शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

आझादी का अमृतमहोत्सव; देशातील प्रत्येक गावची माती पोहोचणार दिल्लीला !

By हरी मोकाशे | Updated: July 27, 2023 18:55 IST

केंद्र शासनाच्या वतीने दिल्लीत अमृत रोपवाटिकेची निर्मिती

लातूर : आझादी का अमृतमहोत्सवानिमित्ताने केंद्र शासनाच्या वतीने दिल्लीत अमृत रोपवाटिकेची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी देशातील प्रत्येक पंचायत समितीतून मातीचा एक कलश पाठविण्यात येणार आहे. पंचायत समितीचा हा कलश प्रत्येक गावच्या मातीपासून बनविण्यात येणार आहे. दि. १२ ऑगस्ट रोजी देशातील ७ हजार ५०० पंचायत समितींचे मातीचे कलश दिल्लीत पोहोचणार आहेत.

आझादी का अमृतमहोत्सवानिमित्ताने केंद्र शासनाच्या वतीने वर्षभर देशात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतून भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या ७५ वर्षांतील घडामोडींना उजाळा देण्यासाठी, ग्रामविकासातील विविध कल्याणकारी योजनांमध्ये गतिमानता आणून सर्व समाज घटकांचा सक्रिय सहभाग वाढविण्याबरोबरच जनजागृती आणि चांगल्या सेवांद्वारे लोकचळवळ उभी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. अमृतमहोत्सवाची सांगता दि. ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान होणार आहे. मेरी माटी- मेरा देश, मिट्टी को नमन-विरो का वंदन अशी सांगता सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारची थीम आहे.

या कालावधीत प्रत्येक गावांत स्वातंत्र्यवीरांच्या सन्मानार्थ स्मारक शिल्पाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यावर पंतप्रधानांचा संदेश, वीरांची नावे व अभिवादन कोरणे अपेक्षित आहे. तसेच विकसित भारताचे लक्ष, गुलामीपासून मुक्ती, आपल्या वारसा स्थळांचा अभिमान, एकता व एकजुटता, नागरिकांमध्ये कर्तव्याची भावना या पंचप्राणाची शपथ देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीत ७५ झाडांची विशेष लागवड, सैन्य दलातील जवान, शहीद-वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबीयांचा तसेच स्वातंत्र्यसेनानींचा आणि त्यांच्या कुटुंबाचा गौरव करण्याच्या सूचना केंद्र शासनाने जिल्हा परिषदेस केल्या आहेत.

जिल्हास्तरावरही रोपवाटिका...आझादी का अमृतमहोत्सवानिमित्ताने केंद्र शासनाच्या सूचनेनुसार प्रत्येक ग्रामपंचायतीत गावातील मातीचा कलश तयार करण्यात येणार आहे. ते पंचायत समितीत एकत्र करून जिल्ह्यास आणि दिल्लीसाठी प्रत्येकी एक कलश तयार करून पाठविण्यात येणार आहे. त्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.- अनमोल सागर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनlaturलातूर