शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

मसलगा प्रकल्प भरला; जलवाहिनी अद्याप कोरडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:21 IST

खरोसा : सततच्या पावसामुळे निलंगा तालुक्यातील मसलगा प्रकल्प भरला आहे. मात्र, या प्रकल्पावर अवलंबून असलेली औसा तालुक्यातील खरोश्यासह परिसरातील ...

खरोसा : सततच्या पावसामुळे निलंगा तालुक्यातील मसलगा प्रकल्प भरला आहे. मात्र, या प्रकल्पावर अवलंबून असलेली औसा तालुक्यातील खरोश्यासह परिसरातील नऊ गावांसाठीची जलयोजना कोरडीच आहे. परिणामी, भर पावसाळ्यात या पाणीयोजनेवर अवलंबून असलेल्या गावांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

औसा तालुक्यातील खरोश्यासह नऊ गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत साडेअकरा कोटी रुपये खर्चून ऑक्टोबर २००६ मध्ये सुरुवातीस पाच खेडी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली. त्यानंतर या योजनेत चार खेडी समाविष्ट करण्यात आली. सुरुवातीचे तीन-साडेतीन वर्षे ही योजना सुरळीत सुरू होती. त्यानंतर कधी पाण्याअभावी तर कधी थकीत वीज बिलामुळे ही योजना बंद पडली. परिणामी, या योजनेवर अवलंबून असलेल्या नऊ गावांतील ग्रामस्थांना उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागते.

सदरील ९ गावांत ७० हातपंप, १६ सार्वजनिक विहिरी आणि २४ विंधन विहिरी आहेत. यंदा पर्जन्यमान चांगले झाल्यामुळे मुबलक पाणीसाठा झाला आहे.

सततच्या पावसामुळे सध्या मसलगा मध्यम प्रकल्प तुडुंब भरला आहे. दरम्यान, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने थकित वीज बिलाची अर्धी रक्कम भरली आहे. मात्र, जलयोजना अद्यापही कोरडीच आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.

किरकोळ दुरुस्तीनंतर पाणीपुरवठा...

या योजनेत खरोश्यासह शेडोळ, किनी नवरे, तांबरवाडी, जावळी, चलबुर्गा, मोगरगा, आनंदवाडी आणि जाऊ या गावांचा समावेश आहे. प्रकल्पावरील विद्युत मोटारी, खरोसा डोंगरावरील जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती आणि जलकुंभाची स्वच्छता आदी कामे झाली आहेत. किरकोळ कामाची दुरुस्ती झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे.

अन्य ठिकाणहून दोन दिवसांत पाणी...

मसलगा प्रकल्पावरूनची जलयोजना बंद पडल्यानंतर खरोसा ग्रामपंचायतीने वन विभागाच्या विहिरीतून पाणीपुरवठा सुरू केला होता. पण त्या ठिकाणचे रोहित्र बंद पडल्यामुळे खरोश्यात काही वस्तीतील नळयोजना दोन महिन्यांपासून बंद पडली आहे. दरम्यान, सरपंच संयोगिता साळुंके म्हणाल्या, वन विभागाच्या विहिरीसाठी स्वतंत्र रोहित्र बसविण्यात आले असून दोन दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याचे सांगितले.

वीज बिलापोटी ६० लाखांचा भरणा...

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत खरोसा सहा खेडी पाणी पुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन करावे, असा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने राज्य शासनाकडे दाखल केला होता. या प्रस्तावावर राज्याच्या पाणी पुरवठा विभागाने डिसेंबर २०१८ मध्ये निर्णय घेऊन त्यासाठी ४ कोटी ३५ लाखांच्या अंदाजपत्रकाला मान्यता दिली होती. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने थकीत वीज बिलाची निम्मी रक्कम म्हणजे ६० लाख रुपये फेब्रुवारी २०२१ मध्ये भरली. निम्मी थकबाकी भरून आठ महिन्यांचा काळ उलटला तरीही नऊ गावांचा पाणीप्रश्न अद्यापही न सुटल्यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.