शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

उन्हाळी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:17 IST

शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील प्रकल्प यंदा भरल्याने शेतकऱ्यांचा उन्हाळी पिके घेण्याकडे कल वाढला आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी भुईमुगाला पसंती दिल्याने ...

शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील प्रकल्प यंदा भरल्याने शेतकऱ्यांचा उन्हाळी पिके घेण्याकडे कल वाढला आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी भुईमुगाला पसंती दिल्याने जवळपास ५० हेक्टर्सवर भुईमुगाचे पीक बहरले आहे. सध्या शेतकरी हात कोळपणीची कामे करीत आहेत.

तालुक्यात घरणी, साकोळ, पांढरवाडी, डोंगरगावसारखे मोठे प्रकल्प आहेत. मागील तीन- चार वर्षांत हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. यंदा परतीच्या पावसाने सर्वच प्रकल्प तुडुंब भरले आहेत. त्यातच घरणी आणि पांढरवाडी प्रकल्पाच्या कालव्याद्वारे कालवा सिंचन सुरू करण्यात आले आहे. शेतकरी त्याचा फायदा घेण्यासाठी विविध पिके घेत आहेत. सध्या तुरीच्या राशी झाल्या आहेत. त्यामुळे जमीन काळीभोर आहे. पाणी उपलब्ध असल्याने शेतकरी उन्हाळी पिके म्हणून भुईमुगाचा पर्याय निवडत आहेत. काही शेतकऱ्यांनी भुईमुगाची पेरणी केली असून आंतर मशागत करीत आहेत. आतापर्यंत तालुक्यातील विविध गावांत ५० हेक्टर्स भुईमुगाची पेरणी झाली आहे.

१५ फेब्रुवारीपर्यंत पेरणी आवश्यक...

तालुक्यात यंदा उसाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली असली तरी ज्या शेतकऱ्यांना घरणी, पांढरवाडी प्रकल्पाच्या कालवा सिंचनाचा लाभ होतो, असे शेतकरी सध्या भुईमुगाची पेरणी करीत असल्याचे दिसून येत आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण करणे आवश्यक असल्याचे मंडळ कृषी अधिकारी बाळासाहेब गाढवे, शिवप्रसाद वलांडे यांनी सांगितले.

भुईमुगाला अधिक पसंती...

भुईमूग हे एकेकाळी मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे पहिल्या पसंतीचे पीक होते; परंतु उत्पादन क्षमतेच्या स्पर्धेत आता भुईमुगाची जागा सोयाबीनने घेतली असली तरी उन्हाळी पीक म्हणून आजही शेतकरी भुईमुगालाच अधिक पसंती देत आहेत. तालुक्यात ५० हेक्टर्सपेक्षा अधिक क्षेत्रावर भुईमुगाचा पेरा झाला असून शेतकरी मशागत करताना दिसून येत आहेत. दरम्यान, रानडुकरे भुईमुगाचे मोठे नुकसान करीत असल्याचे संजीव गुणाले, धोंडिराम कारभारी, मेजर दिलीप बिरादार, विठ्ठलराव पाटील यांनी सांगितले.