शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ई-पॉस, एमआरपीनुसार खत विक्रीच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:19 IST

पावसाळा सुरू होण्यासाठी केवळ महिनाभराचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे शेतकरी खरीप हंगामपूर्व कामे आटोपत आहेत. काही शेतकरी बी- बियाणे, ...

पावसाळा सुरू होण्यासाठी केवळ महिनाभराचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे शेतकरी खरीप हंगामपूर्व कामे आटोपत आहेत. काही शेतकरी बी- बियाणे, खतांची चौकशी करून जुळवाजुळव करीत आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांना अधिक दराने रासायनिक खतांची विक्री केली जाऊ नये. एमआरपीनुसार खतांची विक्री व्हावी म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी नियोजन केले आहे. त्यानुसार रासायनिक खत विक्रेत्यांना एमआरपीप्रमाणे खत विक्री बंधनकारक केले आहे. तसेच शेतकऱ्यांनीही खते खरेदी करताना एमआरपीनुसार ती खरेदी करावीत. ई- पॉस मशीनद्वारे आधार कार्डचा वापर करावा. खरेदीवेळी दुकानदारांकडून पक्की पावती घ्यावी. खताच्या पोत्यावरील निर्देशित एमआरपीपेक्षा जर ज्यादा दराने व कच्च्या पावतीवर विक्रेत्याकडून खताची विक्री होणे, खत उपलब्ध असतानाही ते विक्री न करणे असे आढळून आल्यास शेतकऱ्यांनी याबाबत तालुका स्तरावरील तालुका कृषी अधिकारी अथवा पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदवावी. तसेच जिल्हा स्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी यांच्याकडील तक्रार निवारण कक्षाकडेही तक्रार करता येईल.

८६ हजार ८८० मे. टन आवंटन...

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात विविध प्रकारच्या खताचे ९६ हजार ८८० मे. टन आवंटन प्राप्त झाले आहे. मासिक आवंटनाप्रमाणे खताची उपलब्धता होत आहे. मागील वर्षीचा ५४ हजार ९५१ मे. टन खत साठा उपलब्ध आहे. सध्या जिल्ह्यात खताची पुरेशी उपलब्धता आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने व कृषी विकास अधिकारी सुभाष चोले यांनी सांगितले.

खत, बियाणे, कीटकनाशके खरेदीबाबत तक्रार असल्यास जिल्हा स्तरावरील ०२३८२ २४३९४९, ०२३८२ २५९५९५ क्रमांकावर तक्रार नोंदवावी. तक्रारीची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.