविष्ट करण्यात आली. सुरुवातीचे तीन-साडेतीन वर्षे ही योजना सुरळीत सुरू होती. त्यानंतर कधी पाण्याअभावी तर कधी थकीत वीज बिलामुळे ही योजना बंद पडली. परिणामी, या योजनेवर अवलंबून असलेल्या नऊ गावांतील ग्रामस्थांना उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागते.

सदरील ९ गावांत ७० हातपंप, १६ सार्वजनिक विहिरी आणि २४ विंधन विहिरी आहेत. यंदा पर्जन्यमान चांगले झाल्यामुळे मुबलक पाणीसाठा झाला आहे.

सततच्या पावसामुळे सध्या मसलगा मध्यम प्रकल्प तुडुंब भरला आहे. दरम्यान, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने थकित वीज बिलाची अर्धी रक्कम भरली आहे. मात्र, जलयोजना अद्यापही कोरडीच आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.

किरकोळ दुरुस्तीनंतर पाणीपुरवठा...

या योजनेत खरोश्यासह शेडोळ, किनी नवरे, तांबरवाडी, जावळी, चलबुर्गा, मोगरगा, आनंदवाडी आणि जाऊ या गावांचा समावेश आहे. प्रकल्पावरील विद्युत मोटारी, खरोसा डोंगरावरील जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती आणि जलकुंभाची स्वच्छता आदी कामे झाली आहेत. किरकोळ कामाची दुरुस्ती झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे.

अन्य ठिकाणहून दोन दिवसांत पाणी...

मसलगा प्रकल्पावरूनची जलयोजना बंद पडल्यानंतर खरोसा ग्रामपंचायतीने वन विभागाच्या विहिरीतून पाणीपुरवठा सुरू केला होता. पण त्या ठिकाणचे रोहित्र बंद पडल्यामुळे खरोश्यात काही वस्तीतील नळयोजना दोन महिन्यांपासून बंद पडली आहे. दरम्यान, सरपंच संयोगिता साळुंके म्हणाल्या, वन विभागाच्या विहिरीसाठी स्वतंत्र रोहित्र बसविण्यात आले असून दोन दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याचे सांगितले.

वीज बिलापोटी ६० लाखांचा भरणा...

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत खरोसा सहा खेडी पाणी पुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन करावे, असा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने राज्य शासनाकडे दाखल केला होता. या प्रस्तावावर राज्याच्या पाणी पुरवठा विभागाने डिसेंबर २०१८ मध्ये निर्णय घेऊन त्यासाठी ४ कोटी ३५ लाखांच्या अंदाजपत्रकाला मान्यता दिली होती. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने थकीत वीज बिलाची निम्मी रक्कम म्हणजे ६० लाख रुपये फेब्रुवारी २०२१ मध्ये भरली. निम्मी थकबाकी भरून आठ महिन्यांचा काळ उलटला तरीही नऊ गावांचा पाणीप्रश्न अद्यापही न सुटल्यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.