शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
Suraj Chavan :'सुरज चव्हाणांना अटक करा, गुंडगिरी खपवून घेणार नाही'; अंजली दमानियांचा हल्लाबोल
3
परस्पर समझोता करून तक्रार मागे, पोलीस हतबल; राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?
4
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
5
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
6
सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचं घरी जंगी स्वागत, सोशल मीडियावर दिसली झलक
7
श्रावणाची सुरुवात गजलक्ष्मी योगात: ७ मूलांकांचे कल्याण, भरघोस लाभ; सुबत्ता-समृद्धी, शुभ काळ!
8
एपीएमसीच्या १७९ एकर जमिनीवर कोणाचा डोळा? नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट हलणार?
9
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
10
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
11
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
12
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम
13
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
14
आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई
15
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
16
पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!
17
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
18
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
19
हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण
20
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...

खरीप हंगामाच्या तयारीत शेतकरी मग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:19 IST

यंदा वेळेवर मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. परिणामी, तालुक्यातील शेतकरी ...

यंदा वेळेवर मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. परिणामी, तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतीची मशागत करीत आहेत. बहुतांश शेतकऱ्यांनी मार्चमध्ये शेतीत नांगरणी केली होती. त्यानंतर, महिनाभर थांबून पाळी मारण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांनी शेतात किमान दोनपेक्षा जास्त पाळ्या मारून शेती अधिक सुपीक कशी होईल, याकडे लक्ष केंद्रित केले आहे.

हवामान खात्याने यंदा पुरेसा पाऊस होईल, असा अंदाज वर्तविल्याने शेतकरी पेरणीपूर्व कामे आटोपत आहेत. त्याचबरोबर, काही शेतकऱ्यांनी पेरणीचे यंत्र दुरुस्त करण्यास सुरुवात केली आहे. शेतात पेरणीसाठी लागणाऱ्या योग्य बियाणांची चौकशी करीत आहेत. दरम्यान, कृषी विभागाकडून सोयाबीन बियाणे उगवण क्षमता प्रात्यक्षिके दाखवून मार्गदर्शन करण्यात येत आहे. तालुक्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा होतो. त्या पाठोपाठ तूर पिकाचे उत्पादन शेतकरी घेतात. बी-बियाणे, खतांची शेतकरी चौकशी करीत आहेत.

मागील दोन-तीन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना यंदा चांगला पाऊस होईल, अशी आशा लागली आहे. सध्या हंगामपूर्व शेतीची कामे आटोपण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे.

यंत्राद्वारे मशागतीच्या दरात वाढ...

यंदा इंधनाचे दर वाढले आहेत. त्यामुळे ट्रॅक्टरवर मशागत करण्याच्या दरातही वाढ झाली आहे. नांगरणी, रोटा मारणे, माेगडणे, सरी सोडण्याच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. बैलाद्वारे शेतकरी करणे शक्य नसल्याने नाईलाजास्तव यंत्राचा वापर करावा लागत आहे, असेही शेतकरी म्हणाले.

मशागतीच्या दरात वाढ झाल्याने शेतीसाठी केलेला खर्च आणि उत्पादनाचा ताळमेळ लागत नाही. त्यामुळे आर्थिक संकट निर्माण होत असल्याचेही तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी सांगितले.