शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

आझादी का अमृतमहोत्सव; देशातील प्रत्येक गावची माती पोहोचणार दिल्लीला !

By हरी मोकाशे | Updated: July 27, 2023 18:55 IST

केंद्र शासनाच्या वतीने दिल्लीत अमृत रोपवाटिकेची निर्मिती

लातूर : आझादी का अमृतमहोत्सवानिमित्ताने केंद्र शासनाच्या वतीने दिल्लीत अमृत रोपवाटिकेची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी देशातील प्रत्येक पंचायत समितीतून मातीचा एक कलश पाठविण्यात येणार आहे. पंचायत समितीचा हा कलश प्रत्येक गावच्या मातीपासून बनविण्यात येणार आहे. दि. १२ ऑगस्ट रोजी देशातील ७ हजार ५०० पंचायत समितींचे मातीचे कलश दिल्लीत पोहोचणार आहेत.

आझादी का अमृतमहोत्सवानिमित्ताने केंद्र शासनाच्या वतीने वर्षभर देशात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतून भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या ७५ वर्षांतील घडामोडींना उजाळा देण्यासाठी, ग्रामविकासातील विविध कल्याणकारी योजनांमध्ये गतिमानता आणून सर्व समाज घटकांचा सक्रिय सहभाग वाढविण्याबरोबरच जनजागृती आणि चांगल्या सेवांद्वारे लोकचळवळ उभी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. अमृतमहोत्सवाची सांगता दि. ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान होणार आहे. मेरी माटी- मेरा देश, मिट्टी को नमन-विरो का वंदन अशी सांगता सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारची थीम आहे.

या कालावधीत प्रत्येक गावांत स्वातंत्र्यवीरांच्या सन्मानार्थ स्मारक शिल्पाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यावर पंतप्रधानांचा संदेश, वीरांची नावे व अभिवादन कोरणे अपेक्षित आहे. तसेच विकसित भारताचे लक्ष, गुलामीपासून मुक्ती, आपल्या वारसा स्थळांचा अभिमान, एकता व एकजुटता, नागरिकांमध्ये कर्तव्याची भावना या पंचप्राणाची शपथ देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीत ७५ झाडांची विशेष लागवड, सैन्य दलातील जवान, शहीद-वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबीयांचा तसेच स्वातंत्र्यसेनानींचा आणि त्यांच्या कुटुंबाचा गौरव करण्याच्या सूचना केंद्र शासनाने जिल्हा परिषदेस केल्या आहेत.

जिल्हास्तरावरही रोपवाटिका...आझादी का अमृतमहोत्सवानिमित्ताने केंद्र शासनाच्या सूचनेनुसार प्रत्येक ग्रामपंचायतीत गावातील मातीचा कलश तयार करण्यात येणार आहे. ते पंचायत समितीत एकत्र करून जिल्ह्यास आणि दिल्लीसाठी प्रत्येकी एक कलश तयार करून पाठविण्यात येणार आहे. त्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.- अनमोल सागर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनlaturलातूर