शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

आझादी का अमृतमहोत्सव; देशातील प्रत्येक गावची माती पोहोचणार दिल्लीला !

By हरी मोकाशे | Updated: July 27, 2023 18:55 IST

केंद्र शासनाच्या वतीने दिल्लीत अमृत रोपवाटिकेची निर्मिती

लातूर : आझादी का अमृतमहोत्सवानिमित्ताने केंद्र शासनाच्या वतीने दिल्लीत अमृत रोपवाटिकेची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी देशातील प्रत्येक पंचायत समितीतून मातीचा एक कलश पाठविण्यात येणार आहे. पंचायत समितीचा हा कलश प्रत्येक गावच्या मातीपासून बनविण्यात येणार आहे. दि. १२ ऑगस्ट रोजी देशातील ७ हजार ५०० पंचायत समितींचे मातीचे कलश दिल्लीत पोहोचणार आहेत.

आझादी का अमृतमहोत्सवानिमित्ताने केंद्र शासनाच्या वतीने वर्षभर देशात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतून भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या ७५ वर्षांतील घडामोडींना उजाळा देण्यासाठी, ग्रामविकासातील विविध कल्याणकारी योजनांमध्ये गतिमानता आणून सर्व समाज घटकांचा सक्रिय सहभाग वाढविण्याबरोबरच जनजागृती आणि चांगल्या सेवांद्वारे लोकचळवळ उभी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. अमृतमहोत्सवाची सांगता दि. ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान होणार आहे. मेरी माटी- मेरा देश, मिट्टी को नमन-विरो का वंदन अशी सांगता सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारची थीम आहे.

या कालावधीत प्रत्येक गावांत स्वातंत्र्यवीरांच्या सन्मानार्थ स्मारक शिल्पाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यावर पंतप्रधानांचा संदेश, वीरांची नावे व अभिवादन कोरणे अपेक्षित आहे. तसेच विकसित भारताचे लक्ष, गुलामीपासून मुक्ती, आपल्या वारसा स्थळांचा अभिमान, एकता व एकजुटता, नागरिकांमध्ये कर्तव्याची भावना या पंचप्राणाची शपथ देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीत ७५ झाडांची विशेष लागवड, सैन्य दलातील जवान, शहीद-वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबीयांचा तसेच स्वातंत्र्यसेनानींचा आणि त्यांच्या कुटुंबाचा गौरव करण्याच्या सूचना केंद्र शासनाने जिल्हा परिषदेस केल्या आहेत.

जिल्हास्तरावरही रोपवाटिका...आझादी का अमृतमहोत्सवानिमित्ताने केंद्र शासनाच्या सूचनेनुसार प्रत्येक ग्रामपंचायतीत गावातील मातीचा कलश तयार करण्यात येणार आहे. ते पंचायत समितीत एकत्र करून जिल्ह्यास आणि दिल्लीसाठी प्रत्येकी एक कलश तयार करून पाठविण्यात येणार आहे. त्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.- अनमोल सागर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनlaturलातूर